शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

कागदावरचा निकाल काही असला तरी निवडणुकाच निकाल ठरविणार : आदित्य ठाकरे

By दीपक शिंदे | Updated: January 10, 2024 22:03 IST

ईडीची कारवाई व तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी गद्दारांच्या प्रमुखाने हे कृत्य केले असल्याचा आरोप शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

सणबूर : कागदावरचा निकाल काहीही लागला असला तरी २०२४ च्या निवडणुकीतील निकाल जनताच ठरवेल, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करणार? अगोदरच सर्व ठरल्याप्रमाणे झाले. ईडीची कारवाई व तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी गद्दारांच्या प्रमुखाने हे कृत्य केले असल्याचा आरोप शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

तळमावले, ता. पाटण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम, पाटण तालुका शिवसेनाप्रमुख सचिन आचरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश पाटील, महिला आघाडी प्रमुख अनिता जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती.

आदित्य ठाकरे म्हणाले, खोक्याचे राजकारण करून सरकार पाडणाऱ्या ४० गद्दारांना धडा शिकविण्यासाठी जनतेने सज्ज राहावे. या खोके सरकारने महाराष्ट्रामध्ये एक तरी उद्योग आणला का? महाराष्ट्रात असलेले उद्योग बाहेर केंद्र सरकारच्या माध्यमातून गुजरातमध्ये नेण्यामध्ये त्यांनी धन्यता मानली. केंद्र सरकारने महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय केला असून, महाराष्ट्राचे सर्व क्षेत्रांत योगदान असतानादेखील महाराष्ट्र देशातच नाही, अशी वागणूक केंद्राकडून दिली जात आहे. केंद्राचा महाराष्ट्रावर एवढा राग का आणि कशासाठी, असा प्रश्न जनतेने या खोके सरकारला विचारायला हवा.

आंदोलने करणाऱ्यावर लाठीचार्ज केला जातो, हे कोणाच्या सांगण्यावरून होतो. हिंमत नसलेले सरकार फक्त आश्वासनापलीकडे काहीच करू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले, आमचा मतदारसंघ तालुका व जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे हे गद्दार आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. हे असले गद्दार आमदार आपणाला चालणार का, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केले तर शिवसेना तालुकाप्रमुख सचिन आचरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवसैनिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाSatara areaसातारा परिसर