शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कागदावरचा निकाल काही असला तरी निवडणुकाच निकाल ठरविणार : आदित्य ठाकरे

By दीपक शिंदे | Updated: January 10, 2024 22:03 IST

ईडीची कारवाई व तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी गद्दारांच्या प्रमुखाने हे कृत्य केले असल्याचा आरोप शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

सणबूर : कागदावरचा निकाल काहीही लागला असला तरी २०२४ च्या निवडणुकीतील निकाल जनताच ठरवेल, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करणार? अगोदरच सर्व ठरल्याप्रमाणे झाले. ईडीची कारवाई व तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी गद्दारांच्या प्रमुखाने हे कृत्य केले असल्याचा आरोप शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

तळमावले, ता. पाटण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम, पाटण तालुका शिवसेनाप्रमुख सचिन आचरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश पाटील, महिला आघाडी प्रमुख अनिता जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती.

आदित्य ठाकरे म्हणाले, खोक्याचे राजकारण करून सरकार पाडणाऱ्या ४० गद्दारांना धडा शिकविण्यासाठी जनतेने सज्ज राहावे. या खोके सरकारने महाराष्ट्रामध्ये एक तरी उद्योग आणला का? महाराष्ट्रात असलेले उद्योग बाहेर केंद्र सरकारच्या माध्यमातून गुजरातमध्ये नेण्यामध्ये त्यांनी धन्यता मानली. केंद्र सरकारने महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय केला असून, महाराष्ट्राचे सर्व क्षेत्रांत योगदान असतानादेखील महाराष्ट्र देशातच नाही, अशी वागणूक केंद्राकडून दिली जात आहे. केंद्राचा महाराष्ट्रावर एवढा राग का आणि कशासाठी, असा प्रश्न जनतेने या खोके सरकारला विचारायला हवा.

आंदोलने करणाऱ्यावर लाठीचार्ज केला जातो, हे कोणाच्या सांगण्यावरून होतो. हिंमत नसलेले सरकार फक्त आश्वासनापलीकडे काहीच करू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले, आमचा मतदारसंघ तालुका व जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे हे गद्दार आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. हे असले गद्दार आमदार आपणाला चालणार का, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केले तर शिवसेना तालुकाप्रमुख सचिन आचरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवसैनिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाSatara areaसातारा परिसर