शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल बिघडला म्हणून काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात संचारबंदी अंशत: शिथिल झाली आणि अत्यावश्यक सेवेची दुकाने पुन्हा एकदा सुरू झाली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यात संचारबंदी अंशत: शिथिल झाली आणि अत्यावश्यक सेवेची दुकाने पुन्हा एकदा सुरू झाली. मात्र, मोबाइल दुरुस्तीची दुकाने बंद असली तरी अनेक दुकानदार लपूनछपून ही कामे करीत आहेत. अशा दुकानांच्या आवारात नागरिक सर्व नियम पायदळी तुडवून गर्दी करीत आहेत. मोबाइल बिघडला म्हणून काय झालं, आरोग्य बिघडायला नको, असं म्हणण्याची वेळ या नागरिकांना पाहून येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फटका जसा इतर उद्योग-व्यवसायांना बसला, तसाच तो मोबाइल व्यावसायिकांना देखील बसला आहे. तब्बल दीड महिन्यापासून मोबाइल दुरुस्तीची दुकाने बंद असल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांच्या मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. कोणाचा स्पीकर खराब झाला आहे तर कोणाचा डिस्प्ले फुटला आहे. अशा अडचणी वाढत चालल्या असताना मोबाइल दुरुस्तीची दुकाने मात्र अद्यापही बंद आहेत.

संचारबंदी शिथिल झाली तरी मोबाइल दुरुस्तीची दुकाने मात्र अजूनही बंद आहेत. त्यामुळे काही ठिकाणी लपूनछपून दुरुस्तीची कामे केली जात आहेत. अशा दुकानांच्या आजूबाजूला नागरिकांची गर्दी होत आहे. एक वेळ मोबाइल बिघडला तरी चालेल; परंतु आपले आरोग्य बिघडता कामा नये, याची जाण नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे. मोबाइलची दुकाने आज ना उद्या उघडतील; परंतु आपलं आरोग्य बिघडले तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे.

(चौकट)

ही आहेत कारणे

- मोबाइलचा स्पीकर खराब होणे. त्यामुळे ध्वनी प्रतिध्वनी ऐकू न येणे

- डिस्प्ले फुटणे. ज्यांचे टचस्क्रीन मोबाइल आहेत त्यांचे कीपॅड न चालणे

- वारंवार चार्जिंग करूनही मोबाइल चार्ज न होणे

- मोबाइलचा व्हॉल्युम कमी-जास्त करण्याची बटणे नादुरुस्त होणे

- मोबाइलची नवीन बॅटरी टाकणे व नवीन सीम खरेदी करणे, रिचार्ज करणे.

(चौकट)

दीड महिन्यापासून बाजारपेठ बंद

सातारा जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाने थैमान घातले. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवा घरपोच उपलब्ध करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे मोबाइलसह इतर सर्व दुकाने गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने छोट्या-मोठ्या दुकानदारांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. जिल्हा प्रशासनाने टप्प्याटप्प्याने संचारबंदीचे निर्बंध शिथिल करून दुकाने खुली करावीत, अशी मागणी दुकानदार करीत आहेत.

(कोट)

शटर उघडण्याची प्रतीक्षा

कोरोनाचा सर्वात मोठा फटका आमच्यासारख्या छोट्या दुकानदारांना बसला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही मोबाइल रिपेरिंग दुकाने बंद आहेत. त्यामुळे आमची रोजीरोटी बंद झाली आहे. दुकानांचे शटर कधी उघडेल, हीच ओढ लागली आहे.

- प्रकाश जाधव, सातारा

(कोट)

दुकान चालले तरच घर चालते; परंतु गेल्या दीड महिन्यापासून सर्व काही बंद आहे. मोबाइल दुरुस्तीची कामे पूर्णत: बंद झाली आहेत. जोपर्यंत दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आमची गाडी रुळावर येणार नाही.

- प्रमोद कदम, सातारा

मोबाइल महत्त्वाचाच.. पण आरोग्य?

(कोट)

मोबाइलमुळे आप्तस्वकीयांशी संपर्क साधता येतो. व्हिडिओ कॉलद्वारे बोलता येते; परंतु मोबाइल खराब झाल्यास हे सर्व बंद झाले होते. आरोग्य महत्त्वाचे आहेच; परंतु सध्याच्या घडीला मोबाइल देखील महत्त्वाचा आहे.

- विशाल उतेकर

(कोट)

आम्ही आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन घराबाहेर पडत आहोत. गेल्या महिनाभरापासून मोबाइल बंद आहे. तो दुरुस्त झाल्यास किमान नातेवाइकांशी संपर्क तरी करता येईल.

- नागेश कारंडे, सातारा