शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मोबाइल बिघडला म्हणून काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात संचारबंदी अंशत: शिथिल झाली आणि अत्यावश्यक सेवेची दुकाने पुन्हा एकदा सुरू झाली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यात संचारबंदी अंशत: शिथिल झाली आणि अत्यावश्यक सेवेची दुकाने पुन्हा एकदा सुरू झाली. मात्र, मोबाइल दुरुस्तीची दुकाने बंद असली तरी अनेक दुकानदार लपूनछपून ही कामे करीत आहेत. अशा दुकानांच्या आवारात नागरिक सर्व नियम पायदळी तुडवून गर्दी करीत आहेत. मोबाइल बिघडला म्हणून काय झालं, आरोग्य बिघडायला नको, असं म्हणण्याची वेळ या नागरिकांना पाहून येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फटका जसा इतर उद्योग-व्यवसायांना बसला, तसाच तो मोबाइल व्यावसायिकांना देखील बसला आहे. तब्बल दीड महिन्यापासून मोबाइल दुरुस्तीची दुकाने बंद असल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांच्या मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. कोणाचा स्पीकर खराब झाला आहे तर कोणाचा डिस्प्ले फुटला आहे. अशा अडचणी वाढत चालल्या असताना मोबाइल दुरुस्तीची दुकाने मात्र अद्यापही बंद आहेत.

संचारबंदी शिथिल झाली तरी मोबाइल दुरुस्तीची दुकाने मात्र अजूनही बंद आहेत. त्यामुळे काही ठिकाणी लपूनछपून दुरुस्तीची कामे केली जात आहेत. अशा दुकानांच्या आजूबाजूला नागरिकांची गर्दी होत आहे. एक वेळ मोबाइल बिघडला तरी चालेल; परंतु आपले आरोग्य बिघडता कामा नये, याची जाण नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे. मोबाइलची दुकाने आज ना उद्या उघडतील; परंतु आपलं आरोग्य बिघडले तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे.

(चौकट)

ही आहेत कारणे

- मोबाइलचा स्पीकर खराब होणे. त्यामुळे ध्वनी प्रतिध्वनी ऐकू न येणे

- डिस्प्ले फुटणे. ज्यांचे टचस्क्रीन मोबाइल आहेत त्यांचे कीपॅड न चालणे

- वारंवार चार्जिंग करूनही मोबाइल चार्ज न होणे

- मोबाइलचा व्हॉल्युम कमी-जास्त करण्याची बटणे नादुरुस्त होणे

- मोबाइलची नवीन बॅटरी टाकणे व नवीन सीम खरेदी करणे, रिचार्ज करणे.

(चौकट)

दीड महिन्यापासून बाजारपेठ बंद

सातारा जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाने थैमान घातले. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवा घरपोच उपलब्ध करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे मोबाइलसह इतर सर्व दुकाने गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने छोट्या-मोठ्या दुकानदारांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. जिल्हा प्रशासनाने टप्प्याटप्प्याने संचारबंदीचे निर्बंध शिथिल करून दुकाने खुली करावीत, अशी मागणी दुकानदार करीत आहेत.

(कोट)

शटर उघडण्याची प्रतीक्षा

कोरोनाचा सर्वात मोठा फटका आमच्यासारख्या छोट्या दुकानदारांना बसला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही मोबाइल रिपेरिंग दुकाने बंद आहेत. त्यामुळे आमची रोजीरोटी बंद झाली आहे. दुकानांचे शटर कधी उघडेल, हीच ओढ लागली आहे.

- प्रकाश जाधव, सातारा

(कोट)

दुकान चालले तरच घर चालते; परंतु गेल्या दीड महिन्यापासून सर्व काही बंद आहे. मोबाइल दुरुस्तीची कामे पूर्णत: बंद झाली आहेत. जोपर्यंत दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आमची गाडी रुळावर येणार नाही.

- प्रमोद कदम, सातारा

मोबाइल महत्त्वाचाच.. पण आरोग्य?

(कोट)

मोबाइलमुळे आप्तस्वकीयांशी संपर्क साधता येतो. व्हिडिओ कॉलद्वारे बोलता येते; परंतु मोबाइल खराब झाल्यास हे सर्व बंद झाले होते. आरोग्य महत्त्वाचे आहेच; परंतु सध्याच्या घडीला मोबाइल देखील महत्त्वाचा आहे.

- विशाल उतेकर

(कोट)

आम्ही आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन घराबाहेर पडत आहोत. गेल्या महिनाभरापासून मोबाइल बंद आहे. तो दुरुस्त झाल्यास किमान नातेवाइकांशी संपर्क तरी करता येईल.

- नागेश कारंडे, सातारा