शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडीचं खळाळलं जिहे-कटापूरचं काय?

By admin | Updated: September 10, 2016 00:39 IST

पाणीप्रश्नावर निवडणुका लढणारे नेतेही चिडीचूप : सांगा योजना कधी लागणार मार्गी? माण-खटाव वासीयांचा सवाल

दहिवडी : माण तालुक्यामध्ये उरमोडी योजनेचे पाणी आले असून, श्रेयवादावरून राजकारण चांगलेच रंगू लागले आहे, असे असताना दुसरीकडे मात्र तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जिहे-कटापूर योजनेबद्दल मात्र कोणीही बोलायला तयार नाही. या योजनेमुळे माण-खटावमधील ७० टक्के भाग सिंचनाखाली येणार आहे. असे असताना केवळ श्रेयवादाच्या राजकारणात या योजनेकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही.राज्यातील दुष्काळी तालुक्याचा पाणी प्रश्न निकाली काढावा यासाठी सर्व प्रथम १९९५ मध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ठोस धोरण आखले. त्यातून पश्चिम महाराष्ट्रासाठी कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली. त्यामध्ये वसना, वांगना, जाणाई, शिरसाई, टेंभू योजनेसह माण-खटावला वरदान ठरणाऱ्या जिहे-कटापूर व उरमोडी योजनेचा समावेश केला गेला. दिवंगत अभयसिंहराजे भोसले, उदयनराजे भोसले, हिंदुराव नाईक-निंबाळकर, रामराजे नाईक-निंबाळकर, भाऊसाहेब गुदगे, सदाशिवराव पोळ यांनी पहिल्या टप्प्यात या योजना गतिमान केल्या. यासाठी प्रसंगी कर्जरोखे काढले गेले. त्यामुळे या योजनेला गती आली. त्यानंतर युतीचे शासन गेले, आघाडीचे आले. अनेक निवडणुका या पाण्यावर होऊ लागल्या. खटावमध्ये डॉ. दिलीपराव येळगावकर, आमदार जयकुमार गोरे हे या आंदोलनात यशस्वी झाले. त्यांनी पाणी हाच माण-खटावचा श्वास असल्याने यावर लक्ष केंद्रित केले व निवडणुकाही जिंकल्या. आज उरमोडीचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण धावतात; पण ‘ज्याच्या हातात ससा तो पारधी’ या म्हणीप्रमाणे सत्ताधारी जरी या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी सर्वांचेच श्रेय या योजनेसाठी आहे हे नाकारून चालणार नाही. मग हिंदुराव नाईक-निंबाळकर, डॉ. दिलीप येळगावकर, रणजितसिंह देशमुख, सुरेंद्र गुदगे यांची आंदोलने असोत किंवा आमदार गोरे, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे यांचे शासकीय पातळीवर केलेले योगदान असो किंवा वाघोजीराव पोळ, विश्वंबर बाबर, अजितराव राजेमाने, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, डॉ. महादेव कापसे यांच्या पाणी परीक्षा असो प्रत्येकाने या पाण्यासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे हे श्रेय सर्वांचेच आहे. हेही नाकारून चालणार नाही. आज उरमोडीचे पाणी माण-खटावला पोहोचले आहे. यावर अनेकजण आता श्रेयवादावरून राजकारण करू लागले आहेत. मात्र, कसे का असेना माणला पाणी आले.उरमोडीचे पाणी आले परंतु जिहे-कटापूरवर एक ही शब्द निघत नाही. अधूनमधून सहा महिन्यांत पाणी येणार? तीन महिन्यांत पाणी येणार हे निवडणुकीपुरते दिलेले आश्वासन गेली १० वर्षे जनता ऐकत आहे. उरमोडी योजना झाली. चांगली गोष्ट आहे; पण माण-खटावला ज्या योजनेसाठी खरी गरज आहे ती जिहे-कटापूरच योजना आहे. आज ही योजना पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यावर कोणत्याच नेत्यांनी म्हणावे तितके प्रयत्न केले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्पासाठी निधी दिला. त्यावेळी श्रेयवाद घेणाऱ्या मंडळींनी या योजनेत जिहे-कटापूरचा समावेश व्हावा यासाठी किती प्रयत्न केले हे ही जनतेसमोर आले पाहिजे. असे उरमोडीचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ झाली तशी जिहे-कटापूरसाठी झाली तरी चालेल; पण ही योजना पहिली पूर्ण करा, अशी जनतेची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)...तर हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखालीजाणाई-शिरसाई, जिहे-कटापूर या योजनेचे एकाच दिवशी नारळ फुटले असताना जिहे-कटापूर योजना अपुरीच कशी? उरमोडीमुळे तालुक्याचे २० टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते. परंतु जिहे-कटापूर योजना झाल्यास माण-खटावमधील ७० टक्के भाग सिंचनाखाली येणार आहे. खटावमध्ये नेर तलावात माणमध्ये आंधळी तलावात पाणी सुटणार आहे. आंधळीची पातळी ०.२६२ अब्ज घनफूट आहे. या एकट्या तालुक्यामुळे ४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या दोन्ही तलाव्यात पाणी आल्यास कोणत्याही गावाला पाणी देणे शक्य होणार आहे, असे असताना जिहे-कटापूर योजनेवर भर देणे गरजेचे आहे. जिहे-कटापूर व उरमोडी योजना ही युती शासनाची कल्पना असून, कोणी काहीही म्हणजे युती शासनाने सुरू केलेली योजना युती शासनाच्या काळातच पूर्ण होईल. त्यासाठी पालकमंत्रीही आग्रही असून, जिहे-कटापूरचे पाणी लवकरच माणमध्ये येईल.- अनिल सुभेदार, जिल्हा शिवसेना उपप्रमुख