शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

गावाकडच्या चटणीचा काय वर्णावा थाट! महानगरांमधून वाढतेय मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:43 IST

सातारा : महानगरांमध्ये वाढत जाणारे सिमेंटचे जंगल आणि लुप्त झालेले अंगण यामुळे उन्हाळी कामांसाठी तेथील महिलांना साताऱ्याचा आसरा घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्दे मिरची पावडर तयार करून शहरांकडे नेण्याकडे दिसतोय कल

सातारा : महानगरांमध्ये वाढत जाणारे सिमेंटचे जंगल आणि लुप्त झालेले अंगण यामुळे उन्हाळी कामांसाठी तेथील महिलांना साताऱ्याचा आसरा घ्यावा लागत आहे. शहरात उपलब्ध होणाºया वस्तू आणि अपार्टमेंटमध्येही जिवंत असलेली माणुसकी यामुळे साताºयाच्या अंगणात सध्या मुंबईकरांच्या मसाल्याचं वाळवणं पडलेलं दिसत आहे.नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्तानं आपलं गाव सोडून मोठ्या शहरात वसलेल्या कुटुंबाला वर्षभराची चटणी, पापड, कुरडई, सांडगे आदी करण्यासाठी साताºयाकडे किंवा त्यांच्या गावाकडे जावे लागते.एप्रिल महिन्यात मुलांची परीक्षा संपल्यानंतर सर्वत्रच मिरची आणणे निवडणे, भाजणे, मसाला तळणे आणि मिरची कांडून आणण्याची धांदल सुरू असते.मोठ्या शहरांत घरे जवळ जवळ असल्यामुळे पदार्थ करणं आणि वाळत घालणं यासाठी जागा नसल्यामुळे अडचण होत आहे.'दरांमध्ये तिपटीने फरकसाताºयात गुंटूर १२०-१२५, ब्याडगी १८०-२०० व लवंगी मिरची १३० ते १३५ रुपये किलो या दराने विक्री होत आहे. एक किलो मिरचीसाठी साधारण १५० ते २५० रुपयांचा मसाला लागतो. मिरची कांडण्यासाठी १५ पंधरा रुपये घेतात. महानगरांमध्ये मिरची आणि मसाला या दोन्हीबरोबरच कांडण्याचे दरही तिप्पट आहेत. चार जणांच्या कुटुंबाला तीन किलो चटणी वर्षाला पुरून उरते. जागेच्या अडचणीबरोबरच दरांच्या आकड्यांची बेरीज केली तर साताºयात किंवा गावात येऊन मिरची पावडर तयार करून नेणं परवडत असल्याचे मुंबईस्थित गृहिणी मंदाकिनी काळभोर यांनी सांगितले.वेफर्स अन् कुरवड्याहीमहानगरांमध्ये राहणाºया महिला साताºयातून मिरची पावडरबरोरबच वेफर्स, पापड, सांडगे, कुरडई, सालपापड्या, उपवासाचे पापड आदी वर्षभराचे तळण प्रकार येथूनच करून मुंबईला घेऊन जातात.वर्षाचे धान्य देण्याकडेही कलमुंबई-पुण्यात टेरेसही रिकामे नसल्याचे चित्र दिसते. त्यामुळे शेतातील धान्य उन्हाळी आणि दिवाळी सुटीत घेऊन जाण्याकडे कल आहे. येथे कडक उन्हात वाळवलेले धान्य वर्षभर तेथे खराब होत नाही.पुण्या-मुंबईकडून गावाकडे आलेल्यांची चटणी करण्याची धांदल जाणवते. दिवसाकाठी पन्नास ते साठ किलो लाल मिरचीची विक्री होते. मोठ्या शहरांच्या तुलनेत साताºयात मसाल्याचे दरही चाळीस टक्क्यांनी कमी आहेत.- अशोक माने,मिरची विक्रेता