शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

विहीर आटली तरीही दुष्काळात उमलली फुलं !

By admin | Updated: May 27, 2016 21:57 IST

राजापूरच्या तरुणाची भरारी : ग्रीन हाउसच्या माध्यमातून यशाची फुले; जरबेरा, ग्लॅडियेटर, शेवंती, गुलाबाचे उत्पादन

विशाल सूर्यवंशी-बुध  खटाव तालुक्यातील राजापूर येथील पदवीधर तरुण मिलिंद शिवाजी कचरे या तरुणाने इच्छाशक्तीच्या जोरावर राजापूरच्या माळावर आज आपल्या कष्टातून यशाची फुले फुलवली आहेत़ दोन ग्रीन हाउसच्या माध्यमातून ऐन दुष्काळातही फूल शेतीतून आपली आर्थिक समृद्धी साधली आहे़ आज कचरे यांचे यश अन्य तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.कला शाखेची पदवी घेऊन नोकरीसाठी जीवाची मुंबई करून मिलिंद कचरे या तरुणाने गावाचा रस्ता धरला़ नोकरीमध्ये चाकोरीबद्ध काम करणे मनाला रुचले नाही़ मुंबई सारख्या शहरात काम करताना महिन्याच्या शेवटी काहीच रक्कम हाताला लागत नसल्याने गावाकडे शेती केलेली बरी, या हेतूने राजापूर येथील डंगारवाडा या परिसरात असणाऱ्या खडकाच्या माळरानावर शेती करण्याचा ध्यास मिलिंदने घेतला़ प्रथम माळारानातील खडक पोकलेनच्या साह्याने फोडून थोडेफार क्षेत्र तयार केले़ डोंगर उताराला क्षेत्र असल्याने पारंपरिक शेती करून म्हणावे तसे उत्पन्न पदरात पडणार नसल्याने वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचा विचार मिलिंद कचरे या तरुणाच्या मनात येऊ लागला. त्यातूनच ग्रीन हाउस उभारण्याचा निर्णय घेतला़ २००९ मध्ये बँकेतून सहा लाखांचे कर्ज घेऊन कामाला सुरुवात केली़ ५६० चौरस मीटरच्या ग्रीन हाऊस उभारण्यास साडेतीन लाख रुपये खर्च आला. तर कार्नेशन झाडाची रोपे थेट केनियातून मागवली. त्यासाठी दीड लाखाचा खर्च आला़ या शेतीसाठी आवश्यक असणारी लालमाती टाकण्यासाठी जवळजवळ लाखभर खर्च करून या फूल शेतीच्या कामाला सुरुवात केली़ चार महिन्यांत उत्पन्न चालू झाले. या चार महिन्यांत झाडाची देखभाल, प्रत्येक झाडाला खत औषध, फवारणी आदी अगदी काटेकारपणे करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने मिलिंद कचरे यांनी हे सर्व काळजीपूर्वक केले़ चार महिन्यांतच जवळजवळ ५० हजार फुलांचे उत्पन्न मिळाले. मुंबई फूल मार्केटला प्रतिफूल ८ रुपयांप्रमाणे भाव मिळाल्याने फक्त ९ महिन्यांत ४ लाखांचे भरघोस उत्पन्न मिळाल्याने मिलिंद यांच्या कष्टाला चांगले यश आले़ दरवर्षी साधारण सहा लाखांची उलाढाल होत होती़ सर्व कर्ज फेडून मिलिंद यांनी सुमारे ७ लाख रुपये शिल्लक ठेवले. त्यातून याच ग्रीन हाउसच्या शेजारी १५ गुंठ्यांचे नवीन ग्रीन हाउसचे शेड उभारले. त्यासाठी पुन्हा थोडेफार कर्ज आणि शिल्लक यातून फूल शेती मोठ्या प्रमाणात करण्याचे धाडस केले. या शेतीच्या माध्यामातून मिलिंद कचरे या तरुणाने आपली आर्थिक प्रगती साधली आहे. या ग्रीन हाउसमध्ये जरबेरा, ग्लॅडियेटर, शेवंती, गुलाब, लिमोनियम हे फूल पीक घेतल्याने जमिनीचा दर्जा चांगला राहत आहे. खर्च जाऊन ५० हजार रुपये मिळत आहेत. दर दोन दिवसांला मुंबई मार्केटला काही माल तर राहिलेला आपल्याच परिसरात देऊन मिलिंद कचरे यांनी समतोल साधला आहे़ या कामी त्यांना पत्नी माधुरी यांच्यासह कुटूंबियांची साथ लाभत असल्याचे मिलींद यांनी सांगीतले.शेततळ्यावर फूल शेती तग धरून...भविष्यात याच माळरानात कृषीपर्यटन हा प्रकल्प उभा करण्याचा मानस मिलिंद कचरे यांचा आहे. त्यासाठी आतापासूनच त्यांनी सुरुवात केली आहे. तसेच यावर्षी मोठा दुष्काळ असतानाही मिलिंद कचरे यांनी शेततळे उभारले आहे. विहीर पूर्ण आटली असतानाही या शेततळ्याच्या जोरावर अजून ही फूल शेती तग धरून आहे़