शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

अजित पवारांच्या न्यायिक भूमिकेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदोन्नतीमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात घेतलेल्या न्यायिक भूमिकेचे मराठा विचार मंच, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदोन्नतीमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात घेतलेल्या न्यायिक भूमिकेचे मराठा विचार मंच, महाराष्ट्रच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्रक मंचने काढले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारने २५ मे २००४ला मागासवर्गीयांसाठी पदोन्नतीत आरक्षणाचा कायदा केला. या कायद्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय देत २५ मे २००४चा कायदा रद्द केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका तत्कालीन सरकारने दाखल केली. २९ डिसेंबर २०१७ रोजी सामान्य प्रशासन विभागाने पत्र काढून मागासवर्गीयांच्या ३३ टक्के पदांना सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत राखीव ठेवून अनारक्षित पदे भरण्याबाबत निर्णय घेतला.

१८ फेब्रुवारी २०२१ला पदोन्नतीने भरावयाची मागासवर्गीयांची ३३ टक्के पदे २५ मे २००४च्या सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या जागेतून भरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला. २० एप्रिल २०२१ला मागासवर्गीयांच्या ३३ टक्के पदांना सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत पदोन्नतीच्या कोट्यातील आरक्षित पदे रिक्त ठेऊन खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे दि. २५ मे २००४च्या स्थितीनुसार सेवाज्येष्ठतेने भरण्याचा निर्णय घेण्यात आला. उच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले असताना ही आरक्षित पदे आली कोठून? उच्च न्यायालयाचा निकाल झालेला असताना आरक्षित पदांच्या जागा या नावाखाली काही पदे रिक्त ठेवणे हा उच्च न्यायालयाचा अवमान आहे.

उच्च न्यायालयाच्या निकालाची सरकारला जाणीव असल्याने व सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली नसल्याने दि. ७ मे २०२१ला पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील मागील चार वर्षांपासून रिक्त असलेली सर्व पदे भरली जाणार आहेत. परंतु, या निर्णयामध्येही बदल करण्याची मागणी जोर धरत आहे. अशा न्यायिक निर्णयालासुध्दा काही ओबीसी नेते विरोध करत आहेत.

अशा पद्धतीने वागणाऱ्या व घटनात्मक पदावर असलेले विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, पंकजा मुंडे, छगन भुजबळ हे नेते जर फक्त ठराविक समाजाची बाजू घेऊन त्यांचे निर्णय जाहीर करत असतील तर अशा नेत्यांचा मराठा विचार मंच, महाराष्ट्र निषेध करतो व सर्व ओबीसी समाजाला आवाहन करतो की, अशा फुटकळ व फक्त स्वतःच्या समाजाचा स्वार्थ साधणाऱ्या नेत्यांमुळेच ओबीसी समाजातील बहुतांशी समाज हा वंचित आहे. त्यामुळे इथून पुढे अशा वंचित समाजासाठी व मराठा समाजातील प्रश्नांसाठी मराठा विचार मंच, महाराष्ट्र न्यायालयीन लढा उभा करणार असून, आरक्षण व न्याय हक्कापासून वंचित समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.

मराठा समाजाच्या हिताची भूमिका घेणाऱ्यांसोबत मराठा समाज ठामपणे उभा राहील. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने मराठा समाजाला गृहित धरून कोणतीही अन्यायकारक भूमिका घेऊ नये, अन्यथा याचे राजकीय व सामाजिक परिणाम संबंधित पक्षांना भोगावे लागतील, असा इशाराही या पत्रकात दिला आहे.