शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धनगरवाडीत कन्या जन्माचं स्वागत : वृक्ष लागवड केल्यास ३० हजारांपर्यंत ठेव पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:55 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावाने ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ...

ठळक मुद्देकेंद्र्रीय पथकाने धनगरवाडी गावाची पाहणी करून गावाने राबवलेली योजना व कामाचे कौतुक केले.

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावाने ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष योजना हाती घेतली आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर वृक्षलागवड व संवर्धन केल्यास मुलीच्या नावे १५ ते ३० हजारांपर्यंत ठेव पावती केली जाणार आहे,’ अशी माहिती सरपंच चंद्र्रकांत पाचे यांनी दिली.

धनगरवाडी गाव आदर्श बनविण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली आहे. प्रत्येक शनिवार हा गावचा स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करतात. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून ते सुंदर करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी नवी योजना आखलीआहे. एखाद्या दाम्पत्याला पहिली मुलगी जन्माला आली तर त्यांनी गावच्या परिसरात दहा झाडे लावून ती जगवायची, असे केल्यास मुलीच्या नावे ग्रामपंचायत १५ हजारांची ठेव पावती करणार आहे तर दुसºया मुलीच्या जन्मावेळी वीस झाडे जगवल्यास ३० हजारांची ठेव पावती केली जाणार आहे. जे दाम्पत् एकाच मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार आहे. त्यांना ५१ हजार रुपये मुलीच्या संगोपनासाठी देण्यात येणार आहेत.

या अभिनव कल्पनेतून ‘लेक वाचवा’ अभियानाला बळकटी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय गावात कोणताही कार्यक्रम, मीटिंग अथवा शासकीय अधिकाºयांच्या भेटीचा दौरा सर्व ग्रामस्थांना समजण्यासाठी गावात ‘मेसेज अलर्ट’ योजना राबविण्यात येत आहे. याद्वारे ही सर्व माहिती गावातील प्रत्येकाच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पोहोचणार आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराची पाहणी केंद्रीय पथकाकडून नुकतीच करण्यात आली.संगणकीकृत ग्रामपंचायत, डिजिटलखंडाळा तालुक्याचे सभापती मकरंद मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामपंचायतचा संपूर्ण कारभार संगणकीकृत करण्यात आला आहे. तसेच स्थानिक कंपनांच्या मदतीने प्राथमिक शाळेचे नूतनीकरण व ई-लर्निंग सुविधेसह ‘डिजिटल शाळा’ बनविण्यात आली आहे. त्यामुळे गावच्या वैभवात भर पडली आहे. 

गावच्या सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवित आहोत. त्यासाठी सर्व ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी याला प्रोत्साहन दिले आहे. शिक्षण, आरोग्य व स्वच्छता यांसह लोकजागृतीसाठी अधिक कामावर भर देण्याचा मनोदय आहे. ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना आम्ही निश्चित साकारणार आहोत.- चंद्र्रकांत पाचे, सरपंच 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgovernment schemeसरकारी योजना