शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

धनगरवाडीत कन्या जन्माचं स्वागत : वृक्ष लागवड केल्यास ३० हजारांपर्यंत ठेव पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:55 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावाने ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ...

ठळक मुद्देकेंद्र्रीय पथकाने धनगरवाडी गावाची पाहणी करून गावाने राबवलेली योजना व कामाचे कौतुक केले.

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावाने ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष योजना हाती घेतली आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर वृक्षलागवड व संवर्धन केल्यास मुलीच्या नावे १५ ते ३० हजारांपर्यंत ठेव पावती केली जाणार आहे,’ अशी माहिती सरपंच चंद्र्रकांत पाचे यांनी दिली.

धनगरवाडी गाव आदर्श बनविण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली आहे. प्रत्येक शनिवार हा गावचा स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करतात. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून ते सुंदर करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी नवी योजना आखलीआहे. एखाद्या दाम्पत्याला पहिली मुलगी जन्माला आली तर त्यांनी गावच्या परिसरात दहा झाडे लावून ती जगवायची, असे केल्यास मुलीच्या नावे ग्रामपंचायत १५ हजारांची ठेव पावती करणार आहे तर दुसºया मुलीच्या जन्मावेळी वीस झाडे जगवल्यास ३० हजारांची ठेव पावती केली जाणार आहे. जे दाम्पत् एकाच मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार आहे. त्यांना ५१ हजार रुपये मुलीच्या संगोपनासाठी देण्यात येणार आहेत.

या अभिनव कल्पनेतून ‘लेक वाचवा’ अभियानाला बळकटी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय गावात कोणताही कार्यक्रम, मीटिंग अथवा शासकीय अधिकाºयांच्या भेटीचा दौरा सर्व ग्रामस्थांना समजण्यासाठी गावात ‘मेसेज अलर्ट’ योजना राबविण्यात येत आहे. याद्वारे ही सर्व माहिती गावातील प्रत्येकाच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पोहोचणार आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराची पाहणी केंद्रीय पथकाकडून नुकतीच करण्यात आली.संगणकीकृत ग्रामपंचायत, डिजिटलखंडाळा तालुक्याचे सभापती मकरंद मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामपंचायतचा संपूर्ण कारभार संगणकीकृत करण्यात आला आहे. तसेच स्थानिक कंपनांच्या मदतीने प्राथमिक शाळेचे नूतनीकरण व ई-लर्निंग सुविधेसह ‘डिजिटल शाळा’ बनविण्यात आली आहे. त्यामुळे गावच्या वैभवात भर पडली आहे. 

गावच्या सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवित आहोत. त्यासाठी सर्व ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी याला प्रोत्साहन दिले आहे. शिक्षण, आरोग्य व स्वच्छता यांसह लोकजागृतीसाठी अधिक कामावर भर देण्याचा मनोदय आहे. ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना आम्ही निश्चित साकारणार आहोत.- चंद्र्रकांत पाचे, सरपंच 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgovernment schemeसरकारी योजना