शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण अन् प्लास्टिकमुक्त साताऱ्यासाठी प्रयत्न करू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 19:12 IST

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद-- जिल्ह्यात काम करण्यास मोठा वाव आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्या लोकांना नेहमीच आपुलकीची सेवा मिळेल. तसेच तालुकास्तरावर बैठका घेऊन उपाययोजना केल्या जातील. - उदय कबुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनालाही राहणार प्राधान्य

नितीन काळेल।सातारा : सातारा जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर पोहोचलाय. हा नावलौकिक कायमस्वरुपी टिकण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करणार आहे. त्याचबरोबर जिल्हा स्वच्छतेत पुढे असून, यापुढे पर्यावरणयुक्त आणि प्लास्टिक व प्रदूषणमुक्त साताºयासाठी प्रयत्न केला जाईल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष उदय कबुले यांनी व्यक्त केला. याचबरोबर त्यांनी आगामी दोन वर्षांत काय-काय करता येईल यावर प्रकाशझोत टाकला.

प्रश्न : अध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी मिळालीय, ती कशी पेलणार आहात ?उत्तर : आ. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून उच्च पदावर काम करण्याची संधी मिळालीय. हे काम आव्हानात्मक असले तरी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न राहील. जिल्हा परिषदेत येणाºया प्रत्येकाचे काम कसे वेळेवर होईल, याकडे लक्ष दिले जाईल. कारण, येथे येणारा हा समस्या, कामे घेऊनच येत असतो. त्यामुळे विनाविलंब त्यांची कामे करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.

प्रश्न : सभागृहात विरोधकांचे सहकार्य मिळेल काय ?उत्तर : नक्कीच मिळेल. कारण, मी कोणालाच विरोधक मानत नाही. स्थानिक पातळीवर काम केल्याचा मला अनुभव आहे. विरोधकांनाही लोकांनी निवडून दिले आहे. त्यांचीही कामे झालीच पाहिजेत. त्यांनाही अधिकार आहे. आम्ही मिळून-मिसळून काम करू. आवश्यक तेथे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल.

प्रश्न : अधिकाऱ्यांबाबत आपले मत काय ?उत्तर : येथील अधिकाºयांचा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्यात मोठा वाटा आहे. सर्व विभागांना बरोबर घेऊन काम करण्यात येईल. त्यांच्या सहकार्यातून लोकांची कामे लवकर कशी होतील, हे पाहिले जाईल.

गावपातळीवर प्लास्टिकमुक्ती...जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पत्रव्यवहार करून प्लास्टिक बंदबाबत सांगण्यात येईल. कोठे विक्री होत असेल तर कारवाई करण्यास सांगू; पण एखादी ग्रामपंचायत याबाबत पावले उचलत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासारखे पाऊल उचलले जाईल. जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी असा निर्णय घ्यावाच लागेल.महिला स्वावलंबन, शेतीला प्राधान्य...

जिल्ह्यातील महिला स्वावलंबी व्हाव्यात. यासाठी शासनाच्या योजना गावपातळीवरील महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच जिल्ह्यात हजारो शेतकरी आहेत. मी ही शेतकरी कुटुंबातीलच आहे. त्यामुळे कृषीला प्राधान्य देणार आहे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊनच काम करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचा नावलौकिक होईल, असे काम मागीलप्रमाणे आताही केले जाईल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद