शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

प्रदूषण अन् प्लास्टिकमुक्त साताऱ्यासाठी प्रयत्न करू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 19:12 IST

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद-- जिल्ह्यात काम करण्यास मोठा वाव आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्या लोकांना नेहमीच आपुलकीची सेवा मिळेल. तसेच तालुकास्तरावर बैठका घेऊन उपाययोजना केल्या जातील. - उदय कबुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनालाही राहणार प्राधान्य

नितीन काळेल।सातारा : सातारा जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर पोहोचलाय. हा नावलौकिक कायमस्वरुपी टिकण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करणार आहे. त्याचबरोबर जिल्हा स्वच्छतेत पुढे असून, यापुढे पर्यावरणयुक्त आणि प्लास्टिक व प्रदूषणमुक्त साताºयासाठी प्रयत्न केला जाईल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष उदय कबुले यांनी व्यक्त केला. याचबरोबर त्यांनी आगामी दोन वर्षांत काय-काय करता येईल यावर प्रकाशझोत टाकला.

प्रश्न : अध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी मिळालीय, ती कशी पेलणार आहात ?उत्तर : आ. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून उच्च पदावर काम करण्याची संधी मिळालीय. हे काम आव्हानात्मक असले तरी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न राहील. जिल्हा परिषदेत येणाºया प्रत्येकाचे काम कसे वेळेवर होईल, याकडे लक्ष दिले जाईल. कारण, येथे येणारा हा समस्या, कामे घेऊनच येत असतो. त्यामुळे विनाविलंब त्यांची कामे करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.

प्रश्न : सभागृहात विरोधकांचे सहकार्य मिळेल काय ?उत्तर : नक्कीच मिळेल. कारण, मी कोणालाच विरोधक मानत नाही. स्थानिक पातळीवर काम केल्याचा मला अनुभव आहे. विरोधकांनाही लोकांनी निवडून दिले आहे. त्यांचीही कामे झालीच पाहिजेत. त्यांनाही अधिकार आहे. आम्ही मिळून-मिसळून काम करू. आवश्यक तेथे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल.

प्रश्न : अधिकाऱ्यांबाबत आपले मत काय ?उत्तर : येथील अधिकाºयांचा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्यात मोठा वाटा आहे. सर्व विभागांना बरोबर घेऊन काम करण्यात येईल. त्यांच्या सहकार्यातून लोकांची कामे लवकर कशी होतील, हे पाहिले जाईल.

गावपातळीवर प्लास्टिकमुक्ती...जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पत्रव्यवहार करून प्लास्टिक बंदबाबत सांगण्यात येईल. कोठे विक्री होत असेल तर कारवाई करण्यास सांगू; पण एखादी ग्रामपंचायत याबाबत पावले उचलत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासारखे पाऊल उचलले जाईल. जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी असा निर्णय घ्यावाच लागेल.महिला स्वावलंबन, शेतीला प्राधान्य...

जिल्ह्यातील महिला स्वावलंबी व्हाव्यात. यासाठी शासनाच्या योजना गावपातळीवरील महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच जिल्ह्यात हजारो शेतकरी आहेत. मी ही शेतकरी कुटुंबातीलच आहे. त्यामुळे कृषीला प्राधान्य देणार आहे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊनच काम करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचा नावलौकिक होईल, असे काम मागीलप्रमाणे आताही केले जाईल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद