शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

प्रदूषण अन् प्लास्टिकमुक्त साताऱ्यासाठी प्रयत्न करू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 19:12 IST

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद-- जिल्ह्यात काम करण्यास मोठा वाव आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्या लोकांना नेहमीच आपुलकीची सेवा मिळेल. तसेच तालुकास्तरावर बैठका घेऊन उपाययोजना केल्या जातील. - उदय कबुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनालाही राहणार प्राधान्य

नितीन काळेल।सातारा : सातारा जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर पोहोचलाय. हा नावलौकिक कायमस्वरुपी टिकण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करणार आहे. त्याचबरोबर जिल्हा स्वच्छतेत पुढे असून, यापुढे पर्यावरणयुक्त आणि प्लास्टिक व प्रदूषणमुक्त साताºयासाठी प्रयत्न केला जाईल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष उदय कबुले यांनी व्यक्त केला. याचबरोबर त्यांनी आगामी दोन वर्षांत काय-काय करता येईल यावर प्रकाशझोत टाकला.

प्रश्न : अध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी मिळालीय, ती कशी पेलणार आहात ?उत्तर : आ. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून उच्च पदावर काम करण्याची संधी मिळालीय. हे काम आव्हानात्मक असले तरी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न राहील. जिल्हा परिषदेत येणाºया प्रत्येकाचे काम कसे वेळेवर होईल, याकडे लक्ष दिले जाईल. कारण, येथे येणारा हा समस्या, कामे घेऊनच येत असतो. त्यामुळे विनाविलंब त्यांची कामे करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.

प्रश्न : सभागृहात विरोधकांचे सहकार्य मिळेल काय ?उत्तर : नक्कीच मिळेल. कारण, मी कोणालाच विरोधक मानत नाही. स्थानिक पातळीवर काम केल्याचा मला अनुभव आहे. विरोधकांनाही लोकांनी निवडून दिले आहे. त्यांचीही कामे झालीच पाहिजेत. त्यांनाही अधिकार आहे. आम्ही मिळून-मिसळून काम करू. आवश्यक तेथे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल.

प्रश्न : अधिकाऱ्यांबाबत आपले मत काय ?उत्तर : येथील अधिकाºयांचा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्यात मोठा वाटा आहे. सर्व विभागांना बरोबर घेऊन काम करण्यात येईल. त्यांच्या सहकार्यातून लोकांची कामे लवकर कशी होतील, हे पाहिले जाईल.

गावपातळीवर प्लास्टिकमुक्ती...जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पत्रव्यवहार करून प्लास्टिक बंदबाबत सांगण्यात येईल. कोठे विक्री होत असेल तर कारवाई करण्यास सांगू; पण एखादी ग्रामपंचायत याबाबत पावले उचलत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासारखे पाऊल उचलले जाईल. जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी असा निर्णय घ्यावाच लागेल.महिला स्वावलंबन, शेतीला प्राधान्य...

जिल्ह्यातील महिला स्वावलंबी व्हाव्यात. यासाठी शासनाच्या योजना गावपातळीवरील महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच जिल्ह्यात हजारो शेतकरी आहेत. मी ही शेतकरी कुटुंबातीलच आहे. त्यामुळे कृषीला प्राधान्य देणार आहे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊनच काम करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचा नावलौकिक होईल, असे काम मागीलप्रमाणे आताही केले जाईल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद