शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

अपप्रवृत्तीला मदत करणाऱ्यांना सहा महिन्यात जागा दाखवू, शरद पवारांचा इशारा 

By दीपक शिंदे | Updated: July 3, 2023 14:08 IST

राज्याला विकासात पुढे घेऊन जाण्यासाठी युवा शक्तीची गरज

दीपक शिंदेकऱ्हाड : देशातील सर्वसामान्य माणसाचा लोकशाहीचा अधिकार काढून घेणे आणि जातीय दंगली घडविण्याचे काम सुरू आहे. राज्यात देखील अशाच प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे. त्यांना पुढील सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. तसेच महाराष्ट्राला पुन्हा प्रगती कडे घेऊन जाण्यासाठी आता नवीन पिढी तयार करणे आवश्यक असून त्याला युवाशक्तीचा हातभार लागणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.  कऱ्हाड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून त्यांनी पक्षाची नवी भूमिका स्पष्ट केली. त्याबरोबरच आगामी कालावधीमध्ये कोणत्या पद्धतीने पुढे जाणे आवश्यक आहे याबाबतही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, प्रभाकर देशमुख, मानसिंगराव देशमुख, अरुण लाड, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार, रोहित पाटील आणि प्रतीक पाटील उपस्थित होते.शरद पवार म्हणाले,  जात, धर्म आणि पंथ या माध्यमातून माणसांमध्ये संघर्ष कसा वाढत जाईल, यासाठी प्रयत्न करणारा एक वर्ग तयार होतो आहे. शाहूंचे कोल्हापूर असेल नांदेड, सांगोला, अकोला या ठिकाणी लोकांमध्ये वैरभावना निर्माण करून ती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातूनच जातीय दंगे झाले. समाजविघातक प्रवृत्ती या उभ्या  राहत असताना त्यांना रोखण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस हे काम करत आहे. मात्र त्यालाही अडथळा आणण्याचा प्रयत्न या शक्तीकडून होत आहे.शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून सरकार एकत्रितपणे चालवण्याचं काम केलं. मात्र हे सरकार देखील पाडून टाकण्याचं काम या विघातक शक्तीने केले. देशात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली असून मध्य प्रदेश मध्ये कमलनाथ यांचे सरकार देखील अशाच पद्धतीने पाडण्यात आले.  देशात दिल्ली, पंजाब, उत्तराखंड या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती निर्माण केली जात आहे. सध्या संकटाचा काळ आहे, पण यातूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. या प्रवृत्तीला थांबविले पाहिजे.हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांचा आहे. लोकशाहीत काम करणाऱ्या कामगारांचा आहे. या ठिकाणी जातीयवादी विचारधारा कधीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होणार नाही. यासाठी ही नवीन पिढी जातीयवाद्यांना गाडण्याचे काम करेल. दुर्दैवाने आपले काही सहकारी या जातीवादांसोबत जात आहेत. मात्र, लवकरच त्यांना त्यांची जागा देखील कळेल. यासाठी सर्व सामाजिक शक्ती मजबूत करून आपण लढा उभारला पाहिजे. सर्वांच्या हिताचे कष्टकऱ्यांचे आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे राज्य निर्माण करण्याचे काम पुढच्या काळामध्ये होणं आवश्यक असल्याचेही  पवार म्हणाले.

आता फक्त माझाच आवाज..प्रीतीसंगमावरती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी शरद पवारांनी सर्वांना शांत करत, शांत बसा, कोणी बोलू नका. आता फक्त माझाच आवाज असे बोलल्याने सर्वत्र शांतता पसरली. मात्र त्यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे हे देखील सर्वांना कळले.

 तुमच्याकडे बेंदूर आमच्याकडे गुरुपौर्णिमा यशवंतराव चव्हाण हे तुमचे आमचे सर्वांचे गुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जनमत तयार करण्याचे काम पुढच्या काळात करायचे आहे. ते त्यांचा आशीर्वाद घेऊनच करणार आहोत. यासाठी त्यांना वंदन करून महाराष्ट्राच्या नवीन कामाला सुरुवात करत असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले. तुमच्याकडे बेंदूर असला तरी आमची गुरुपौर्णिमा आहे असे सांगत त्यांनी उपस्थिताना नव्या महाराष्ट्राच्या जडणघडणी बाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवार