शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात पाठवू

By admin | Updated: October 12, 2014 00:45 IST

विनोद तावडे : शिरवळ येथे पुुरुषोत्तम जाधव यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत हल्लाबोल

शिरवळ : ‘भारनियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या वल्गना करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या जीवनात अंधार पसरवणाऱ्या अजित पवारांचे सत्तेचे कनेक्शन कापणार आहे. आपण सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचार करून महाराष्ट्राच्या डोक्यावर तीन लाख कोटींचा डोंगर उभारणाऱ्यांना तुरुंगात पाठवू,’ असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी दिला.शिरवळ येथे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष व अन्य पक्षांचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती. यावेळी ‘भाजप’चे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप क्षीरसागर, सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, धनगर आरक्षण कृती समितीचे राज्याध्यक्ष हणमंतराव सूळ, सुनील गायकवाड, प्रकाश देशमुख, राहुल हाडके, चंद्रकांत यादव, भूषण शिंदे, निवृत्ती जाधव, नीलकंठ भूतकर, सुभाष क्षीरसागर, ‘रासप’चे तालुकाध्यक्ष कुंडलिक ठोंबरे, अण्णा साळुंखे, गणेश शेटे, कोंडिबा उंब्रटकर, नामदेव दाभाडे, नीशा जाधव, सुनीता हाडके उपस्थित होते. तावडे म्हणाले, ‘आघाडीने पंधरा वर्षांत राज्याच्या डोक्यावर प्रचंड कर्ज करून ठेवले आहे. प्रतिमाणसी २७ हजारांचे कर्जाचा बोजा लादणाऱ्या भ्रष्टाचारी नेत्यांना आता घरी बसवा. सर्वसामान्यांच्या घामाचा पैसा खाणाऱ्यांना अद्दल घडविण्याचे काम आता मतदार करणार आहेत. तासगावमध्ये बोलताना आर. आर. पाटील एका उमेदवारावर बोलताना म्हणतात की, ‘याला कळत नाही. बलात्कार करायचाच होता, तर निवडणुकीनंतर करायचा.’ हे राज्याच्या माजी गृहमंत्र्याला शोभणारे वक्तव्य आहे काय? अहो आबा आपण काय बोलता, किती बोलता.’ ‘राष्ट्रवादीच्या नेत्यांना खाण्याची सवय काका-पुतण्यांनी लावली आहे. राष्ट्रवादीला युती शासनाच्या काळात सुरू केलेली कामे करता आली नाहीत. निवडणुकीपुरते एकाच कामाचे वर्षानुवर्षे नारळ फोडण्याचेच काम राष्ट्रवादी करत आली आहे. राज्यात आजवर ४५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याला आघाडी शासनच जबाबदार आहे. भारनियमनमुक्त महाराष्ट्र करणार, असे वक्तव्य करणाऱ्यांनी राज्याचे बारा वाजविले. यापुढे राज्यात एकही आत्महत्या होणार नाही. शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या मागे पळावे लागणार नाही. तहसीलदार, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांचे गोपनीय अहवाल भरताना चार शेतकऱ्यांचे चांगले काम केल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे करणार आहे,’ असेही विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.पुरुषोत्तम जाधव म्हणाले, ‘काँग्रेस देशात संपली तशी राज्यातही संपणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा गट आता भाजपमध्ये येणार आहे. काँग्रेसमधील आयात शिवसेनेचे उमेदवार डी. एम. बावळेकर ही मदन भोसले यांचीच खेळी आहे. काँगेस, राष्ट्रवादीच्या खेळ्या जनतेच्या लक्षात आल्या आहेत. पाच वर्षांत मतदारसंघात विकासाचा नव्हे, तर भ्रष्टाचाराचा धबधबा कोसळला. खंडाळा तालुक्यात ‘सेझ’चे आठ टप्पे आणून येथील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून हक्काचे पाणी बारामतीकडे पाठविण्याचा डाव राष्ट्रवादीचा आहे. हे जनतेच्या लक्षात आले आहे.’ (प्रतिनिधी)