शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भूस्खलनातील गावांचे पुनर्वसन त्वरित होण्यासाठी प्रसंगी कायदा बदलू : शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST

कोयनानगर : ‘कोयना परिसराच्या पाचवीलाच संकटे पूजली आहेत. आजपर्यंत कोयना परिवारातील प्रत्येकाने संकटाला धीराने तोंड दिले. या संकटावरही मात ...

कोयनानगर : ‘कोयना परिसराच्या पाचवीलाच संकटे पूजली आहेत. आजपर्यंत कोयना परिवारातील प्रत्येकाने संकटाला धीराने तोंड दिले. या संकटावरही मात करू. यासाठी शासन तुमच्याबरोबर असून पुनर्वसनाचे काम जलदगतीने करण्यासाठी प्रसंगी कायदा बदलून काम करू. पण, कोयना भूस्खलनग्रस्तांना न्याय देऊ,’ अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पाटण तालुक्यातील कोयना विभागात भूस्खलनाने मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे, बाजे, गोकुळ नाला आदी गावांत झालेल्या जीवित व वित्तहानीची पाहणी मंत्री शिंदे यांनी केली. तसेच मुंबईवरून आणलेल्या मदतीचे वाटपही केले. त्यानंतर स्थलांतरित केलेल्या लोकांबरोबर त्यांनी कोयनानगर येथील मराठी शाळा व हुंबरळी येथे संवाद साधला.

यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, कार्यकारी अभियंता नीतेश पोतदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शशिकांत जाधव, हुंबरळीच्या सरपंच रेश्मा कांबळे आदी उपस्थित होते.

नगरविकासमंत्री शिंदे म्हणाले, ‘कोयना विभागावर यापुढे संकट न येण्यासाठी शासन कायमस्वरूपी उपाययोजना करत आहे. त्यासाठी लागेल तेवढा निधी खर्च करू. या चार गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करताना धोकादायक जागेवर न करता सुरक्षित जागेची निवड ग्रामस्थांनी करावी. शासकीय जागा उपलब्ध नसतील, तर खासगी जागांची निवड करावी. खासगी जागा खरेदी करण्यासाठी शासन खर्च करणार आहे.

मिरगाव, बाजे येथील पूरबाधितांचे तात्पुरते स्थलांतर कोयना प्रकल्पाच्या मोकळ्या वसाहतीत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोयना प्रकल्पाच्या मोडकळीस आलेल्या खोल्यांची दुरुस्ती करून, या बाधितांचे तात्पुरते स्थलांतर होणार आहे, असेही मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

...........................................................