शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबचतीच्या संदेशांचा मोबाईलवर पाणलोट

By admin | Updated: March 9, 2016 01:17 IST

काटकसरीने वापर करण्याचे आवाहन : ‘सोशल’ विषय सोशल मीडियावर चांगलाच रंगला...

सचिन काकडे -- सातारा --यंदा पावसाने पाठ फिरवली असून, उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईची भीषण समस्या भेडसावू लागली आहे. दुष्काळी भागातील जनतेला तर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे ‘पाण्याचा अतिरेक टाळून त्याचा काटकसरीने वापर करा,’ ‘पाणी आणि वाणी जपून वापरा,’ अशा प्रकारच्या अनेक संदेशांच्या माध्यमातून शोशल मीडियावर पाणी बचतीबाबत जागृती केली जात आहे. पाऊस कमी झाल्याने यंदा जलस्त्रोत उन्हाळ्यापूर्वीच आटले आहे. परिणामी सातारा जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बळीराजासह अनेकांची धडपड सुरू झाली असताना शोशल मीडियावरही दरदरोज पाणी बचतीच्या संदेशांचा महापूर लोटत आहे. ‘पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. पाणी आहे तर जीवन आहे. त्यामुळे किमान पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचा काटकसीने वापर करा. रोज गाड्या धुवू नका, अंगणात पाणी श्ािंपडू नका,’ असे शेकडो संदेश सध्या सोशल मीडियावर झळकू लागले आहे. व्हॉट्स अ‍ॅप किंवा फेसबूकवर आलेला संदेश झटपट दुसऱ्या ग्रुपमध्ये फिरताना दिसत आहे. अनेक जण हे संदेश ‘लाईक’ करून तत्काळ पुढे पाठवितात. अशा व्यक्तींना ‘केवळ फॉरवर्ड करू नका तर प्रत्यक्ष कृती करा’ अशी ‘कमेंट’ ही लगेच दिली जात आहे. बऱ्याचदा आपण पहाटे नळाला पाणी येताच घरातील शिळे पाणी ओतून टाकतो व ताज्या पाण्याने भांडी भरतो. खरं तर धरणात किंवा तलावातील पाणी हे ताजं नसतंच. ते पावसाळ्यात साठलेलं पाणी असतं. फक्त ते पाईपलाईनद्वारे दररोज सोडलं जातं आणि आपण हे पाणी ताजं म्हणून वापरतो. गृहिणींनी या गोष्टीचा विचार करून पाण्याची बचत करावी, पाणी ओतून न देता त्याचा काटकसरीने वापर करावा, असा सल्लाही गृहिणींना सोशल मीडियाद्वारे दिला जात आहे. माणसांप्रमाणे मुक्या जनावरांनाही पाण्याची तितकीच गरच भासते. त्यामुळे आपल्या घरावर, घराशेजारी अथवा झाडावर पाण्याने भरलेल्या बाटल्या, मडकी ठेवून मुक्या प्राण्यांवर ओढावणारे संकट टाळा असे आवाहनही सोशल मीडियाद्वारे केले जात आहे. घरातील कपडे व अंघोळीचे पाणी हे वाया न घालविता त्याचा झाडांसाठी उपयोग करा. जेणे करून वृक्षवल्लींचे अस्तित्व टिकून राहील. असेही याठिकाणी ठणकावून सांगितले जात आहे. अनेकांनी या संकटाचे गांभीर्य ओळखून पाण्याची काटकसर सुरू केलीही असेल. मात्र, केवळ या ‘सोशल’ विषय केवळ सोशल मीडियावर न राहता तो प्रत्येक्ष कृतीत आणने अत्यंत महत्त्वाचे आहे. जादू वगैरे काही होणार नाही...यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. धरणातील पाणी कमी झाले आहे. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करू शकता:१. रोज गाड्या धुवू नका.२. अंगणात पाणी शिपडू नका. ३. सतत नळ चालू ठेऊ नका.४. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करून त्या योगे पाणी वाचवूया.५. घरातील गळके नळ दुरुस्त करा६. सोसायटीतील गळकी टाकी , पाइप , बॉल कॉक दुरुस्त करा७. या संकटाचा एकत्र सामना करूया.वरील संदेश ५ ग्रुप मध्ये पाठवा..जादू वगैरे काही होणार नाही; पण नक्की चांगली बातमी पसरवल्याचे समाधान मिळेल.. अशा प्रकारच्या संदेशांमधून सोशल मीडियावर पाणीबचतीबाबत प्रबोधन केले जात आहे.