शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरातला धबधबा कोसळू लागला; खळखळणा-या नदीत मिसळून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 13:43 IST

निसर्गसौंदर्याचं मोठं वरदान लाभलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात असंख्य पर्यटकांची पावलं सह्याद्रीच्या डोंगररांगात वळतात.

सातारा : जिल्ह्याला निसर्गसौंदर्याचं मोठं वरदान लाभलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात असंख्य पर्यटकांची पावलं सह्याद्रीच्या डोंगररांगात वळतात. अशाच प्रकारे आता पावसाने धुवांधार बरसात केल्यामुळे सह्याद्रीच्या कड्याकपायातून धबधबे कोसळू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांचे पाय सह्याद्रीच्या डोंगररांगेत पडू लागले आहेत. यावरून असेच म्हणावसं वाटतं की ‘डोंगरातला धबधबा कोसळू लागला; खळखळणा-या नदीत मिसळून गेला.’ 

सातारा जिल्हा सृष्टीसौंदर्य तसेच जैवविविधतेने नटला आहे. येथे पूर्वेला पाऊस कमी आणि पश्चिमेला धुवांधार अशीही स्थिती आहे. येथील निसर्गसौंदर्याने तर भरभरून दिले आहे. त्यामुळे कास, पाचगणी, महाबळेश्वर, तापोळा, कोयना, बामणोली या भागात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पावसाळ्यात तर या परिसरातून माघारी जाऊच नये, असे वाटून जाते. याला कारण म्हणजे पावसातील मनसोक्त भिजणं. शेकडो फुटावरून कोसळणा-या धबधब्याचं रोरावत येणं, निसर्गाची हिरवाई हे सर्वच मोहवून टाकते. आता पावसाळ्यातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. 

सध्या जिल्ह्यातील ठोसेघर, ओझर्डे, भांबवलीचे धबधबे भरभरून कोसळू लागले आहेत. त्यामुळे पावसाळी सहल करणा-या तरुण पर्यटक याकडे वळू लागले आहेत. सातारा शहरापासून २५ किलोमीटरवर असणारा ठोसेघर धबधबा हा जिल्ह्यातील मोठा आहे. शेकडो फुटावरून पाणी खाली पडते. येथील पर्यटकांना धबधबा पाहण्यासाठी गॅलरी केली आहे. त्यामधून या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहता येते.  कोयनानगरजवळील ओझर्डे धबधबाही पर्यटकांना वेड लावणारा आहे. दुरूनच या धबधब्यातून पडणारं पांढरं शुभ्र पाणी नजरेस पडतं. दाट, हिरव्यागार झाडीतून जाताना धबधबा पाहणं मन हरवून जाणारं असतं. 

सातारा तालुक्यातीलच भांबवलीतील वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. अलीकडेच त्याला शासनाने ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे. या धबधब्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर कास पुष्प पठार आहे. भांबवलीपर्यंत गाडीची सोय असली तरी धबधब्यापर्यंत रस्त्याची सोय नाही. येथील निसर्गसौंदर्य अबाधित राहिले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर