शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

डोंगरातला धबधबा कोसळू लागला; खळखळणा-या नदीत मिसळून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 13:43 IST

निसर्गसौंदर्याचं मोठं वरदान लाभलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात असंख्य पर्यटकांची पावलं सह्याद्रीच्या डोंगररांगात वळतात.

सातारा : जिल्ह्याला निसर्गसौंदर्याचं मोठं वरदान लाभलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात असंख्य पर्यटकांची पावलं सह्याद्रीच्या डोंगररांगात वळतात. अशाच प्रकारे आता पावसाने धुवांधार बरसात केल्यामुळे सह्याद्रीच्या कड्याकपायातून धबधबे कोसळू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांचे पाय सह्याद्रीच्या डोंगररांगेत पडू लागले आहेत. यावरून असेच म्हणावसं वाटतं की ‘डोंगरातला धबधबा कोसळू लागला; खळखळणा-या नदीत मिसळून गेला.’ 

सातारा जिल्हा सृष्टीसौंदर्य तसेच जैवविविधतेने नटला आहे. येथे पूर्वेला पाऊस कमी आणि पश्चिमेला धुवांधार अशीही स्थिती आहे. येथील निसर्गसौंदर्याने तर भरभरून दिले आहे. त्यामुळे कास, पाचगणी, महाबळेश्वर, तापोळा, कोयना, बामणोली या भागात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पावसाळ्यात तर या परिसरातून माघारी जाऊच नये, असे वाटून जाते. याला कारण म्हणजे पावसातील मनसोक्त भिजणं. शेकडो फुटावरून कोसळणा-या धबधब्याचं रोरावत येणं, निसर्गाची हिरवाई हे सर्वच मोहवून टाकते. आता पावसाळ्यातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. 

सध्या जिल्ह्यातील ठोसेघर, ओझर्डे, भांबवलीचे धबधबे भरभरून कोसळू लागले आहेत. त्यामुळे पावसाळी सहल करणा-या तरुण पर्यटक याकडे वळू लागले आहेत. सातारा शहरापासून २५ किलोमीटरवर असणारा ठोसेघर धबधबा हा जिल्ह्यातील मोठा आहे. शेकडो फुटावरून पाणी खाली पडते. येथील पर्यटकांना धबधबा पाहण्यासाठी गॅलरी केली आहे. त्यामधून या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहता येते.  कोयनानगरजवळील ओझर्डे धबधबाही पर्यटकांना वेड लावणारा आहे. दुरूनच या धबधब्यातून पडणारं पांढरं शुभ्र पाणी नजरेस पडतं. दाट, हिरव्यागार झाडीतून जाताना धबधबा पाहणं मन हरवून जाणारं असतं. 

सातारा तालुक्यातीलच भांबवलीतील वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. अलीकडेच त्याला शासनाने ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे. या धबधब्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर कास पुष्प पठार आहे. भांबवलीपर्यंत गाडीची सोय असली तरी धबधब्यापर्यंत रस्त्याची सोय नाही. येथील निसर्गसौंदर्य अबाधित राहिले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर