शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती गंभीर; संभाव्य आराखडा तयार 

By नितीन काळेल | Updated: December 21, 2023 19:28 IST

माण, खटाव, वाई, कोरेगाव तालुक्यात भीषणता वाढणार

सातारा : जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने टंचाईची स्थिती गंभीर बनत असून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते जूनपर्यंतचा संभाव्य टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ३५ कोटींचा खर्च येऊ शकतो. यामध्ये ५२१ टॅंकर लागू शकतात. तसेच नळपाणी पुरवठा योजना, विहिरी अधिग्रहित आदी खर्चाचा समावेश आहे. तर माण, खटाव, वाई, कोरेगाव तालुक्यात भीषणता वाढणार आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच पिके आणि पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबून असते. मागील चार वर्षांत चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे टंचाईवर फारसा खर्च झाला नाही. पण, यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७० टक्केच पाऊस झाला. तसेच कोणत्याही तालुक्यात १०० टक्के पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे टंचाईची स्थिती आहे. त्यातच यंदा कमी पावसामुळे टंचाईची भीषणता वाढणार आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते जून २०२४ पर्यंतच्या ९ महिन्यांसाठी संभाव्य टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यानुसार टंचाई निवारणावर ३५ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबरपासून तीन-तीन महिन्यांचा आराखडा केला आहे. त्यानुसार १ हजार ८३९ गावे आणि २ हजार १२२ वाड्यांना टंचाईची झळ पोहोचू शकते. यामध्ये नवीन ३२० विहिरी घ्याव्या लागतील. ४४ नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करावी लागणार आहे. ३८ तात्पुरत्या पुरक नळपाणी पुरवठा योजना कराव्यात लागतील. तर ५२१ टॅंकर लागणार आहेत. तसेच १०८ विहिरींसाठी खोलीकरण, गाळ काढणे आणि आडवी बोअर घेणे अशी कामे करावी लागू शकतात. टंचाईच्या या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी