शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती गंभीर; संभाव्य आराखडा तयार 

By नितीन काळेल | Updated: December 21, 2023 19:28 IST

माण, खटाव, वाई, कोरेगाव तालुक्यात भीषणता वाढणार

सातारा : जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने टंचाईची स्थिती गंभीर बनत असून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते जूनपर्यंतचा संभाव्य टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ३५ कोटींचा खर्च येऊ शकतो. यामध्ये ५२१ टॅंकर लागू शकतात. तसेच नळपाणी पुरवठा योजना, विहिरी अधिग्रहित आदी खर्चाचा समावेश आहे. तर माण, खटाव, वाई, कोरेगाव तालुक्यात भीषणता वाढणार आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच पिके आणि पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबून असते. मागील चार वर्षांत चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे टंचाईवर फारसा खर्च झाला नाही. पण, यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७० टक्केच पाऊस झाला. तसेच कोणत्याही तालुक्यात १०० टक्के पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे टंचाईची स्थिती आहे. त्यातच यंदा कमी पावसामुळे टंचाईची भीषणता वाढणार आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते जून २०२४ पर्यंतच्या ९ महिन्यांसाठी संभाव्य टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यानुसार टंचाई निवारणावर ३५ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबरपासून तीन-तीन महिन्यांचा आराखडा केला आहे. त्यानुसार १ हजार ८३९ गावे आणि २ हजार १२२ वाड्यांना टंचाईची झळ पोहोचू शकते. यामध्ये नवीन ३२० विहिरी घ्याव्या लागतील. ४४ नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करावी लागणार आहे. ३८ तात्पुरत्या पुरक नळपाणी पुरवठा योजना कराव्यात लागतील. तर ५२१ टॅंकर लागणार आहेत. तसेच १०८ विहिरींसाठी खोलीकरण, गाळ काढणे आणि आडवी बोअर घेणे अशी कामे करावी लागू शकतात. टंचाईच्या या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी