शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली; ३३ गावे, १११ वाड्या तहानल्या

By नितीन काळेल | Updated: June 9, 2023 18:21 IST

लवकर पाऊस न झाल्यास टंचाई आणखी वाढण्याचा अंदाज

सातारा : मान्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील टंचाईत वाढ होत असून सध्या ८ तालुक्यांतील ३३ गावे आणि तब्बल १११ वाड्यांसाठी टँकर सुरू आहेत. या टॅंकरवर ४० हजार नागरिक आणि ५ हजार पशुधन अवलंबून आहे. तर लवकर पाऊस न झाल्यास टंचाई आणखी वाढण्याचा अंदाज आहे.जिल्ह्यात मागील काही वर्षांत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी मुरत आहे. अशी कामे अधिक करून माण, खटाव, फलटण, कोरेगाव अशा दुष्काळी तालुक्यांत झाली आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे टंचाई कमी झाली आहे. यावर्षी तर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून टंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या. पण, यावर्षी उन्हाळी पाऊस कमी पडला. तसेच मान्सूनचा पाऊस उशिरा येणार असल्याने टंचाईत वाढ झाली आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने मागणीप्रमाणे टँकर सुरू केले आहेत. सध्या माण, खटाव, वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावळी आणि कऱ्हाड या तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माणमधील १६ गावे आणि १०३ वाड्यांत टंचाई आहे. बिदाल, मलवडी, म्हसवड, कुकुडवाड सर्कलमध्ये टंचाई जाणवत आहे. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, वारुगड, भाटकी, खडकी, धुळदेव, विरळी आदी गावे आणि परिसरातील वाडी वस्तींवरील लोकांना आणि पशुधनासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.खटाव तालुक्यात एकाच गावात टंचाई स्थिती आहे. भोसरे सर्कलमधील गावासाठी टँकर सुरू झाला आहे. वाई तालुक्यात २ गावे आणि २ वाड्यांत टंचाई निर्माण झाली आहे. ही गावे मांढरदेव परिसरातील आहेत. पाटण तालुक्यातील आंब्रुळकरवाडी - भोसगावला टँकर सुरू करण्यात आला आहे. महाबळेश्वर तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे.मागील आठवड्यात १ गाव आणि एका वाडीसाठी टँकरने पणीपुरवठा केला जात होता. सध्या ६ गावे आणि एका वाडीत टंचाई निर्माण झाली आहे. आंब्रळ, भीमनगर, तापोळा, वनावली, सोळशी, वेळापूर, कोट्रोशी येथे टंचाई आहे. सातारा तालुक्यात १ गाव आणि ३ वाड्या तहानल्या आहेत. तर जावळी तालुक्यात २ गावे आणि एका वाडीसाठी टॅंकर सुरू करण्यात आलेला आहे. कऱ्हाड तालुक्यातही टंचाई वाढली असून सध्या ५ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तर जिल्ह्यातील खंडाळा, कोरेगाव आणि फलटण तालुक्यात टॅंकर सुरू नाही.माणमध्ये १५ टॅंकरवर २६ हजार लोकांची तहान अवलंबून

जिल्ह्यात सध्या माण तालुक्यातच टंचाईची भीषणता वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने मागणीनुसार टॅंकर सुरु केले आहेत. माणमध्ये १५ टॅंकर सुरू असून त्यावर २६ हजार ६६३ नागरिकांची तहान अवलंबून आहे. तर जिल्ह्यात सध्या ४० हजार ४१७ नागरिक आणि ५ हजार ९९ पशुधन बाधित आहे. त्यासाठी २९ टॅंकर मंजूर आहेत. तर प्रत्यक्षात २६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी