शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

उत्तरमांड प्रकल्पातून पाणी सोडले

By admin | Updated: January 21, 2015 23:56 IST

शेतकरी आक्रमक : अभियंत्याच्या धमकीमुळे धरणग्रस्तांनी ठोकले होते टाळे

चाफळ : उत्तरमांड धरणग्रस्तांनी प्रलंबित मागण्यांसाठी व प्रकल्पाचे उपअभियंता व्ही. व्ही. मुंजाप्पा यांनी दिलेल्या धमकीच्या विरोधात धरणावरील पाणी सोडण्याच्या जॅकवेलच्या इमारतीस टाळे ठोकून निषेध नोंदविला होता. मात्र, याला माजगाव येथील शेतकऱ्यांनी विरोध करीत टाळे तोडण्याचा इशारा दिला. अखेर धरणग्रस्तांनीच मंगळवारी इमारतीचे टाळे काढून टाकत नदीपात्रात पाणी सोडले.गत चौदा वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या मागण्यांसाठी माथनेवाडीचे धरणग्रस्त आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहेत. प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून धरणग्रस्तांनी जलसमर्पण आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्या अनुषंगाने दि.१६ रोजी प्रांताधिकाऱ्यांनी धरणग्रस्तांच्या व्यथा समजून घेतल्या होत्या. या बैठकीस गैरहजर राहिलेल्या धरणाच्या अधिकाऱ्यांकडून धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ एकावडे यांना फोनवरून झालेली दमबाजी व त्यामुळे झालेल्या वादाचा चेंडू अखेर धरणग्रस्तांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या कोेर्टात टाकला. आमदार देसाई यांनी मला विचारल्याशिवाय उत्तरमांड धरणातील पाणी सोडायचे नाही, असे संबंधित अधिकाऱ्यांना कळवा. तोपर्यंत पाणी सोडण्याच्या खोलीला कुलूप लावा, असे सांगितले होते. आमदार देसार्इंच्या सांगण्यानुसार माथनेवाडीच्या धरणग्रस्तांनी कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी जॅकवेलच्या इमारतीस टाळे ठोकले होते. मात्र, धरणाचे पाणी नदीपात्रात न सोडल्यामुळे चाफळसह माजगावमधील सुमारे पंधराशे एकर क्षेत्रातील ऊस, गहू, हरभरा या पिकांचे पाण्याअभावी मोठे नुकसान होत असल्याने माजगाव येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत इरिगेशने इमारतीचे टाळे गुरुवारपर्यंत न काढल्यास गनिमी काव्याने टाळे काढण्याचा इशारा दिला होता. माजगाव ग्रामस्थांच्या इशाऱ्याचा धसका घेऊन धरणग्रस्तांनी मंगळवारी दुपारी इरिगेशन इमारतीचे कुलूप काढून नदीपात्रात पाणी सोडण्यास परवानगी दिली. (वार्ताहर)