शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावात पाणी योजना तरीही वणवण- टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:02 IST

सूर्यकांत निंबाळकर । आदर्की : फलटण पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी व नेते आहेत, ...

ठळक मुद्दे: आदर्की मंडलातील दहा गावांमधील ग्रामस्थांची पायपीट सुरूच--खोल-खोल पाणी !

सूर्यकांत निंबाळकर ।आदर्की : फलटण पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी व नेते आहेत, कारण आदर्की मंडलातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या चार ते पाच पाणीपुरवठा योजना असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. फलटण पश्चिम भागातील आदर्की मंडलात दहा ते एकरा गावे येतात. या गावात जिल्हा परिषद, आमदार, खासदार, जिल्हा परिषद व अन्य निधीतून पाणीपुरवठा योजना राबवताना भूजलपातळीचा विचार न करता सर्व्हे, विहिरीचे खोदकाम ओढ्याकडेला केले आहे.

ठेकेदाराने विहिरीचे काम पाण्याअभावी खोलीकरण केले नाही, त्यामुळे पाणीसाठा होत नाही. पावसाळ्यात ओढ्याला पाणी असते, त्यामुळे पाणी टंचाई भासत नाही. अधिकारी, ठेकेदार संगनमत करून बिले काढतात. प्रत्येक टंचाई काळात नवीन पाणीपुरवठा योजना राबवतात; मात्र जुन्या तशाच पडून राहतात.

आदर्की खुर्द येथे दुरुस्तीसाठी खासदार फंडातून स्वंतत्र पाणीपुरवठा टाकी यावर लाखो रुपये खर्च केले, त्याच दुरुस्तीसाठी पेयजल योजनेतून बिचकुले वस्तीसाठी दुसरी पाणीपुरवठा योजना राबवली. बिचकुले वस्तीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवली आहे.

दोन विहिरी आहेत; परंतु दुरुस्तीसाठी हातपंपावर मोटर बसवली आहे.काकडे वस्तीसाठी जुन्या आडाचे रुंदीकरण केले व स्वतंत्र पाण्याची टाकी बांधून नळ पाणीपुरवठा योजना राबवली आहे, तीही बंद आहे. त्यानंतर दुसरी गावातील विहिरीवरून पाईपलाईन करून पाण्याची उपसा केली. वरील सर्व योजना बंद आहेत. पाच वर्षांपूर्वी पेयजेल योजनेतून अंदाजे ७२ लाख खर्चून पाणीपुरवठा योजना राबवताना स्वतंत्र विहीर खोदली, तीही पहिल्या योजनेच्या विहिरींपासून केवळ दहा मीटर अंतरावर ओढ्यातच. त्यामुळे आता दोन्ही विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

आदर्की बुद्रुकमधील शिंदे मळ्यातील पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडली म्हणून २००४ मध्ये आदर्की खुर्द येथे विहीर खोदून चार किलोमीटर पाईपलाईन योजना सुरू केली. आता ती बंद असून, विहीर व पाईपलाईन तशीच व दुसरी लोकवर्गणीतून हिंगणगाव धरणात विहीर खोदून दुसरी योजना राबवली आहे. बिबी येथे २००४ मध्ये पाणी टंचाई काळात घाडगेवाडी येथून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी लाखो रुपये खर्चून पाईपलाईनद्वारे बिबी गावास नेले. त्यानंतर धोम-बलकवडी कालव्याला आले. बिबीत पाणी टंचाई दूर झाली. लाखो रुपये खर्चून केलेली पाईपलाईन तशीच आहे. या गावात शासनाकडून विहीर अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे.

कालव्याशेजारील गावाला टँकरने पाणी..घाडगेवाडी येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुळीकवाडी धरणाखाली विहीर खोदूनही पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर आज घाडगेवाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सासवड येथे अनेक पाणीपुरवठा योजना लाखो रुपये खर्चून पूर्ण केल्या. गतवर्षी मुळीकवाडी धरणातून पाणी आणले; पण यावर्षी धरणच आटले. आता गावाला नीरा उजवा कालव्याशेजारी गावाला पाणी पुरवठा केला जातो तर वाडी-वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

आदर्की मंडलात पाणी योजनेद्वारे पाणी विहिरीत सोडले जाते. त्यामुळे वृद्धांना अशा प्रकारे सायकलवरून पाणी आणावे लागत आहे. 

सार्वजनिक विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडले जाते; पण पिण्यासाठी पाणी सायकलवरून बाहेरून आणावे लागते. ही पायपीट कधी थांबणार.- आनंदराव सापते, घाडगेवाडी, ता. फलटण

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई