शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

प्रत्येक गावात पाणी योजना तरीही वणवण- टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:02 IST

सूर्यकांत निंबाळकर । आदर्की : फलटण पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी व नेते आहेत, ...

ठळक मुद्दे: आदर्की मंडलातील दहा गावांमधील ग्रामस्थांची पायपीट सुरूच--खोल-खोल पाणी !

सूर्यकांत निंबाळकर ।आदर्की : फलटण पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी व नेते आहेत, कारण आदर्की मंडलातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या चार ते पाच पाणीपुरवठा योजना असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. फलटण पश्चिम भागातील आदर्की मंडलात दहा ते एकरा गावे येतात. या गावात जिल्हा परिषद, आमदार, खासदार, जिल्हा परिषद व अन्य निधीतून पाणीपुरवठा योजना राबवताना भूजलपातळीचा विचार न करता सर्व्हे, विहिरीचे खोदकाम ओढ्याकडेला केले आहे.

ठेकेदाराने विहिरीचे काम पाण्याअभावी खोलीकरण केले नाही, त्यामुळे पाणीसाठा होत नाही. पावसाळ्यात ओढ्याला पाणी असते, त्यामुळे पाणी टंचाई भासत नाही. अधिकारी, ठेकेदार संगनमत करून बिले काढतात. प्रत्येक टंचाई काळात नवीन पाणीपुरवठा योजना राबवतात; मात्र जुन्या तशाच पडून राहतात.

आदर्की खुर्द येथे दुरुस्तीसाठी खासदार फंडातून स्वंतत्र पाणीपुरवठा टाकी यावर लाखो रुपये खर्च केले, त्याच दुरुस्तीसाठी पेयजल योजनेतून बिचकुले वस्तीसाठी दुसरी पाणीपुरवठा योजना राबवली. बिचकुले वस्तीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवली आहे.

दोन विहिरी आहेत; परंतु दुरुस्तीसाठी हातपंपावर मोटर बसवली आहे.काकडे वस्तीसाठी जुन्या आडाचे रुंदीकरण केले व स्वतंत्र पाण्याची टाकी बांधून नळ पाणीपुरवठा योजना राबवली आहे, तीही बंद आहे. त्यानंतर दुसरी गावातील विहिरीवरून पाईपलाईन करून पाण्याची उपसा केली. वरील सर्व योजना बंद आहेत. पाच वर्षांपूर्वी पेयजेल योजनेतून अंदाजे ७२ लाख खर्चून पाणीपुरवठा योजना राबवताना स्वतंत्र विहीर खोदली, तीही पहिल्या योजनेच्या विहिरींपासून केवळ दहा मीटर अंतरावर ओढ्यातच. त्यामुळे आता दोन्ही विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

आदर्की बुद्रुकमधील शिंदे मळ्यातील पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडली म्हणून २००४ मध्ये आदर्की खुर्द येथे विहीर खोदून चार किलोमीटर पाईपलाईन योजना सुरू केली. आता ती बंद असून, विहीर व पाईपलाईन तशीच व दुसरी लोकवर्गणीतून हिंगणगाव धरणात विहीर खोदून दुसरी योजना राबवली आहे. बिबी येथे २००४ मध्ये पाणी टंचाई काळात घाडगेवाडी येथून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी लाखो रुपये खर्चून पाईपलाईनद्वारे बिबी गावास नेले. त्यानंतर धोम-बलकवडी कालव्याला आले. बिबीत पाणी टंचाई दूर झाली. लाखो रुपये खर्चून केलेली पाईपलाईन तशीच आहे. या गावात शासनाकडून विहीर अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे.

कालव्याशेजारील गावाला टँकरने पाणी..घाडगेवाडी येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुळीकवाडी धरणाखाली विहीर खोदूनही पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर आज घाडगेवाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सासवड येथे अनेक पाणीपुरवठा योजना लाखो रुपये खर्चून पूर्ण केल्या. गतवर्षी मुळीकवाडी धरणातून पाणी आणले; पण यावर्षी धरणच आटले. आता गावाला नीरा उजवा कालव्याशेजारी गावाला पाणी पुरवठा केला जातो तर वाडी-वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

आदर्की मंडलात पाणी योजनेद्वारे पाणी विहिरीत सोडले जाते. त्यामुळे वृद्धांना अशा प्रकारे सायकलवरून पाणी आणावे लागत आहे. 

सार्वजनिक विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडले जाते; पण पिण्यासाठी पाणी सायकलवरून बाहेरून आणावे लागते. ही पायपीट कधी थांबणार.- आनंदराव सापते, घाडगेवाडी, ता. फलटण

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई