शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावात पाणी योजना तरीही वणवण- टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:02 IST

सूर्यकांत निंबाळकर । आदर्की : फलटण पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी व नेते आहेत, ...

ठळक मुद्दे: आदर्की मंडलातील दहा गावांमधील ग्रामस्थांची पायपीट सुरूच--खोल-खोल पाणी !

सूर्यकांत निंबाळकर ।आदर्की : फलटण पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी व नेते आहेत, कारण आदर्की मंडलातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या चार ते पाच पाणीपुरवठा योजना असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. फलटण पश्चिम भागातील आदर्की मंडलात दहा ते एकरा गावे येतात. या गावात जिल्हा परिषद, आमदार, खासदार, जिल्हा परिषद व अन्य निधीतून पाणीपुरवठा योजना राबवताना भूजलपातळीचा विचार न करता सर्व्हे, विहिरीचे खोदकाम ओढ्याकडेला केले आहे.

ठेकेदाराने विहिरीचे काम पाण्याअभावी खोलीकरण केले नाही, त्यामुळे पाणीसाठा होत नाही. पावसाळ्यात ओढ्याला पाणी असते, त्यामुळे पाणी टंचाई भासत नाही. अधिकारी, ठेकेदार संगनमत करून बिले काढतात. प्रत्येक टंचाई काळात नवीन पाणीपुरवठा योजना राबवतात; मात्र जुन्या तशाच पडून राहतात.

आदर्की खुर्द येथे दुरुस्तीसाठी खासदार फंडातून स्वंतत्र पाणीपुरवठा टाकी यावर लाखो रुपये खर्च केले, त्याच दुरुस्तीसाठी पेयजल योजनेतून बिचकुले वस्तीसाठी दुसरी पाणीपुरवठा योजना राबवली. बिचकुले वस्तीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवली आहे.

दोन विहिरी आहेत; परंतु दुरुस्तीसाठी हातपंपावर मोटर बसवली आहे.काकडे वस्तीसाठी जुन्या आडाचे रुंदीकरण केले व स्वतंत्र पाण्याची टाकी बांधून नळ पाणीपुरवठा योजना राबवली आहे, तीही बंद आहे. त्यानंतर दुसरी गावातील विहिरीवरून पाईपलाईन करून पाण्याची उपसा केली. वरील सर्व योजना बंद आहेत. पाच वर्षांपूर्वी पेयजेल योजनेतून अंदाजे ७२ लाख खर्चून पाणीपुरवठा योजना राबवताना स्वतंत्र विहीर खोदली, तीही पहिल्या योजनेच्या विहिरींपासून केवळ दहा मीटर अंतरावर ओढ्यातच. त्यामुळे आता दोन्ही विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

आदर्की बुद्रुकमधील शिंदे मळ्यातील पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडली म्हणून २००४ मध्ये आदर्की खुर्द येथे विहीर खोदून चार किलोमीटर पाईपलाईन योजना सुरू केली. आता ती बंद असून, विहीर व पाईपलाईन तशीच व दुसरी लोकवर्गणीतून हिंगणगाव धरणात विहीर खोदून दुसरी योजना राबवली आहे. बिबी येथे २००४ मध्ये पाणी टंचाई काळात घाडगेवाडी येथून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी लाखो रुपये खर्चून पाईपलाईनद्वारे बिबी गावास नेले. त्यानंतर धोम-बलकवडी कालव्याला आले. बिबीत पाणी टंचाई दूर झाली. लाखो रुपये खर्चून केलेली पाईपलाईन तशीच आहे. या गावात शासनाकडून विहीर अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे.

कालव्याशेजारील गावाला टँकरने पाणी..घाडगेवाडी येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुळीकवाडी धरणाखाली विहीर खोदूनही पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर आज घाडगेवाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सासवड येथे अनेक पाणीपुरवठा योजना लाखो रुपये खर्चून पूर्ण केल्या. गतवर्षी मुळीकवाडी धरणातून पाणी आणले; पण यावर्षी धरणच आटले. आता गावाला नीरा उजवा कालव्याशेजारी गावाला पाणी पुरवठा केला जातो तर वाडी-वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

आदर्की मंडलात पाणी योजनेद्वारे पाणी विहिरीत सोडले जाते. त्यामुळे वृद्धांना अशा प्रकारे सायकलवरून पाणी आणावे लागत आहे. 

सार्वजनिक विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडले जाते; पण पिण्यासाठी पाणी सायकलवरून बाहेरून आणावे लागते. ही पायपीट कधी थांबणार.- आनंदराव सापते, घाडगेवाडी, ता. फलटण

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई