शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

महू-हातगेघरचे पाणी ‘कुडाळी’त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:53 IST

प्रस्तावाला मंजुरी : कुडाळ गावच्या मागणीनंतर पाणी आल्याने आनंदाचे वातावरण

सातारा : कुडाळ, शेते, कळंबे, सर्जापूर, उडतारे या गावांची वरदायिनी असणारी कुडाळी नदी सद्य:स्थितीत पूर्णपणे आटलेली आहे. नदी आटल्याने या गावांच्या पाणी योजना अडचणीत आल्या असून, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. कुडाळमध्ये बुधवार-गुरुवारी यात्रा असून, महू-हातगेघरचे पाणी नदीत सोडल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जावळीचे तहसीलदार रणजित देसाई यांनी महू-हातगेघर धरणातील पाणी सोडण्याचे आदेश व्हावेत, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता, हा प्रस्ताव जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पाटबंधारे खात्याकडे पाठविला असून, त्यांच्याकडचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. यात्रेला अवघा एक दिवस राहिला असल्याने कुडाळ ग्रामस्थांमध्ये चिंतेचे तसेच संतापाचे वातावरण आहे. जावळी तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असणाऱ्या कुडाळात ग्रामदैवत वाकडेश्वराची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. कुडाळी नदी कोरडीठाक पडल्याने या नदीलगत असणाऱ्या पाणी योजना बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतीसाठीही पाणी उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. महू-हातगेघर धरणातील पाणी कुडाळी नदीत सोडल्यास कुडाळ, कळंबे, सर्जापूर, उडतारे येथील पाणी योजनांना दिलासा मिळणार आहे. तहसीलदार रणजित देसाई यांनी दिलेल्या प्रस्तावामुळे या चारही गावांमध्ये उत्साह आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी यावर निर्णय घेण्याची शक्यता असून, यात्रेपूर्वी कुडाळी नदीत पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यामुळे पाच ते सहा गावांतील लोक आनंदित आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. (प्रतिनिधी)