शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

महू-हातगेघरचे पाणी ‘कुडाळी’त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:53 IST

प्रस्तावाला मंजुरी : कुडाळ गावच्या मागणीनंतर पाणी आल्याने आनंदाचे वातावरण

सातारा : कुडाळ, शेते, कळंबे, सर्जापूर, उडतारे या गावांची वरदायिनी असणारी कुडाळी नदी सद्य:स्थितीत पूर्णपणे आटलेली आहे. नदी आटल्याने या गावांच्या पाणी योजना अडचणीत आल्या असून, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. कुडाळमध्ये बुधवार-गुरुवारी यात्रा असून, महू-हातगेघरचे पाणी नदीत सोडल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जावळीचे तहसीलदार रणजित देसाई यांनी महू-हातगेघर धरणातील पाणी सोडण्याचे आदेश व्हावेत, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता, हा प्रस्ताव जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पाटबंधारे खात्याकडे पाठविला असून, त्यांच्याकडचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. यात्रेला अवघा एक दिवस राहिला असल्याने कुडाळ ग्रामस्थांमध्ये चिंतेचे तसेच संतापाचे वातावरण आहे. जावळी तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असणाऱ्या कुडाळात ग्रामदैवत वाकडेश्वराची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. कुडाळी नदी कोरडीठाक पडल्याने या नदीलगत असणाऱ्या पाणी योजना बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतीसाठीही पाणी उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. महू-हातगेघर धरणातील पाणी कुडाळी नदीत सोडल्यास कुडाळ, कळंबे, सर्जापूर, उडतारे येथील पाणी योजनांना दिलासा मिळणार आहे. तहसीलदार रणजित देसाई यांनी दिलेल्या प्रस्तावामुळे या चारही गावांमध्ये उत्साह आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी यावर निर्णय घेण्याची शक्यता असून, यात्रेपूर्वी कुडाळी नदीत पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यामुळे पाच ते सहा गावांतील लोक आनंदित आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. (प्रतिनिधी)