शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्न लवकरच निकाली काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : ‘मायणी परिसरातील गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठीचे निवेदन दिवड (ता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : ‘मायणी परिसरातील गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठीचे निवेदन दिवड (ता. माण) येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. यावेळी या भागातील पाणी प्रश्न लवकरच निकाली काढू,’ असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

सातारा-सांगली जिल्ह्यांच्या सीमा भागातून सोलापूर जिल्ह्यात टेंभू योजनेचे पाणी जात आहे. हे पाणी खटाव तालुक्याच्या कलेढोण गावाच्या हद्दीजवळून जात आहे. तसेच या टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रात परिसरातील पाचवड, मुळकवाडी, कलेढोण, अनफळे, पडळ, औतरवाडी, ढोकळवाडी, गारुडी, तरसवाडी, ढोकळवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, हिवरवाडी, गारळेवाडी, कठरेवाडी, आगासवाडी या सोळा गावांचा समावेश आहे.

गेल्या दोन दशकांपासून या गावांना शेतीसाठी टेंभू योजनेचे पाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपर्यंत अनेक लहान-मोठी आंदोलने केली. तरीही शासन दरबारी कोणतीही दखल घेतली गेली नाही. येथील सोळा गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन टेंभू पाण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून लढा उभा केला आहे. या लढ्यासाठी एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी दिवड (ता. माण) या ठिकाणी विविध विकासकामांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यांच्याकडे निवेदन दिले.

परिसरातील सोळा गावांतील ग्रामस्थांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीने निवेदन तयार केले होते. या तयार केलेल्या निवेदनामध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी गावांना द्यावे, पाणी मिळाले तर युवकांचा हाताला रोजगार उपलब्ध होईल असे म्हटले होते. संबंधित परिसरातील सोळा गावांच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवेदन दिले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच या भागातील शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू असे आश्वासन दिले.

(चौकट)

ठोस भूमिका घेणे गरजेचे...

या सोळा गावांतील शेती फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या ठिकाणी कोणतीही ठोस पाणी योजना नाही. त्यामुळे अनेकवेळा निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते. तर आलेले पीक जगविण्यासाठी या भागातील शेतकरी प्रसंगी पाणी विकत घेऊन शेती व्यवसाय करतात. त्यामुळे शासनाने या भागातील सोळा गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. तसेच यावर ठोस भूमिका घेणे तितकेच गरजेचे आहे.

२६मायणी

दिवड (ता. माण) येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टेंभू योजनेच्या पाण्यासंदर्भात सोळा गावातील ग्रामस्थांनी निवेदन दिले.

(छाया : संदीप कुंभार)