शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

पाणीप्रश्न लवकरच निकाली काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : ‘मायणी परिसरातील गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठीचे निवेदन दिवड (ता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : ‘मायणी परिसरातील गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठीचे निवेदन दिवड (ता. माण) येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. यावेळी या भागातील पाणी प्रश्न लवकरच निकाली काढू,’ असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

सातारा-सांगली जिल्ह्यांच्या सीमा भागातून सोलापूर जिल्ह्यात टेंभू योजनेचे पाणी जात आहे. हे पाणी खटाव तालुक्याच्या कलेढोण गावाच्या हद्दीजवळून जात आहे. तसेच या टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रात परिसरातील पाचवड, मुळकवाडी, कलेढोण, अनफळे, पडळ, औतरवाडी, ढोकळवाडी, गारुडी, तरसवाडी, ढोकळवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, हिवरवाडी, गारळेवाडी, कठरेवाडी, आगासवाडी या सोळा गावांचा समावेश आहे.

गेल्या दोन दशकांपासून या गावांना शेतीसाठी टेंभू योजनेचे पाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपर्यंत अनेक लहान-मोठी आंदोलने केली. तरीही शासन दरबारी कोणतीही दखल घेतली गेली नाही. येथील सोळा गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन टेंभू पाण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून लढा उभा केला आहे. या लढ्यासाठी एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी दिवड (ता. माण) या ठिकाणी विविध विकासकामांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यांच्याकडे निवेदन दिले.

परिसरातील सोळा गावांतील ग्रामस्थांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीने निवेदन तयार केले होते. या तयार केलेल्या निवेदनामध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी गावांना द्यावे, पाणी मिळाले तर युवकांचा हाताला रोजगार उपलब्ध होईल असे म्हटले होते. संबंधित परिसरातील सोळा गावांच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवेदन दिले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच या भागातील शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू असे आश्वासन दिले.

(चौकट)

ठोस भूमिका घेणे गरजेचे...

या सोळा गावांतील शेती फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या ठिकाणी कोणतीही ठोस पाणी योजना नाही. त्यामुळे अनेकवेळा निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते. तर आलेले पीक जगविण्यासाठी या भागातील शेतकरी प्रसंगी पाणी विकत घेऊन शेती व्यवसाय करतात. त्यामुळे शासनाने या भागातील सोळा गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. तसेच यावर ठोस भूमिका घेणे तितकेच गरजेचे आहे.

२६मायणी

दिवड (ता. माण) येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टेंभू योजनेच्या पाण्यासंदर्भात सोळा गावातील ग्रामस्थांनी निवेदन दिले.

(छाया : संदीप कुंभार)