शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

कर्नाटकची तहान भागविण्यासाठी कोयनेतून पाणी...

By नितीन काळेल | Updated: May 2, 2023 20:40 IST

तीन टीएमसीची मागणी : धरणातून एकूण ४२०० क्यूसेक विसर्ग

सातारा :कर्नाटक शासनाने पिण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आदेश मिळाल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून एक टीएमसी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. तर सध्या पायथा वीजगृह, सिंचन आणि पिण्यासाठी मिळून धरणातून एकूण ४२०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू झाला आहे.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. दरवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात धरण भरते. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच, सिंचन आणि पिण्यासाठी पाणीही सोडले जाते. उन्हाळ्यात ही मागणी अधिक वाढत जाते. त्याप्रमाणात पाणी विसर्ग केला जातो. सध्या धरणात ३८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एक महिन्यानंतर मान्सूनला सुरुवात होईल. तोपर्यंत हे पाणी पुरवावे लागणार आहे.

त्यातच सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातील दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यामुळे २१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नदी विमोचकातूनही पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत होते. असे असतानाच कडक उन्हामुळे पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापन मागणीनुसार पाणी सोडत आहे. असे असतानाच आता कर्नाटक शासनाने पिण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

कर्नाटकने तीन टीएमसीची मागणी केली असलीतरी त्यापैकी एक टीएमसी पाणी सोडण्याबाबतचा आदेश धरण व्यवस्थापनला मिळाला आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री आठपासूनच कर्नाटकसाठी पिण्याच्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदी विमोचकाद्वारे हे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे विमोचकातून आता २१०० आणि पायथा वीजगृह २१०० असा मिळून कोयना धरणातून ४२०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू झाला आहे.

टॅग्स :satara-acसाताराKarnatakकर्नाटक