शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

Satara: रब्बी पेरणी पूर्ण होण्यापूर्वीच सिंचनासाठी पाणी, धरणांतील कमी साठा चिंताजनक

By नितीन काळेल | Updated: October 28, 2023 19:22 IST

कोयनेबरोबरच उरमोडीतूनही विसर्ग..

सातारा : रब्बी हंगामाची पेरणी सुरू असतानाच साताऱ्यासह शेजारील जिल्ह्यातही दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी पाणी विसर्गाची मागणी होत आहे. पण, पर्जन्यमान कमी झाल्याने धरणांतच पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे आगामी आठ महिन्यांचा विचार करता पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.मान्सूनचा पाऊस वेळेत आणि चांगला झाला तरच खरीप आणि रब्बी हंगामही पदरी पडतात. पण, यावर्षी मान्सूनच्या पावसाने घात केला. उशिरा सुरुवात आणि त्यानंतर वारंवार दडी होती. त्यातच जून ते सप्टेंबरपर्यंतच्या चार महिन्यात सरासरीच्या ६० टक्क्यांवरच पाऊस झाला. तसेच जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. यामुळे दुष्काळीस्थिती निर्माण झालेली आहे. अशातच आता शेतकरी रब्बी हंगामातील पेरणी करत आहेत. त्यामुळे पिकांनाही पाणी लागणार आहे. परिणामी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

सातारा जिल्ह्यात प्रमुख मोठे सहा पाणी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. यामधील कोयना धरण हे १०५.२५ टीएमसी क्षमतेचे आहे. या धरणातील पाण्यावर अनेक गावांची तहान भागते. तसेच टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन पाणी योजनाही अवलंबून आहेत. अशातच सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी झाली. त्यामुळे शुक्रवारपासून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पण, गेल्या दीड महिन्यात कोयनेतून सांगलीसाठी तीनवेळा पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे आगामी काळातही सिंचनासाठी मागणी वाढणार असल्याने कोयना धरणातील साठ्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.कोयना धरणातील पाणी सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी जाते. तसेच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यालालाही सिंचनासाठी पाणी सोडले जाते. सध्या कोयना धरणात ८९ टीएमसीच पाणीसाठा आहे. त्यात वीजनिर्मिती आणि शेती पाण्याचा विचार करता पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. तर ९.९६ टीएमसीच्या उरमोडी धरणावर सातारसह माण आणि खटाव या तालुक्यातील सिंचन योजना अवलंबून आहेत. सध्या धरणात ५.८६ टीएमसीच पाणी आहे. हे पाणी पुरवताना पुढील आठ महिन्यांचा विचार करावा लागणार आहे. धोम-बलकवडी धरणातील पाणीही फलटण तालुक्यातील सिंचनासाठी सोडण्यात येते. या धरणातही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात सिंचनासाठी पाणी मोठ्या प्रमाणात सोडावे लागणार असल्याने धरणे लवकरच खाली होण्याची भीती आहे.कोयनेबरोबरच उरमोडीतूनही विसर्ग..

सातारा तालुक्यातील उरमोडी धरण दुष्काळी भागासाठी वरदानच ठरले आहे. या धरणातील पाण्यावर माण आणि खटाव या दोन्ही तालुक्यातील हजारो एकर शेती सिंचनाखाली येते. सध्या या धरणातून १७५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीत करण्यात येत आहे. हे पाणी सिंचन आणि पिण्यासाठीही जात आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील धोका लक्षात घेता साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाटबंधारे विभागबरोबर बैठक घेऊन उरमोडीतील साताऱ्याच्या वाटणीचे पाणी कोणालाही देऊ नये, अशी सूचना केली आहे. यावरुन यंदा कमी पाणीसाठ्यामुळे सर्वच धरणांतील पाण्याचे महत्व वाढले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीWaterपाणी