शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Satara: रब्बी पेरणी पूर्ण होण्यापूर्वीच सिंचनासाठी पाणी, धरणांतील कमी साठा चिंताजनक

By नितीन काळेल | Updated: October 28, 2023 19:22 IST

कोयनेबरोबरच उरमोडीतूनही विसर्ग..

सातारा : रब्बी हंगामाची पेरणी सुरू असतानाच साताऱ्यासह शेजारील जिल्ह्यातही दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी पाणी विसर्गाची मागणी होत आहे. पण, पर्जन्यमान कमी झाल्याने धरणांतच पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे आगामी आठ महिन्यांचा विचार करता पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.मान्सूनचा पाऊस वेळेत आणि चांगला झाला तरच खरीप आणि रब्बी हंगामही पदरी पडतात. पण, यावर्षी मान्सूनच्या पावसाने घात केला. उशिरा सुरुवात आणि त्यानंतर वारंवार दडी होती. त्यातच जून ते सप्टेंबरपर्यंतच्या चार महिन्यात सरासरीच्या ६० टक्क्यांवरच पाऊस झाला. तसेच जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. यामुळे दुष्काळीस्थिती निर्माण झालेली आहे. अशातच आता शेतकरी रब्बी हंगामातील पेरणी करत आहेत. त्यामुळे पिकांनाही पाणी लागणार आहे. परिणामी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

सातारा जिल्ह्यात प्रमुख मोठे सहा पाणी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. यामधील कोयना धरण हे १०५.२५ टीएमसी क्षमतेचे आहे. या धरणातील पाण्यावर अनेक गावांची तहान भागते. तसेच टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन पाणी योजनाही अवलंबून आहेत. अशातच सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी झाली. त्यामुळे शुक्रवारपासून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पण, गेल्या दीड महिन्यात कोयनेतून सांगलीसाठी तीनवेळा पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे आगामी काळातही सिंचनासाठी मागणी वाढणार असल्याने कोयना धरणातील साठ्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.कोयना धरणातील पाणी सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी जाते. तसेच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यालालाही सिंचनासाठी पाणी सोडले जाते. सध्या कोयना धरणात ८९ टीएमसीच पाणीसाठा आहे. त्यात वीजनिर्मिती आणि शेती पाण्याचा विचार करता पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. तर ९.९६ टीएमसीच्या उरमोडी धरणावर सातारसह माण आणि खटाव या तालुक्यातील सिंचन योजना अवलंबून आहेत. सध्या धरणात ५.८६ टीएमसीच पाणी आहे. हे पाणी पुरवताना पुढील आठ महिन्यांचा विचार करावा लागणार आहे. धोम-बलकवडी धरणातील पाणीही फलटण तालुक्यातील सिंचनासाठी सोडण्यात येते. या धरणातही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात सिंचनासाठी पाणी मोठ्या प्रमाणात सोडावे लागणार असल्याने धरणे लवकरच खाली होण्याची भीती आहे.कोयनेबरोबरच उरमोडीतूनही विसर्ग..

सातारा तालुक्यातील उरमोडी धरण दुष्काळी भागासाठी वरदानच ठरले आहे. या धरणातील पाण्यावर माण आणि खटाव या दोन्ही तालुक्यातील हजारो एकर शेती सिंचनाखाली येते. सध्या या धरणातून १७५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीत करण्यात येत आहे. हे पाणी सिंचन आणि पिण्यासाठीही जात आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील धोका लक्षात घेता साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाटबंधारे विभागबरोबर बैठक घेऊन उरमोडीतील साताऱ्याच्या वाटणीचे पाणी कोणालाही देऊ नये, अशी सूचना केली आहे. यावरुन यंदा कमी पाणीसाठ्यामुळे सर्वच धरणांतील पाण्याचे महत्व वाढले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीWaterपाणी