शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

एकीकडे पाणीकपात तर दुसरीकडे गळती, साताऱ्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 17:23 IST

शहापूर पाणी योजनेचे दोन्ही पंप नादुरुस्त असल्याने पालिकेकडून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जात आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शहरात हा विरोधाभास पहावयास मिळत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे एकीकडे पाणीकपात तर दुसरीकडे गळती, साताऱ्यातील चित्र व्हॉल्व्ह व जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया

सातारा : शहापूर पाणी योजनेचे दोन्ही पंप नादुरुस्त असल्याने पालिकेकडून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जात आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शहरात हा विरोधाभास पहावयास मिळत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. कासमधून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू असला तरी शहापूर योजनेत वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच शहापूर योजनेचा २०० एचपीचा पंप व त्यानंतर ७५ एचपीचा पंप अचानक बिघडला. या पंपांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

पाणी उपसा करणारे पंपच बिघडल्याने पाणी साठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे पालिकेने शहरातील प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणी कपातीच्या निर्णयावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली.प्रशासनाकडून एकीकडे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे शहरातील जलवाहिन्यांना व व्हॉल्व्हला लागलेली गळती प्रशासनाच्या नजरेस अद्यापही पडलेली नाही.पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील तसेच शाहू चौकातील वॉल्व्हला सातत्याने गळती लागत आहे.

या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शिवाय बोगदा परिसर, समर्थ मंदिर, शनिवार पेठ या भागातही अनेक नळांना तोट्या नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे. पाणी बचतीचे आवाहन करीत असताना प्रशासनाने पाण्याचा अपव्यय थांबविणे देखील गरजेचे आहे. पालिकेने वॉल्व्ह व जलवाहिन्यांना लागलेली गळती तातडीने काढावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.गळतीवर फरशीचा उपायपालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारा समोर एका व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या वॉल्व्हमधून दररोज पाण्याची नासाडी होत असते. परंतु पालिकेकडून या व्हॉल्व्हची गळती अद्यापही काढण्यात आली नाही. विशेष म्हणजे ही गळती लपविण्यासाठी त्यावर चक्क फरशीचा तुकडा ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatara areaसातारा परिसर