शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एकीकडे पाणीकपात तर दुसरीकडे गळती, साताऱ्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 17:23 IST

शहापूर पाणी योजनेचे दोन्ही पंप नादुरुस्त असल्याने पालिकेकडून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जात आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शहरात हा विरोधाभास पहावयास मिळत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे एकीकडे पाणीकपात तर दुसरीकडे गळती, साताऱ्यातील चित्र व्हॉल्व्ह व जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया

सातारा : शहापूर पाणी योजनेचे दोन्ही पंप नादुरुस्त असल्याने पालिकेकडून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जात आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शहरात हा विरोधाभास पहावयास मिळत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. कासमधून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू असला तरी शहापूर योजनेत वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच शहापूर योजनेचा २०० एचपीचा पंप व त्यानंतर ७५ एचपीचा पंप अचानक बिघडला. या पंपांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

पाणी उपसा करणारे पंपच बिघडल्याने पाणी साठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे पालिकेने शहरातील प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणी कपातीच्या निर्णयावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली.प्रशासनाकडून एकीकडे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे शहरातील जलवाहिन्यांना व व्हॉल्व्हला लागलेली गळती प्रशासनाच्या नजरेस अद्यापही पडलेली नाही.पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील तसेच शाहू चौकातील वॉल्व्हला सातत्याने गळती लागत आहे.

या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शिवाय बोगदा परिसर, समर्थ मंदिर, शनिवार पेठ या भागातही अनेक नळांना तोट्या नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे. पाणी बचतीचे आवाहन करीत असताना प्रशासनाने पाण्याचा अपव्यय थांबविणे देखील गरजेचे आहे. पालिकेने वॉल्व्ह व जलवाहिन्यांना लागलेली गळती तातडीने काढावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.गळतीवर फरशीचा उपायपालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारा समोर एका व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या वॉल्व्हमधून दररोज पाण्याची नासाडी होत असते. परंतु पालिकेकडून या व्हॉल्व्हची गळती अद्यापही काढण्यात आली नाही. विशेष म्हणजे ही गळती लपविण्यासाठी त्यावर चक्क फरशीचा तुकडा ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatara areaसातारा परिसर