शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

एकीकडे पाणीकपात तर दुसरीकडे गळती, साताऱ्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 17:23 IST

शहापूर पाणी योजनेचे दोन्ही पंप नादुरुस्त असल्याने पालिकेकडून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जात आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शहरात हा विरोधाभास पहावयास मिळत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे एकीकडे पाणीकपात तर दुसरीकडे गळती, साताऱ्यातील चित्र व्हॉल्व्ह व जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया

सातारा : शहापूर पाणी योजनेचे दोन्ही पंप नादुरुस्त असल्याने पालिकेकडून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जात आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शहरात हा विरोधाभास पहावयास मिळत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. कासमधून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू असला तरी शहापूर योजनेत वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच शहापूर योजनेचा २०० एचपीचा पंप व त्यानंतर ७५ एचपीचा पंप अचानक बिघडला. या पंपांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

पाणी उपसा करणारे पंपच बिघडल्याने पाणी साठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे पालिकेने शहरातील प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणी कपातीच्या निर्णयावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली.प्रशासनाकडून एकीकडे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे शहरातील जलवाहिन्यांना व व्हॉल्व्हला लागलेली गळती प्रशासनाच्या नजरेस अद्यापही पडलेली नाही.पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील तसेच शाहू चौकातील वॉल्व्हला सातत्याने गळती लागत आहे.

या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शिवाय बोगदा परिसर, समर्थ मंदिर, शनिवार पेठ या भागातही अनेक नळांना तोट्या नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे. पाणी बचतीचे आवाहन करीत असताना प्रशासनाने पाण्याचा अपव्यय थांबविणे देखील गरजेचे आहे. पालिकेने वॉल्व्ह व जलवाहिन्यांना लागलेली गळती तातडीने काढावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.गळतीवर फरशीचा उपायपालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारा समोर एका व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या वॉल्व्हमधून दररोज पाण्याची नासाडी होत असते. परंतु पालिकेकडून या व्हॉल्व्हची गळती अद्यापही काढण्यात आली नाही. विशेष म्हणजे ही गळती लपविण्यासाठी त्यावर चक्क फरशीचा तुकडा ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatara areaसातारा परिसर