शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

बलकवडी कालव्यातून मुळीकवाडी धरणात पाणी-ग्रामस्थांत समाधान :योजना सुरू राहणार - लोकमत इफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 19:26 IST

आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावांच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहेत. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावांच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आल्या होत्या. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले.

ठळक मुद्दे ग्रामस्थांत समाधान : चार गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरू राहणार

आदर्की : आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावांच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहेत. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावांच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आल्या होत्या. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ते पाणी मुळीकवाडी धरणात पोहोचल्याने जनावरांचा व चार गावांच्या पिण्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात मुळीकवाडी धरण १९७२ मध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. या धरणावरून नांदल, मुळीकवाडी येथील पोटपाटाने जमीन ओलिताखाली आली होती. काही जमीन उपसा जलसिंचनामुळे ओलिताखाली आली होती.

नांदल, मुळीकवाडी, घाडगेवाडी, सासवड या गावांत पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहेत. मुळीकवाडी धरण पंधरा दिवसांपूर्वी आटल्याने पाणी पुरवठा योजना धोक्यात आली. यासंबंधी ‘लोकमत’ने ‘मुळीकवाडी धरण आटले; चार गावांच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन बलकवडी कालव्यातून बिबी, मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ते बिबी घाडगेवाडी येथील बंधारे भरून पाणी मुळीकवाडी धरणात पोहोचले आहे. आता पाणीसाठा होऊ लागल्याने चार-पाच गावांच्या जनावरांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. तीस ते चाळीस टक्के पाणीसाठा झाल्यानंतर चार गावांच्या पाणी पुरवठा योजना पूर्ववत सुरू होऊन पाणी प्रश्न मिटणार आहे.फलटण तालुक्यातील चार गावांची पाणी योजना सुरू ठेवण्यासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)

 

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली