शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

तरसखळी धरण गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: December 11, 2015 00:48 IST

खंडाळा : लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष; वाढत्या झुडपांमुळं गळती काढण्यात अडथळा

खंडाळा : सातारा जिल्ह्यासह राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळदृश परिस्थिती आणि पाणीटंचाईवर शासनपातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. नैसर्गिक जलस्त्रोतांचे जतन करणे, उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असताना जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे खंडाळा तालुक्यातील अजनूज येथील तरसखळी धरणाचे हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. धरणाच्या भिंतीला ग्रासलेली झाडेझुडपे तोडून पाण्याची गळती थांबविणे अत्यावश्यक आहे. याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून होत आहे.अजनूज गावच्या पश्चिमेला डोंगराला लागून तरसखळी नावाचे धरण आहे. या धरणात वर्षभर पाणीसाठा असतो. त्यातच धोम बलकवडीच्या कालव्याचे पाणी पोटपाटाने या धरणात उतरते. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले जाते. मात्र या धरणाच्या भराव्यावर मोठमोठी झाडे उगवली आहे. तसेच मुख्य बंधाऱ्याला तडे गेल्याने पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या भराव्यावरून वाढलेल्या झाडांमुळे जाताही येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनाही येथे काहीच करता येत नाही.या धरणाच्या पाणीसाठ्यावर अजनूज, पारगाव, बावडा, खंडाळा, शिवाजीनगर या गावातील १२०० ते १५०० एकर जमीन ओलिताखाली आहे. सध्या या क्षेत्रामध्ये ऊस कांद्यासह रब्बी हंगामातील ज्वारी, हरभऱ्याच्या प्रमुख पिकासह अन्य पिकेही घेतली जात आहे. या धरणात योग्य पद्धतीने पाणीसाठा उपलब्ध राहिल्यास संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांना पाण्याची अडचण भासणार नाही.याशिवाय या गावांमधील व शेतीपाण्याच्या विहिरींची पाणीपातळीही वाढीस लागणार आहे. त्यासाठी धरणाची दुरुस्ती करून त्यातील गाळ काढल्यास पाणीसाठवण क्षमताही वाढेल.धरणाच्या दुरुस्तीबाबत व गळती काढण्याबाबत गावचे सरपंच मयूर भोसले यांनी खंडाळा येथे आमदार मकरंद पाटील व जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीतही मागणी केली होती. मात्र, त्यावर जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून अद्यापतरी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. सध्या धोम बलकवाडीचे रोटेशननुसार पाणी कालव्याला सोडण्यात आले आहे. मात्र हे पाणी या धरणात न साठता खाली ओढ्याने वाहून जात आहे. असलेले पाणी विनाकारण वाया जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत नाराजीचा सूर आहे. तालुक्यात आत्ताच काही गावांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. भविष्यात ही समस्या अधिक बिकट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठे जतन करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी कधी डोळे उघडणार याकडेच जनतेचे लक्ष लागलेले आहे. या धरणाची तातडीने दुरुस्ती केल्यास साठल्या जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करता येणार आहे. (प्रतिनिधी)तरसखळी धरणाच्या पाण्यावर पाच ते सहा गावांच्या शेतीपाण्याच्या योजना अवलंबून आहेत. पावसाचे आणि धोम बलकवाडीचे पाणी साठण्याऐवजी त्याची गळती होत आहे. सांडव्यापर्यंत पाणी साठले जात नाही. त्यासाठी स्वच्छता, गाळ काढणे आणि दुरुस्तीची कामे तातडीने होणे गरजेचे आहे.- मयूर भोसले, सरपंच, अजनूज