शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सातारा नगरपालिकेसमोर पाण्याचा धबधबा, यशवंत उद्यानातील व्हॉल्व्ह स्लीप झाल्याने लाखो लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 21:05 IST

शुक्रवारी नवीन समस्या नगर पालिकेसमोर उभी ठाकली.

सातारा : शहरातील पाणी पुरवठा योजनेचे रोजच तीन-तेरा वाजत असून, शुक्रवारी नवीन समस्या नगर पालिकेसमोर उभी ठाकली. सातारा नगरपालिका कार्यालयासमोरील यशवंत उद्यान टाकीचा व्हॉल्व्ह अचानक स्लीप झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे शनिवारही सातारकरांना कमी दाबानेच नळातून पाणी मिळणार आहे.गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा योजनेमधील विविध दुरुस्त्यांची कामे केली जात असल्यामुळे शहरातील नागरिकांना कमी-जास्त प्रमाणात पाणी मिळत आहे. ‘काम सुरू आहे... पाणी जपून वापरावे’ असे आवाहन करणाऱ्या नगरपालिकेला साताराकरांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. गुरुवारी शहापूर योजनेतील दुरुस्त्या केल्या गेल्या. त्यानंतर बोगद्यापाठीमागील टाकीला जास्त प्रमाणात पाणी मिळाले. या टाकीतून शहरातील इतर टाक्यांनाही भरपूर पाणी मिळाल्याने पाण्याची पातळी वाढली. दरम्यान, खानीतील टाकीच्या पाण्याचा दाब अन् यशवंत टाकीमधील भरलेले पाणी यामुळे यशवंत उद्यानातील मुख्य व्हॉल्व्ह शुक्रवारी सायंकाळी अचानक स्लीप झाला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.  याचाही फटका शनिवारी सातारकरांना बसणार असून कमी दाबानेच पाणी पुरवठा होणार आहे. तरी, सातारकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी केले आहे. म्हणजे ‘कामे होणार म्हणून पाणी कमी.. अन् टाकीला पाणी भरपूर आले म्हणून पुन्हा पाणी कमी!’ असा प्रकार सातारकरांच्या बाबतीत घडत आहे.