शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

वाॅर्ड रचनेच्या निर्देशामुळे कऱ्हाडला अनेकांचे चेहरे खुलले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:41 IST

कऱ्हाड : डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायती यांच्या निवडणूकपूर्व प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ...

कऱ्हाड : डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायती यांच्या निवडणूकपूर्व प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने कच्ची वाॅर्ड रचना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यात कऱ्हाड पालिकेचाही समावेश असल्याने कऱ्हाडातील मातब्बर, दादा नगरसेवक, इच्छुकांचे चेहरे चांगलेच फुललेले दिसत आहेत.

कऱ्हाड पालिकेतील विद्यमान कारभाऱ्यांची मुदत डिसेंबरअखेरीस संपत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने कच्च्या प्रारूप वाॅर्ड रचना तयार करण्याचे निर्देश दिल्याने राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झालेला आहे.

सध्या कऱ्हाडमध्ये भाजपच्या नगराध्यक्षा, जनशक्तीकडे बहुमत, तर लोकशाही आघाडी विरोधी बाकावर अशी स्थिती आहे, पण गत साडेचार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने जनशक्तीची ‘शक्ती’ भलतीच क्षीण झाल्याचे दिसते. कमळाच्या पाकळ्याही विस्कटलेल्या दिसतात, तर लोकशाही आघाडीला आवश्यक करिश्मा दाखवता आलेला दिसत नाही; पण सगळेच पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

गत निवडणुकीत प्रभाग पद्धती होती. नगराध्यक्षा थेट जनतेतून निवडल्या गेल्या होत्या. त्यामुळे यंदाची निवडणूक नक्की कशी होणार? प्रभाग की वाॅर्ड होणार? नगराध्यक्ष कसा निवडला जाणार? याबाबत पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा होत्या. मात्र, आता निवडणूक आयोगाने कच्ची वाॅर्ड रचना करण्याचे निर्देश दिल्याने आता वाॅर्ड पद्धतीने निवडणुका होतील, असे संकेत जाणकार देत आहेत. परिणामी अनेक हौशी, नवखे, इच्छुक व दादा नगरसेवकांचे चेहरे भलतेच खुललेले दिसत आहेत.

चौकट

राज्य सरकारमध्ये मतभिन्नता...

नगरपालिका, नगरपंचायत यांच्या निवडणुका प्रभाग की वाॅर्ड पद्धतीने घ्यायच्या याबाबत राज्य सरकारमध्ये असलेली मतभिन्नता अनेकदा अधोरेखित झाली आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे सरकार आहे. पैकी काँग्रेस व शिवसेना प्रभाग पद्धतीसाठी आग्रही दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस वाॅर्ड रचनेसाठी आग्रही असल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे, पण आता या तीन पक्षांमध्ये मतऐक्य झाले आहे का? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

चौकट

पक्षीय झेंडे की आघाड्यांचे राजकारण..

कऱ्हाड पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत संपल्यानंतर लगेच निवडणूक लागली तर ती कशी होणार? दुरंगी की तिरंगी लढत होणार? पक्षीय झेंडे खांद्यावर घेणार की पुन्हा आघाड्यांचेच राजकारण होणार? याबाबतही राजकीय मंडळी आखाडे बांधत आहेत.