शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पाहिजे..? दिवसाला १ लाख भरा!

By admin | Updated: August 28, 2015 22:46 IST

आठ गावांचा प्रश्न : खटाव तालुक्याच्या हक्काचे पाणी दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यांदेखत निघाले कऱ्हाडकडे--धरणांच्या जिल्ह्यात पाण्याचा दुष्काळ

राजू पिसाळ -पुसेसावळी  खटाव तालुक्यातील पूर्व भागातून उरमोडीचा पाट पाण्याने भरून वाहत आहे. तरीही या भागातील शेतकऱ्यांची पिके उन्हामुळे करपून गेली आहेत. शेतकऱ्यांनी पाणी मागितले तर तसे पाणी सोडता येत नाही. पाणी पाहिजे असल्यास एक दिवसाचे एक लाख रूपये भरा, असे प्रशासनाकडून सांगितले जाते. त्यामुळे हक्काच्या पाण्यात स्वप्ने वाहून जाताना उघड्या डोळ्यांनी बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पुनर्वसितांना जमिनी दिल्या. एवढा त्याग करूनही आपल्या भागातून दुसरीकडे जाणारे पाणी आपल्या तहानलेल्या पिकांना मिळत नाही, याची खंत शेतकऱ्यांना आहे. निवडणुका आल्या की पाण्याचे राजकारण केले जाते अन् सत्ता मिळाली की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते. त्यामुळे उशाला वाहतोय पाट तरीही पिकांची लागलीय वाट, असे चित्र या भागात आहे.दुष्काळी भाग असूनही प्रशासन पाण्याबाबत काहीच हालचाली करत नाही. ज्या गावाचा पुढारी मोठा तिथे पाणी सोडले जाते; मात्र जिथे खरंच गरज आहे अशा भागावर अन्याय होतो. पुसेसावळीसह आठ गावांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. पारगाव तलाव कोरडा पडला आहे. तिथे उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी मान्य होत नाही. ही योजना दुष्काळी भागासाठी असताना या उरमोडीचे पाणी या ठिकाणापासून कऱ्हाडकडे निम्मे आणि उरमोडी पाटाकडे निम्मे सोडले जाते. याबाबत राजकीय नेतेमंडळी मूग गिळून गप्प का, असा सवाल शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. आम्ही सातत्याने उरमोडीच्या पाण्याची मागणी करूनसुध्दा पाणी सोडले जात नाही. सध्या गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. तरी टंचाईतून गावाला पाणी सोडावे, अशी मागणी आम्ही ग्रामपंचायतीच्यामार्फत केली आहे.- रोहिणी जितेंद्र कदम, सरपंच (म्हासुर्णे)उरमोडी ही योजना दुष्काळी भागासाठी सुरू केली आहे आणि याच भागाला पाणी मिळत नाही. प्रत्येकवेळी दुष्काळी पूर्व भागावर अन्याय केला जात आहे. सांगली जिल्ह्याला पाणी ओढ्या-नाल्याने वाहत असून, दुष्काळी भागावर अन्याय का, याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे. - श्रीकांत पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य, चोराडेदुष्काळी भागाच्या व्यथा राजकीय नेतेमंडळींजवळ सातत्याने मांडल्या आहेत; परंतु ठोस अशी कार्यवाही होत नसल्याने पाटाचे पाणी उघड्या डोळ्यांनी नुसतेच बघावे लागत आहे, ही शोकांतिका आहे.- संतोष घार्गे, सरपंच, वडगाव (ज.स्वा.)चोराडेबरोबर रहाटणी, शेनवडी, वांझोली, वडगाव या गावांच्या हद्दीतून हा उरमोडीचा पाट जातो; परंतु या गावांना पाणी मिळत नाही. कुठे तलाव भरायचा आहे, कुठल्या पुढाऱ्याने सांगितले की, त्याच्या गावाकडे तालुक्याला पाणी जाते; परंतु या पाटात ज्यांच्या जमिनी जाऊनसुध्दा त्यांना गप्प बसावे लागते, हा अन्याय किती दिवस सहन करायचा? - सुहास पिसाळ, चोराडे