शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

वांग-मराठवाडी धरणग्रस्तांचा हक्कासाठी जलसत्याग्रहाचा इशारा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:38 IST

ढेबेवाडी : वांग-मराठवाडीच्या बुडीत क्षेत्रातील शेकडो धरणग्रस्त अजूनही परिपूर्ण पुनर्वसनापासून वंचित आहेत तर वांग प्रकल्पाचे बांधकाम मात्र पूर्णत्वाच्या शेवटच्या ...

ढेबेवाडी : वांग-मराठवाडीच्या बुडीत क्षेत्रातील शेकडो धरणग्रस्त अजूनही परिपूर्ण पुनर्वसनापासून वंचित आहेत तर वांग प्रकल्पाचे बांधकाम मात्र पूर्णत्वाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. अधिकारी शासनाला खोटी माहिती पुरवतात आणि शासन व अधिकारी संगनमताने धरणग्रस्तांच्या आयुष्याशी खेळत आहेत. आता आम्ही आमच्या न्याय्य हक्कासाठी कोणत्याही क्षणी जलाशयात उतरून जलसत्याग्रह करू, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.

धरणग्रस्तांच्या पुनर्वसन समस्येवर चर्चा करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या ढेबेवाडी कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सातारा व सांगली जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अधीक्षक अभियंता पाटबंधारे यांना एक निवेदन देऊन वरीलप्रमाणे इशारा देण्यात आला आहे.

धरणग्रस्त यावेळी आपल्या अडचणी मांडताना म्हणाले, ‘माहुली (ता. कडेगाव) पुनर्वसिताना मिळालेल्या जमिनीला पाणी मिळणार नाही, त्याबाबत आजही काही प्रगती नाही. त्यामुळे आजही मूळच्या बुडीत उमरकांचन गावातच राहिलेल्या १६ धरणग्रस्तांना यावर्षीसुद्धा बुडीतातच राहण्याची वेळ येणार आहे. कृष्णा खोऱ्याचे कार्यकारी अभियंता जिल्हाधिकाऱ्यांना खोटी माहिती देत आहेत. माहुली गावठाणातीलच अन्य ७ धरणग्रस्तांनी मार्च २०२० मध्ये जमिनी बदलून मागितल्या; परंतु गेली दीड वर्षे सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी काहीही केलेले नाही. त्यांना मिळालेल्या जमिनीला पाणी मिळेपर्यंत निर्वाहभत्ता किंवा जमीन रद्द करून रोख रक्कम मिळावी, अशी मागणीही आजही प्रलंबित आहे.

सावंतवाडी (जिंती, ता. पाटण ) येथील नऊ धरणग्रस्त कुटुंबांची जमीन दरवर्षी पाण्यात जाते. यावर्षी उरलेलीसुद्धा पाण्यात जाणार आहे. उमरकांचन येथील चार धरणग्रस्तांची शंभर टक्के नुकसान भरपाई रक्कम शासनाकडे जमा असूनही ६५ टक्के रक्कम भरली नसल्याचे कारण देऊन त्यांना जमीन वाटप केले नाही, यापेक्षा पिळवणूक वेगळी काय असू शकते? याच गावातील १४ धरणग्रस्तांची ६ हेक्टर जमीन संपादन न करताच २०११ पासून धरणात बुडवली आहे. मेंढ (ता. पाटण) येथील वरसरकून गावठाणातील १६ खातेदार वगळता बाकी राहिलेल्यांना अद्याप भूखंडच तयार नाहीत. त्यामुळे वाटपाचा प्रश्नच येत नाही, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

(कोट)

वांग-मराठवाडीचे ३५० वर धरणग्रस्त जमिनी मिळण्यापासून वंचित असताना त्यांच्यासाठी सांगली जिल्ह्यात संपादित जमिनी इतर धरणातील धरणग्रस्तांना वाटप करण्यापूर्वी हा प्रश्न सोडावा. भविष्यात वांग धरणग्रस्तांची अवस्था कोयनेसारखी होऊ नये.

-जगन्नाथ विभुते, सदस्य, पुनर्वसन प्राधिकरण पुणे.