शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडला
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
4
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
5
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
6
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
9
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
10
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
11
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
12
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
13
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
14
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
15
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
17
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
20
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?

वांग-मराठवाडी धरणग्रस्तांचा हक्कासाठी जलसत्याग्रहाचा इशारा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:38 IST

ढेबेवाडी : वांग-मराठवाडीच्या बुडीत क्षेत्रातील शेकडो धरणग्रस्त अजूनही परिपूर्ण पुनर्वसनापासून वंचित आहेत तर वांग प्रकल्पाचे बांधकाम मात्र पूर्णत्वाच्या शेवटच्या ...

ढेबेवाडी : वांग-मराठवाडीच्या बुडीत क्षेत्रातील शेकडो धरणग्रस्त अजूनही परिपूर्ण पुनर्वसनापासून वंचित आहेत तर वांग प्रकल्पाचे बांधकाम मात्र पूर्णत्वाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. अधिकारी शासनाला खोटी माहिती पुरवतात आणि शासन व अधिकारी संगनमताने धरणग्रस्तांच्या आयुष्याशी खेळत आहेत. आता आम्ही आमच्या न्याय्य हक्कासाठी कोणत्याही क्षणी जलाशयात उतरून जलसत्याग्रह करू, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.

धरणग्रस्तांच्या पुनर्वसन समस्येवर चर्चा करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या ढेबेवाडी कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सातारा व सांगली जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अधीक्षक अभियंता पाटबंधारे यांना एक निवेदन देऊन वरीलप्रमाणे इशारा देण्यात आला आहे.

धरणग्रस्त यावेळी आपल्या अडचणी मांडताना म्हणाले, ‘माहुली (ता. कडेगाव) पुनर्वसिताना मिळालेल्या जमिनीला पाणी मिळणार नाही, त्याबाबत आजही काही प्रगती नाही. त्यामुळे आजही मूळच्या बुडीत उमरकांचन गावातच राहिलेल्या १६ धरणग्रस्तांना यावर्षीसुद्धा बुडीतातच राहण्याची वेळ येणार आहे. कृष्णा खोऱ्याचे कार्यकारी अभियंता जिल्हाधिकाऱ्यांना खोटी माहिती देत आहेत. माहुली गावठाणातीलच अन्य ७ धरणग्रस्तांनी मार्च २०२० मध्ये जमिनी बदलून मागितल्या; परंतु गेली दीड वर्षे सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी काहीही केलेले नाही. त्यांना मिळालेल्या जमिनीला पाणी मिळेपर्यंत निर्वाहभत्ता किंवा जमीन रद्द करून रोख रक्कम मिळावी, अशी मागणीही आजही प्रलंबित आहे.

सावंतवाडी (जिंती, ता. पाटण ) येथील नऊ धरणग्रस्त कुटुंबांची जमीन दरवर्षी पाण्यात जाते. यावर्षी उरलेलीसुद्धा पाण्यात जाणार आहे. उमरकांचन येथील चार धरणग्रस्तांची शंभर टक्के नुकसान भरपाई रक्कम शासनाकडे जमा असूनही ६५ टक्के रक्कम भरली नसल्याचे कारण देऊन त्यांना जमीन वाटप केले नाही, यापेक्षा पिळवणूक वेगळी काय असू शकते? याच गावातील १४ धरणग्रस्तांची ६ हेक्टर जमीन संपादन न करताच २०११ पासून धरणात बुडवली आहे. मेंढ (ता. पाटण) येथील वरसरकून गावठाणातील १६ खातेदार वगळता बाकी राहिलेल्यांना अद्याप भूखंडच तयार नाहीत. त्यामुळे वाटपाचा प्रश्नच येत नाही, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

(कोट)

वांग-मराठवाडीचे ३५० वर धरणग्रस्त जमिनी मिळण्यापासून वंचित असताना त्यांच्यासाठी सांगली जिल्ह्यात संपादित जमिनी इतर धरणातील धरणग्रस्तांना वाटप करण्यापूर्वी हा प्रश्न सोडावा. भविष्यात वांग धरणग्रस्तांची अवस्था कोयनेसारखी होऊ नये.

-जगन्नाथ विभुते, सदस्य, पुनर्वसन प्राधिकरण पुणे.