शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वांग-मराठवाडी धरणग्रस्तांचा हक्कासाठी जलसत्याग्रहाचा इशारा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:38 IST

ढेबेवाडी : वांग-मराठवाडीच्या बुडीत क्षेत्रातील शेकडो धरणग्रस्त अजूनही परिपूर्ण पुनर्वसनापासून वंचित आहेत तर वांग प्रकल्पाचे बांधकाम मात्र पूर्णत्वाच्या शेवटच्या ...

ढेबेवाडी : वांग-मराठवाडीच्या बुडीत क्षेत्रातील शेकडो धरणग्रस्त अजूनही परिपूर्ण पुनर्वसनापासून वंचित आहेत तर वांग प्रकल्पाचे बांधकाम मात्र पूर्णत्वाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. अधिकारी शासनाला खोटी माहिती पुरवतात आणि शासन व अधिकारी संगनमताने धरणग्रस्तांच्या आयुष्याशी खेळत आहेत. आता आम्ही आमच्या न्याय्य हक्कासाठी कोणत्याही क्षणी जलाशयात उतरून जलसत्याग्रह करू, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.

धरणग्रस्तांच्या पुनर्वसन समस्येवर चर्चा करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या ढेबेवाडी कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सातारा व सांगली जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अधीक्षक अभियंता पाटबंधारे यांना एक निवेदन देऊन वरीलप्रमाणे इशारा देण्यात आला आहे.

धरणग्रस्त यावेळी आपल्या अडचणी मांडताना म्हणाले, ‘माहुली (ता. कडेगाव) पुनर्वसिताना मिळालेल्या जमिनीला पाणी मिळणार नाही, त्याबाबत आजही काही प्रगती नाही. त्यामुळे आजही मूळच्या बुडीत उमरकांचन गावातच राहिलेल्या १६ धरणग्रस्तांना यावर्षीसुद्धा बुडीतातच राहण्याची वेळ येणार आहे. कृष्णा खोऱ्याचे कार्यकारी अभियंता जिल्हाधिकाऱ्यांना खोटी माहिती देत आहेत. माहुली गावठाणातीलच अन्य ७ धरणग्रस्तांनी मार्च २०२० मध्ये जमिनी बदलून मागितल्या; परंतु गेली दीड वर्षे सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी काहीही केलेले नाही. त्यांना मिळालेल्या जमिनीला पाणी मिळेपर्यंत निर्वाहभत्ता किंवा जमीन रद्द करून रोख रक्कम मिळावी, अशी मागणीही आजही प्रलंबित आहे.

सावंतवाडी (जिंती, ता. पाटण ) येथील नऊ धरणग्रस्त कुटुंबांची जमीन दरवर्षी पाण्यात जाते. यावर्षी उरलेलीसुद्धा पाण्यात जाणार आहे. उमरकांचन येथील चार धरणग्रस्तांची शंभर टक्के नुकसान भरपाई रक्कम शासनाकडे जमा असूनही ६५ टक्के रक्कम भरली नसल्याचे कारण देऊन त्यांना जमीन वाटप केले नाही, यापेक्षा पिळवणूक वेगळी काय असू शकते? याच गावातील १४ धरणग्रस्तांची ६ हेक्टर जमीन संपादन न करताच २०११ पासून धरणात बुडवली आहे. मेंढ (ता. पाटण) येथील वरसरकून गावठाणातील १६ खातेदार वगळता बाकी राहिलेल्यांना अद्याप भूखंडच तयार नाहीत. त्यामुळे वाटपाचा प्रश्नच येत नाही, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

(कोट)

वांग-मराठवाडीचे ३५० वर धरणग्रस्त जमिनी मिळण्यापासून वंचित असताना त्यांच्यासाठी सांगली जिल्ह्यात संपादित जमिनी इतर धरणातील धरणग्रस्तांना वाटप करण्यापूर्वी हा प्रश्न सोडावा. भविष्यात वांग धरणग्रस्तांची अवस्था कोयनेसारखी होऊ नये.

-जगन्नाथ विभुते, सदस्य, पुनर्वसन प्राधिकरण पुणे.