सातारा : निसर्गाने भारताला तीन ऋतू बहाल केले आहोत. या तिन्ही ऋतुंवर भारतामध्ये अनेक हंगामी व्यवसायही सुरू आहेत. सध्या मान्सूनची चाहूल लागल असून या पावसाला सुरुवात झाली नसल्याने हंगामी व्यवसायिकांना पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय काहीच काम नाही.साधारणत: जुनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाळ्याला सुरुवात होते. यामुळे छत्री, रेनकोट, जर्कीन हा व्यवसाय तेजीत राहतो. अनेक व्यवसायिक लाखो रुपयांची उलाढाल करतात. या महिनाभरात हा व्यवसाय नफा मिळवून देणारा असल्याने अनेकजण व्याजापोटी भांडवल घेऊन यात पैसे गुंतवितात. परंतु वेळेवर पाऊस आला नाही तर हे व्यवसायिक अडचणीत येतात. यामुळे सध्या अनेक व्यावसायिकांच्या नजरा मान्सूनमध्येच्या ढगांकडे आहेत.यंदा प्रमाणापेक्षा अधिक वळिवाचा पावसाने हजेरी लावली. त्याचा फायदा शेतीसाठी झाला असला तरी या अवकाळी पावसामुळे लाखो रूपयांचे नुकसानही झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील कामे शेतकऱ्यांनी वेळेत पूर्ण केली असती तर पेरणीसाठी मानसुनच्या पावसाची गरज असल्याने सध्या सर्वत्र मानसुनच्या पावसाची वाट पहावी लागत आहे. गतवर्षी मानसुनच्या पावसाने वेळेत हजेरी लावली नसल्याने यावर्षी अजूनही बाजारात छत्री, रेनकोट, जर्कीन दिसत नाहीत. मात्र हंगामी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मानसून सुरू होताच. व्यवसायात गुंतवूणक करून व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. (प्रतिनिधी)
आता प्रतीक्षा पावसाची...!
By admin | Updated: June 11, 2014 01:04 IST