शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

वाईत क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST

सातारा : गेले अनेक वर्षे वाई, खंडाळा व महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात क्रीडा संकुल नसल्याने तरुणांची गैरसोय होत आहे. या ...

सातारा : गेले अनेक वर्षे वाई, खंडाळा व महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात क्रीडा संकुल नसल्याने तरुणांची गैरसोय होत आहे. या ग्रामीण भागातील तरुणांकडे खेळाडूवृत्ती व गुणवत्ता असून त्याला वाव मिळत नव्हता. सरावासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात सुसज्ज क्रीडा संकुल व्हावे, अशी मागणी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडे केली. यावर या ठिकाणी तत्काळ क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वाई, खंडाळा व महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय खेळ्या करत आहेत. एकमेकांवर कुरघोड्या करून राजकीय पोळ्या भाजायच्या अन् राजकीय स्वार्थ साधणारे लोकप्रतिनिधी या भागात आहेत. या लोकप्रतिनिधींना चपराक देणारी खेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी खेळली आहे. या ग्रामीण भागातील तरुणांकडे खेळाडूवृत्ती व गुणवत्ता असून त्यांना योग्य तो वाव मिळण्यास व्यासपीठ नव्हते. सरावासाठी जागा उपलब्ध होत नाही. यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यावर विराज शिंदे यांनी लक्ष घालत राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांना निवेदन देत सर्व परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यावर केदार यांनी संबंधित क्रीडाधिकाऱ्यांना तत्काळ क्रीडा संकुलाचा प्रश्न सोडवा, असे आदेश दिले. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, आ. दीपक चव्हाण, क्रीडा अधिकारी युवराज नाईक व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ : फलटण येथे क्रीडामंत्री सुनील केदार यांना विराज शिंदे, डॉ. सुरेश जाधव व इतरांनी निवेदन दिले.

फोटो नेम : १४शिंदे