शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास पाटील यांनी संमेलनाचे अध्यक्षपद सोडावे - भारत पाटणकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 14:05 IST

जातीयवादी लोकांत सामील झाल्याने त्यांची अवनती

सातारा : लेखक विश्वास पाटील यांची पुस्तके शुद्र-अतिशुद्रांच्या जीवनावर आहेत. अशा लेखकाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारावे, ही त्यांची अवनती आहे. ते राजमान्य राजश्री विश्वासराव पाटील झाले आहेत. जातीयवादी लोकांत सामील होऊन त्यांनी एकप्रकारे आत्महत्याच केली आहे. त्यांनी अध्यक्षपद सोडावे, अन्यथा सर्व शोषित जाती-जमाती त्यांच्या सातारा प्रवेशाला विरोध करतील, असा इशारा डाॅ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.सातारा येथील ‘सुटा’च्या कार्यालयात विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत डाॅ. पाटणकर बोलत होते. डाॅ. पाटणकर म्हणाले, सातारा हा महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा मूळ जिल्हा आहे. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य आणि शिक्षणही येथेच झाले आहे. येथेच आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन बिघडलेल्यांचे आहे. अशा संमेलनाचे अध्यक्षपद विश्वास पाटील यांनी स्वीकारावे ही त्यांची अवनती आहे. ते पूर्ण धर्मांध व जातीयवाद्यांत सहभागी झाले आहेत. लोकांनीही अशा संमेलनाला जाऊ नये.

वाचा- संमेलनाध्यक्ष खोटे बोलतात, विश्वास पाटील यांच्या भावाचाच गंभीर आरोपअजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी आपल्या विधानाबद्दल बहुजन जाती-जमातीची, सातारा गॅझेटमध्ये जे १०० टक्के कुणबी आहेत; पण त्यांना मराठा म्हणून आरक्षण नाकारले जाते, त्या कुणबी समाजाची माफी मागावी व अध्यक्षपद सोडावे. असे झाले नाही, तर सर्व जनता, शोषित जाती विरोध करतील. प्रतिसरकारचा हा जिल्हा आहे, हेही लक्षात ठेवावे, असा इशाराही डाॅ. पाटणकर यांनी दिला.नवीन लिखाण नसल्याने उत्सवमूर्ती..चुकीच्या छावणीत आणि विचारात प्रवेश न करण्याचा पर्याय निवडावा असे वाटते, असा सल्लाही डॉ. पाटणकर यांनी विश्वास पाटील यांना दिला. त्याचबरोबर नवीन काही त्यांच्याकडून लिखाण नाही. त्यामुळे त्यांनी उत्सवमूर्ती होण्याचे ठरविले असावे. त्यातूनच अध्यक्षपद स्वीकारले, असा टोलाही लगावला.