शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

कोयनेच्या दरावाजातून विसर्ग बंद, पाऊस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 17:07 IST

पश्चिम भागातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून कोयना आणि नवजा येथे ४१ आणि महाबळेश्वरला ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर कोयना धरणात पाण्याची आवक कमी होत असल्याने दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर कण्हेर, उरमोडी आणि तारळी धरणांतील विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्दे कण्हेर, उरमोडी अन् तारळीतून विसर्ग सुरूचमहाबळेश्वरला ४७ मिलिमीटरची नोंद

सातारा : पश्चिम भागातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून कोयना आणि नवजा येथे ४१ आणि महाबळेश्वरला ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर कोयना धरणात पाण्याची आवक कमी होत असल्याने दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर कण्हेर, उरमोडी आणि तारळी धरणांतील विसर्ग सुरू आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या २० दिवसांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा ५२ वरुन ९० टीएमसीच्या वर गेला. गेल्या काही दिवसांत कोयनेत मोठ्या प्रमाणात साठा झाला. त्यातच सतत पाऊस आणि साठा वाढत असल्याने धरणातून १५ आॅगस्टपासून विसर्गही सुरू करण्यात आलेला. त्यासाठी धरणाचे सहा दरवाजे १० फुटांपर्यंत वर उचलण्यात आले होते. तसेच पायथा वीजगृहातूनही विसर्ग सुरू होता.

या विसर्गामुळे कोयनेतील पाणीसाठा ९१ ते ९२ टीएमसीच्या दरम्यान राहिला. तर आता पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी होत चालली आहे. परिणामी गुरुवारी सकाळपासून धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे दरवाजातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद होणार आहे. आता फक्त पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.गुरुवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे ४१ आणि यावर्षी आतापर्यंत ३७११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजाला सकाळी ४१ व जूनपासून ४२११ त्याचबरोबर महाबळेश्वरला ४७ आणि आतापर्यंत ४१३२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी आहे.दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत धोमला ५ मिलिमीटर पाऊस झाला. तर कण्हेर धरण क्षेत्रात ८, बलकवडी १५, उरमोडी धरण १७ आणि तारळी धरण क्षेत्रात १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर सध्या धोम धरणातील विसर्ग बंद असून कण्हेर, उरमोडी, तारळी धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. बलकवडी धरणातून २२०५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच असलातरी हे पाणी धोम धरणात येत असते. 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर