शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST

सातारा : शासन नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ...

सातारा : शासन नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संचारबंदीच्या अटी शिथिल केल्याने बाजारपेठेत सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ या वेळेत नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. शहरातील खणआळी, मोती चौक, जुना मोटर स्टॅँड, तहसील कार्यालय परिसर गर्दीने गजबजून जात आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आल्याने नागरिक निर्धास्त झाले आहेत.

पालिकेची दंडात्मक कारवाई बारगळली

सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर सुरू केलेली कारवाईची मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वारताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापारणाऱ्यांवर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत. यानंतर पालिकेकडून शहरात दंडात्मक कारवाईची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. मात्र, गेल्या महिनाभरापासूून ही मोहीम पूर्णपणे थंडावली आहे.

झुडपांमुळे पुलावर अपघाताचा धोका

किडगाव : सातारा-वाई मार्गावर असेल्या वर्ये पुलाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपांचे साम्राज्य वाढले आहे. या झुडपांमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी या झुडपांचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. धोकादायक वळण त्यात झुडपांचे साम्राज्य वाढल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. पुणे-बंगळुरू महामार्गाला जोडणारा हा मार्ग असल्याने वाहनधारकांची या मार्गावरून सतत रेचलेच सुरू असते. त्यामुळे बांधकाम विभागाने ही झुडपे तातडीने हटवावीत, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांमधून होत आहे.