शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

गावकी बंद... आता फक्त एकी !

By admin | Updated: February 25, 2015 00:06 IST

मरडमुरे ग्रामस्थांचा निर्धार : चुकीबद्दल दंड आकारण्याच्या प्रथेला पूर्णविराम; प्रशासनाला करणार सहकार्य--आॅन दि स्पॉट रिपोर्ट

राजीव मुळ्ये - सातारा  आता गावकीच्या माध्यमातून निर्णय होणार नाहीत. कोणत्याही ग्रामस्थाच्या चुकीबद्दल दंड आकारण्यात येणार नाही. कुणाला बहिष्कृत करण्यात येणार नाही. सगळे विषय सामोपचाराने सोडविले जातील. कुणाबद्दल तक्रार असल्यास पोलीस आणि प्रशासनाकडेच ती केली जाईल आणि विकासाच्या रस्त्यावर एकदिलाने वाटचाल करताना प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केले जाईल... वर्षभरापूर्वी गावातील एका कुटुंबाला बहिष्कृत करून त्यांच्याकडून दंड वसूल करणाऱ्या मरडमुरे (ता. जावळी) ग्रामस्थांचा हा निर्धार. गावकीची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली असली, तरी कायद्यानुसार गुन्हे ठरतील असे निर्णय गावकी करीत असेल, तर अशा प्रथेला पूर्णविराम दिलाच पाहिजे, ही गोष्ट ग्रामस्थांना मंगळवारी मनोमन पटली. तहसीलदार रणजित देसाई आणि सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी कौशल्याने हा विषय हाताळून ग्रामस्थांना त्यांची चूक दाखवून दिली. परिस्थितीचे गांभीर्य नजरेस आणून दिले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी प्रबोधनाचे चार शब्द ऐकविले. ‘जावळी तालुक्यातली माणसं चांगलीच आहेत. भांडणं-मारामाऱ्या त्यांचा पिंड नाही,’ असं म्हणून गावकऱ्यांनीही प्रशासन आणि कार्यकर्त्यांना एकीचा शब्द दिला. तानाजी गणपत आढाव आणि त्यांच्या पत्नी रंजना यांना गावातील कोणत्याही सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे निमंत्रण मिळेनासे झाले होते. त्यांचा मुलगा सुनील याचा गावातील काही युवकांशी गेल्या वर्षी यात्रेत वाद झाल्यानंतर हा अघोषित बहिष्कार सुरू झाला होता. बहुतांश युवक मुंबईत स्थिरावलेले. सुनीलसुद्धा मुंबईत नोकरी करणारा. अशा वेळी वयोवृद्ध आढाव दाम्पत्याला गावात एकटे पडावे लागले होते. त्यांनी ‘अंनिस’कडे लेखी तक्रार केल्यानंतर ‘लोेकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आणि याप्रश्नी तोडगा दृष्टिपथात आला. मंगळवारी झालेल्या बैठकीत गावकऱ्यांनी कधी नरम, कधी गरम भूमिका घेतली. सुनीलच्याच कशा चुका आहेत, हेही सांगण्याचा प्रयत्न केला. थोडीफार वादावादी झाली. तथापि, तहसीलदार देसाई यांनी नियम आणि कायदेकानू लक्षात आणून देताच गावकऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. ‘मुंबईत राहतो म्हणता; मग मीटिंगला यायला अर्धा तास उशीर का केला? मुंबईत काय शिकलात,’ असा सवाल करून सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी कायदेशीर बाबींची जाणीव करून दिली. ‘एखाद्याकडून सक्तीने दंड वसूल केला तर खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे दंडाची प्रथा कायमची बंद व्हायला पाहिजे,’ अशी तंबी तहसीलदारांनी दिली तर ‘यापुढे गावकीची बैठक होऊन कुणाला बहिष्कृत केल्याचे समजले तर परिणामांना तयार राहा,’ असे पाटील यांनी सुनावले. अखेर या प्रथा बंद केल्याचे ग्रामस्थांनी लेखी दिले. बहिष्कृत दाम्पत्याला दिलासा मिळून प्रकरणावर पडदा पडला. नवविचारांची शाळा भरलीबैठकीसाठी मुद्दाम आलेल्या ‘अंनिस’च्या डॉ. शैला दाभोलकर यांना शाळा दिसताच बैठकीची तयारी होण्यापूर्वी त्यांनी लहानग्यांशी संवाद साधला. श्रद्धा म्हणजे काय, अंधश्रद्धा म्हणजे काय, निर्भयपणे कसे वागावे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी कोणत्या विचारांसाठी हौतात्म्य पत्करले, याविषयी मुलांना त्यांनी माहिती दिली. ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांच्यासोबत मुलांनी ‘शूर गडी तू, वीर गडी तू, छोट्या गोष्टींना का घाबरतो तू’ हे गाणेही गायिले. लिंबू-मिरची, भूतबाधा, करणी अशा प्रकारांनी भांबावून न जाता कणखरपणे अशा गोष्टींना विरोध करण्याची ऊर्जा कार्यकर्त्यांनी लहानग्यांमध्ये या निमित्ताने पेरली. तहसीलदार देसाई यांनीही मुलांकडून कविता आणि पाढे म्हणवून घेतले. अशा पारायणाने विठ्ठल पावेल?चूक करणाऱ्या ग्रामस्थांकडून वेळोवेळी गोळा केलेल्या दंडाचा हिशोब कोण ठेवतो, त्या पैशांचे काय केले जाते, असे सवाल अधिकाऱ्यांनी उपस्थित करताच ग्रामस्थांनी यात्रा आणि पारायणासाठी हा पैसा खर्च केल्याचे सांगितले. ‘लोकांना जबरदस्तीने दंड करून त्या पैशातून पारायण भरवता? अशा पारायणाने विठ्ठल कधी पावेल का,’ असा सवाल अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना केला. ‘दंड वसूल करण्याचा प्रकार कधी थांबेल,’ या प्रश्नाला पोलीस पाटील दत्ताराम दिनकर आढाव यांनी ‘आजपासून लगेच,’ असे उत्तर दिले.लोकशाही मार्गाने पुढे याआढाव दाम्पत्याचा मुलगा सुनील याने फेसबुकवर गावाविषयी अवमानकारक मजकूर प्रसिद्ध केल्याची तक्रार मरडमुरे गावकऱ्यांनी बैठकीत केली. या विषयावरून थोडी वादळी चर्चाही झाली. तथापि, ‘त्याला शिक्षा देण्याचा अधिकार गावकीला कुणी दिला,’ या प्रश्नावर गावकरी गप्प झाले. ‘प्रश्न कोणताही असो, लोकशाही मार्गानेच तो सोडविला पाहिजे. कायदा हातात घेऊन कुणाला दंड ठोठावला, तर खंडणीचा गुन्हा दाखल करावा लागेल,’ अशी तंबी प्रशासनाकडून देण्यात आली. आढाव दाम्पत्याला २५ हजारांचा दंड ठोठावून नंतर एक हजारांवर तडजोड करण्यात आली आणि तो वसूलही करण्यात आला, अशी कबुली गावकऱ्यांनी दिली. यापूर्वीही गावकीने काही जणांकडून दंड वसूल केल्याचे बैठकीदरम्यान समोर आले.