शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

वॉटरकप स्पर्धेतील सहभागी गावांना मिळाला निधी, माणमधील २७ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:42 IST

माण तालुक्यातील अनेक गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. या गावांना राज्यशासनाचे प्रोत्साहनपर अनुदान निधी येऊनही कित्येक महिन्यांपासून रखडले होते. या अनुदानाचा मार्ग अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी आदेश दिल्याने निकाली लागला.

ठळक मुद्देवॉटरकप स्पर्धेतील सहभागी गावांना मिळाला निधी, माणमधील २७ गावांचा समावेश अनेक महिन्यांपासून रखडले होते राज्यशासनाच्या प्रोत्साहनपर अनुदान

म्हसवड : माण तालुक्यातील अनेक गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. या गावांना राज्यशासनाचे प्रोत्साहनपर अनुदान निधी येऊनही कित्येक महिन्यांपासून रखडले होते. या अनुदानाचा मार्ग अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी आदेश दिल्याने निकाली लागला.माण तालुक्यात २०१९ मध्ये पाणी फाउंडेशन अंतर्गत वाटरकप स्पर्धेसाठी तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतीपैकी ६७ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. राज्य शासनाकडून श्रमदान करणाऱ्या गावांना प्रोत्साहनासाठी इंधन खर्चासाठी प्रती ग्रामपंचायत दीड लाख रक्कम दिली जाते.

माण तालुक्यातील ३९ गावांनी इंधन खार्चाच्या अनुदानाची मागणी केली होती. या ३९ गावांपैकी प्रत्यक्ष काम केलेल्या ग्रामपंचायती २७ आहेत. त्यातील २३ ग्रामपंचायतींचे अनुदान प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी प्रांत कार्यालय दहिवडी यांच्याकडून मिळाली होती. पण मूल्यांकन कोणी करायचे? हा प्रश्न प्रलंबित असताना माण पंचायत समितीने कृषी अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी केली.तथापि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मागणी करून मूल्यांकन करण्यात सर्मथता न दाखवल्याने व टाळाटाळ केल्याने अनुदानाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीच्या खात्यावर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ पडून राहिली होती. शेवटी कार्यतत्परता दाखवत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी पंचायत समिती माणस्तरावरील कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी यांना अधिकार प्रदान केले.

यामुळे २३ ग्रामपंचायतींना प्रशासकीय मान्यता मिळालेल्या गावातील झालेल्या कामाचे मूल्यांकन पंचायत समिती माणच्या कृषी अधिकाऱ्यांनी केले. यामुळे ३४ लाख ५० हजार रुपये अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा झाला. तर उर्वरित चार गावांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे. तर १२ ग्रामपंचायतींनी काम न केल्याने १८ लाख रुपये परत शासनाकडे पाठविण्यात आला आहे.गटविकास अधिकाऱ्यांकडूनही पाठपुरावावाटर कप स्पर्धेतील सहभागी गावांचे शासनाचे प्रोत्साहन अनुदान सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रखडले होते. गटविकास अधिकारी जी. डी. शेलार यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने २७ ग्रामपंचायतींचा अनुदानाचा मार्ग मोकळा झाला.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSatara areaसातारा परिसरfundsनिधी