शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही गावे अंधारातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

आदर्की : थकीत वीजबिलामुळे ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा महावितरणने पंधरा दिवसांपूर्वी खंडित केला होता. त्यावर सरपंच परिषद व संबंधित ...

आदर्की : थकीत वीजबिलामुळे ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा महावितरणने पंधरा दिवसांपूर्वी खंडित केला होता. त्यावर सरपंच परिषद व संबंधित मंत्री यांच्या बैठकीत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देऊनही ग्रामीण भागातील बत्ती गुलच असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या उत्पादनावर परिणाम झाला असला, तरी केंद्र शासनाकडून थेट ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा मिळणारा निधी बंदिस्त गटारावरच खर्च होत असल्याने ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठा व पथदिव्यांची वीजबिले भरण्याइतपत निधी शिल्लक नसल्याने महावितरण कंपनीने पंधरा दिवसांपूर्वी पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावे, वाड्या-वस्त्या अंधारात राहिल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले. यामुळे ग्रामस्थांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असताना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची यशस्वीरित्या बैठक पार पडली व दिवाबत्ती तसेच नळपाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय होऊन चार दिवस उलटले तरी अजूनही गावे अंधारात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

(चौकट)

गावात गावकारभाऱ्यांचा ‘मान’ खाली...

ग्रामीण भागातील रस्त्यावरील बत्ती गुल झाल्याने गावकारभारी मान खाली घालून जात आहेत. कारण ग्रामपंचायत कर भरताना पाणीपट्टी, आरोग्यपट्टीबरोबर दिवाबत्ती करही घेतला जातो. पायाभूत सुविधांमध्ये पाणी, रस्ते, वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. आता गावकारभाऱ्यांना ग्रामस्थांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. आता तर मंत्री पातळीवर निर्णय होऊनही ग्रामीण भागातील बत्ती गुलच असल्याने संताप व्यक्त होत आहे.