शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही गावे अंधारातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

आदर्की : थकीत वीजबिलामुळे ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा महावितरणने पंधरा दिवसांपूर्वी खंडित केला होता. त्यावर सरपंच परिषद व संबंधित ...

आदर्की : थकीत वीजबिलामुळे ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा महावितरणने पंधरा दिवसांपूर्वी खंडित केला होता. त्यावर सरपंच परिषद व संबंधित मंत्री यांच्या बैठकीत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देऊनही ग्रामीण भागातील बत्ती गुलच असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या उत्पादनावर परिणाम झाला असला, तरी केंद्र शासनाकडून थेट ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा मिळणारा निधी बंदिस्त गटारावरच खर्च होत असल्याने ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठा व पथदिव्यांची वीजबिले भरण्याइतपत निधी शिल्लक नसल्याने महावितरण कंपनीने पंधरा दिवसांपूर्वी पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावे, वाड्या-वस्त्या अंधारात राहिल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले. यामुळे ग्रामस्थांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असताना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची यशस्वीरित्या बैठक पार पडली व दिवाबत्ती तसेच नळपाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय होऊन चार दिवस उलटले तरी अजूनही गावे अंधारात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

(चौकट)

गावात गावकारभाऱ्यांचा ‘मान’ खाली...

ग्रामीण भागातील रस्त्यावरील बत्ती गुल झाल्याने गावकारभारी मान खाली घालून जात आहेत. कारण ग्रामपंचायत कर भरताना पाणीपट्टी, आरोग्यपट्टीबरोबर दिवाबत्ती करही घेतला जातो. पायाभूत सुविधांमध्ये पाणी, रस्ते, वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. आता गावकारभाऱ्यांना ग्रामस्थांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. आता तर मंत्री पातळीवर निर्णय होऊनही ग्रामीण भागातील बत्ती गुलच असल्याने संताप व्यक्त होत आहे.