शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही गावे अंधारातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

आदर्की : थकीत वीजबिलामुळे ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा महावितरणने पंधरा दिवसांपूर्वी खंडित केला होता. त्यावर सरपंच परिषद व संबंधित ...

आदर्की : थकीत वीजबिलामुळे ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा महावितरणने पंधरा दिवसांपूर्वी खंडित केला होता. त्यावर सरपंच परिषद व संबंधित मंत्री यांच्या बैठकीत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देऊनही ग्रामीण भागातील बत्ती गुलच असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या उत्पादनावर परिणाम झाला असला, तरी केंद्र शासनाकडून थेट ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा मिळणारा निधी बंदिस्त गटारावरच खर्च होत असल्याने ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठा व पथदिव्यांची वीजबिले भरण्याइतपत निधी शिल्लक नसल्याने महावितरण कंपनीने पंधरा दिवसांपूर्वी पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावे, वाड्या-वस्त्या अंधारात राहिल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले. यामुळे ग्रामस्थांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असताना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची यशस्वीरित्या बैठक पार पडली व दिवाबत्ती तसेच नळपाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय होऊन चार दिवस उलटले तरी अजूनही गावे अंधारात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

(चौकट)

गावात गावकारभाऱ्यांचा ‘मान’ खाली...

ग्रामीण भागातील रस्त्यावरील बत्ती गुल झाल्याने गावकारभारी मान खाली घालून जात आहेत. कारण ग्रामपंचायत कर भरताना पाणीपट्टी, आरोग्यपट्टीबरोबर दिवाबत्ती करही घेतला जातो. पायाभूत सुविधांमध्ये पाणी, रस्ते, वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. आता गावकारभाऱ्यांना ग्रामस्थांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. आता तर मंत्री पातळीवर निर्णय होऊनही ग्रामीण भागातील बत्ती गुलच असल्याने संताप व्यक्त होत आहे.