शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सातारा जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’साठी गावागावांत समिती गठीत, घरी जाऊन लाभार्थी नोंद 

By नितीन काळेल | Updated: July 4, 2024 19:09 IST

अर्जासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही 

सातारा : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी राज्य शासनाने काही अटी शिथील केल्या आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातही ही योजना चांगल्या पध्दतीने राबविण्यासाठी नियोजन बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे पात्र महिलांना अर्जासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. गावागावातच समिती गठित केली असून आता घरी येऊन लाभाऱ्थीची नोंद केली जाणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डुडी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. या योजना नोंदणीसाठी आता ३१ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तसेच अर्जासाठी महिलांच्या शासकीय कार्यालयात रांगा लागत होत्या. पण, आता शासनाने अटी शिथील केल्या आहेत. त्यामुळे महिलांना अर्ज करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही.कारण, जिल्ह्यात ही योजना चांगल्या पध्दतीने राबविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी गावागावात समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गट अध्यक्षांचा समावेश आहे. सर्वांना कुटुंबांचे वाटप करुन लाभाऱ्थी महिलांची नोंद केली जाणार आहे. यासाठी गावांतही कॅम्प लावण्यात येतील. घरोघरी सेविका, मदतनीस जाऊन महिलांचा अर्ज भरला जाईल. त्याचबरोबर काही कागदपत्रे अपुरी असतील तर त्यासाठीही महिलांना सहकार्य करण्यात येईल. एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून दूर राहणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

भ्रष्टाचाराचा प्रकार झाल्यास बडतर्फ..जिल्ह्यात योजना राबविताना महिलांच्या तक्रारी येण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन झाले आहे का असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी योजनेच्या कामात कोणी शासकीय कर्मचाऱ्याने भ्रष्टाचार केला तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाईल असा इशारा दिला. तसेच जिल्ह्यात ८ लाख कुटुंबे आहेत. प्रत्येक ५० कुटुंबामागे एक टीम लाभाऱ्थी नोंदणीचे काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धबधब्याजवळ जाण्यास बंदी येणार !राज्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धबधबेही प्रवाहित झालेत. परिणामी मोठ्या संख्येने पर्यटक धबधब्याकडे वळत आहेत. अतिधाडसामुळे काहीजणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही पावसाळ्याच्या काळात धबधब्याजवळ जाण्यास बंदी करण्याबाबत विचार सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर