शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
3
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
4
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
5
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
6
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
7
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
8
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
10
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
11
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
12
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
13
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
14
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
15
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
16
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
17
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
18
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
20
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

जागा रस्त्यात जाणार म्हणून गाव जगापासून दूर

By admin | Updated: April 23, 2015 00:56 IST

जावळी तालुका : ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत; चालू काम बंद केले

पाचगणी : स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे होऊनही जावळी तालुक्यातील सनासाळी (रुईघर) ही वाडी आजही दळणवळणाच्या रस्त्यापासून दूर आहे. काही लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या रस्त्यासाठी मार्ग काढला. कामाचा शुभांरभही केला; पंरतु काहींनी आपली जागा रस्त्यात जाणार म्हणून या कामात खो घालून सुरू काम बंद पाडले आहे. त्यामळे येथील ग्रामस्थ संतापले असून, आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. रुईघर, ता. जावळी गावच्या पश्चिमेला व भिलार डोंगराच्या पायथ्याशी २५ ते ३० कुटुंबांची सनासाळी ही वाडी आहे. सुमारे १२५ वस्तींची ही वाडी आजही आदिवासींप्रमाणेच जीवन जगत आहे. या वाडीतून पाचगणीला जाण्यासाठी पायी डोंगर चढून गणेशपेठला यावे लागते. तर शाळकरी मुलांना बेलोशी, शिंदेवाडी, दापवडी अथवा पाचगणीला जाण्यासाठी रुईघर गावातून पायवाटेने जावे लागते. त्यामुळे पावसाळा व उन्हाळ्यात मुले घरी येईपर्यंत पालकांच्या मनात काळजीची पाल चुकचुकते. आजारी व्यक्तीला डॉक्टरकडे नेताना डालातून न्यावे लागते. त्यामळे ही वाडी रस्त्याअभावी मोठ्या समस्यांना सामोरी जात आहे. शासनाने पाणंद रस्त्याचे पुनर्जीवन करण्याकरिता खेडोपडी व वाडी-वस्तीतील लोकांना प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे बऱ्याच वाडी-वस्त्या दळणवळणाच्या टप्प्यात आल्या आहेत. पंरतु रुईघर सनासाळी मात्र मूठभर गावकऱ्यांच्या अडेलतट्टूभूमिकेमळे याला अपवाद ठरली आहे. शासनपातळीवर दखल घेतली जात नाही म्हणून वाडीतील गावकऱ्यांनी ही सुविधा आपणच श्रमदानातून सोडवू, असा निर्धार केला. प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. याला विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी या ग्रामस्थांना आधार देऊन आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास दिला. विश्वासाला पात्र ठरत शासकीय ठेकेदार पाठवून प्रत्यक्ष काम सुरू केले. सर्व यंत्रणा कामाला लागली आणि सनासाळीपासून दीड किलोमीटरचा रस्ता गावाच्या वेशीपर्यंत पूर्ण झाला. शिंदेवाडी-रुईघर रस्त्याला जोडण्यासाठीचा हा रस्ता रुईघर गावातून जातो. रस्ता या ठिकाणी आल्याबरोबर गावातील एकाने आपली जागा रस्त्यात जाणार म्हणून गाजावाजा करीत माहितीच्या अधिकाराखाली शासकीय यंत्रणेलाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यांना काहींची साथ मिळाल्याने त्यांनी या कामात अडथळा आणून काम थांबवले.या कामासाठी लागणारी सर्व साधनसामुग्री सध्या जागेवर असून, हे काम पूर्ण न झाल्यास मोठी समस्या निर्माण होणार आहे. स्थानिक पातळीवर याचा विचार करून सामोपचाराने हा प्रश्न मिटवणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनी जर या वाडीला रस्ता मिळत असेल तर ग्रामस्थांनीही याला तडजोड करून तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करून ते पूर्ण करावे,अशी मागणी वाडीतील लोकांनी केली आहे.काहींमुळे रस्ता बंद पडला आहे. सनासाळी वाडीसाठी रस्ता सुरू न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (वार्ताहर)मतांसाठी आमच्याकडे पाहिले...पन्नास वर्र्षांत सर्वांनींच आमच्याकडे फक्त मतांसाठी पाहिले. आम्ही आमच्या व्यथा प्रत्येक वेळी मांडल्या; पंरतु निवडणुकीनंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीने आमच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केलेला नाही. सरपंच, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रारीही केल्या आहेत; पंरतु याची दखल अद्यापही कुणी घेतली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आम्ही आजही दळणवळणाअभावी आदिवासींचे जिणे जगत आहोत. आम्ही सर्व ग्रामस्थ श्रमदानासाठी पुढे येत आहोत. आम्हाला शासकीय पातळीवरून तसेच लोकप्रतिनीधीही सहकार्य करत असताना काही मूठभर लोकांमळे रस्ता मिळणार नसेल तर आम्ही उपोषणाला बसणार आहे.- मारुती शेडगे, ग्रामस्थ