शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

थंडीचा स्ट्रॉबेरीसह भाजीपाल्याला फटका, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 19:38 IST

आठवडाभर सर्वत्र थंडीचा जोर वाढला असून, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये ० ते उणे २ पर्यंत नीचांकी तापमान गेले. त्यामुळे परिसरातील स्ट्रॉबेरीसह फळ, भाजीपाल्याचे पिके कोमेजली आहेत. त्यामुळे अक्षरश: हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळे फेकून देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देथंडीचा स्ट्रॉबेरीसह भाजीपाल्याला फटकाशेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान : नीचांकी तापमानाने थंडीचा जोर वाढला

महाबळेश्वर : आठवडाभर सर्वत्र थंडीचा जोर वाढला असून, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये ० ते उणे २ पर्यंत नीचांकी तापमान गेले. त्यामुळे परिसरातील स्ट्रॉबेरीसह फळ, भाजीपाल्याचे पिके कोमेजली आहेत. त्यामुळे अक्षरश: हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळे फेकून देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.महाबळेश्वर परिसरात मागील तीन ते चार दिवसांपासून अचानक वाढलेल्या थंडीने विक्रमच केला. वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरातील नीचांकी तापमान ० ते उणे २ पर्यंत गेले होते. रविवारी सकाळी मळेधारक स्ट्रॉबेरीची फळे तोडण्यासाठी आपल्या मळ्यात गेले तेव्हा तेथील फळांची गंभीर परिस्थिती पाहून अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

थंडीचा कडका व हिमकणांमुळे स्ट्रॉबेरी, फळभाज्या, पालेभाज्या व फूल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची रोपे गारठून मरू लागली आहे. त्यामुळे बाजार आणलेल्या स्ट्रॉबेरी फळे ही नासलेली आढळून आली. तसेच त्यांचा आकार व बेचव लागत आहेत. अशीच परिस्थिती फळ, पाले भाज्या व शोभिवंत फूल शेतीची झाली आहे. त्याच्या मळ्यातील तूतू (मलबेरी), जांभूळ,पेरूची झाडे थंडीमुळे पूर्णपणे काळी पडली आहेत.

वांगी, वाटणा, फारशी, मिरची, कोबी, फ्लॉवर आदीची रोपेही जाळून गेली आहेत. झेंडू, गुलाब, जरबेरी, कर्दळ, सदाफुली, बिगोनिया आदी शोभिवंत फुलांची आजची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे.कडाक्याच्या थंडीने जळून व कुजून गेल्याने अक्षरश: हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळे रस्त्याकडेला फेकून देण्याची वेळ मळेधारकांवर आली आहे. हीच परिस्थिती वाटाणा, कोबी, फ्लॉवर फळ, पालेभाज्या व फूल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची असून, त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे मळेधारक हवालदिल झाला असून, हातातोंडाला आलेल्या फळांचे अचानक नुकसान झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर जणू शोककळाच पसरली आहे.हंगाम गेला वाया..महाबळेश्वर म्हटंले की स्ट्रॉबेरीची मधुर फळे डोळ््यासमोर येतात. परिसरातून दररोज हजारो टन स्ट्रॉबेरी देशभरात पाठविली जातात. मात्र, थंडीच्या कडाक्याने रोपेच जळाल्याने यंदाचा हंगामच वाया गेला आहे. त्यामुळे आता पुन्हा नवीन रोपे लावणे व त्यांना फळे येण्यासाठी पुन्हा एक ते दीड महिने थांबावे लागणार आहे. शिवाय एप्रिल-मे महिन्यांत काही भागात पाण्याची कमतरता भासत असल्याने त्याचा काहीच उपयोग होणार नाही. 

एवढी मेहनत करून, रात्रंदिवस पहारा करून गव्यापासून त्याचे रक्षण केले. मात्र आजच्या अचानकच्या संकटामुळे तयार फळे फेकण्याची वेळ आली आहे. शासनाने खास बाब म्हणून तातडीची मदत करावी.- आसिफभाई मुलाणी,मळेधारक शेतकरी

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर