शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

वैष्णवांचा मेळा आज लोणंदनगरीत

By admin | Updated: July 16, 2015 00:05 IST

जय्यत तयारी : भरपूर, शुद्ध पाण्यासह प्रशासनाकडून विविध सुविधा

लोणंद : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी पादुकांच्या नीरा स्नानानंतर गुरुवारी सातारा जिल्ह्यात दाखल होत आहे. पावसाने दिलेली ओढ आणि त्यामुळे पाण्याची अपेक्षित गरज विचारात घेऊन प्रशासनाने वारकऱ्यांना भरपूर आणि शुद्ध पाणी मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. माउलींच्या स्वागतासाठी अन्य अनेक सुविधांसह लोणंदनगरी सजली आहे.वाल्हे, ता. पुरंदर येथून मुक्कामानंतर गुरुवारी अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी लोणंदनगरीमध्ये येत आहे. लोणंद ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीतळावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई केली आहे. पालखीतळ, धोबी घाटावर स्नान व धुण्यासाठी मुबलक पाण्याची व्यवस्था केली आहे. सार्वजनिक पाण्याचे नळ काढण्यात आले आहेत. गुरुवार, दि. १६ रोजी सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळ्याचे सरपंच स्नेहलता शेळके-पाटील व उपसरपंच गणीभाई कच्छी यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे. पालखीच्या आगमनानंतर सार्वजनिक पंगतीच्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी पत्रावळी उचलणे व त्या ठिकाणच्या स्वच्छतेचे काम पाहणार आहेत. ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या भरल्या आहेत, त्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले असून, पालखी मार्गावरील २२ विहिरी निश्चित करून त्या ठिकाणी पाणी निर्जंतुक करण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस जवान असे ६५० पोलीस अधिकारी-कर्मचारी व गृहरक्षक दलाचे २५० जवान नेमण्यात आले आहेत. वैष्णवांच्या मेळाच्या स्वागतासाठी अवघी लोणंदनगरी सज्ज झाली आहे. (वार्ताहर)स्वच्छतेची विशेष मोहीमदिंड्या उतरण्याच्या ठिकाणी ४० सार्वजनिक नळांची उभारणी करण्यात आली आहे. गावातील स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी ७० लिटर फिनेल, २० लिटर अ‍ॅसिड, १५० खराटे खरेदी करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने लोणंद व पाडेगाव या दोन्ही गावांतील कंटेनर सर्व्हे केला असून, गावातील डासांचा नायनाट करण्यासाठी धूर फवारणी करण्यात आली आहे. तीन वैद्यकीय केंद्रे तयार करून २४ तास सेवा मिळण्याची व्यवस्था आहे.