शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

उरमोडीचे पाणी शेवटपर्यंत पोहोचवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 23:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : ‘उरमोडीचे पाणी रात्रंदिवस प्रयत्न करून मोठ्या परिश्रमाने माण तालुक्यात आणलयं. ज्यांना या मातीचे काही देणेघेणे नाही, अशा औलादी कितीही केकाटल्या तरी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत उरमोडीचे पाणी पोहोचविण्याचा माझा संकल्प मी पूर्ण करणारच,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सरकार कुणाचेही असले तरी जिहेकटापूर उपसासिंचन ...

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : ‘उरमोडीचे पाणी रात्रंदिवस प्रयत्न करून मोठ्या परिश्रमाने माण तालुक्यात आणलयं. ज्यांना या मातीचे काही देणेघेणे नाही, अशा औलादी कितीही केकाटल्या तरी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत उरमोडीचे पाणी पोहोचविण्याचा माझा संकल्प मी पूर्ण करणारच,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सरकार कुणाचेही असले तरी जिहेकटापूर उपसासिंचन योजना पूर्ण करण्याचे मीशन आता हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.धामणी येथे पहिल्यांदाच आलेल्या उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी शिक्षण सभापती भास्करकाका गुंडगे, काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष एम. के. भोसले, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, दादासाहेब काळे, हरिभाऊ जगदाळे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, बाळासाहेब माने, गुलाबराव खाडे, सरपंच सिंधूताई खाडे, दिगंबर राजगे, बाळासाहेब पिसे, अजित खाडे, सय्यद मुलाणी आणि परिसरातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘आजपर्यंत माण तालुक्यातील अनेक पिढ्यांनी पाण्याची वाट पाहिली. गेल्या कित्येक वर्षांत जनतेने सक्षम लोकप्रतिनिधी न निवडल्याने आपल्या हक्काच्या पाण्यापासून आपण वंचित राहिलो. अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी फक्त लाचारी करून स्वत:चा स्वार्थ साधला. माणमधे पाणी आणण्यासाठी लागणारे प्रयत्न केले नाहीत. मी राजकारणात येताना माण तालुक्यात पाणी आणण्याचे स्वप्न पाहिले. पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बेभान होऊन रात्रंदिवस परिश्रम केले. दिलेल्या शब्दाप्रमाणे मी मतदारसंघात अनेक वेळा उरमोडीचे पाणी आणले.’विरोधकांनी प्रत्येक वेळी केकाटायचे काम केले. आत्ताही १६ दिवस माणमधे पाणी सुरू आहे. मात्र, एकाचेही या पाण्याकडे बघण्याचे धाडस झाले नाही. त्यांच्याकडे तशी नैतिकताच नाही. जनतेच्या आशीवार्दाने मी आपल्या हक्काचे पाणी यापुढेही कायम आणणार आहे. आलेल्या पाण्याला कोणता पक्ष किंवा पार्टी नाही. हे पाणी आपल्या सर्वांचे भले करणार आहे. उगाच या पाण्याला आणि इथल्या मातीला बदनाम करण्याचे उद्योग विरोधकांनी प्रयत्न करू नयेत. पाणी मीच आणलेय, आता बारसे घालायला कुणीही आले तरी फरक पडणार नाही. पाणी आणण्यासाठी युती सरकारशी संघर्ष करून त्यांना अनेक निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. आता उरमोडीचे पाणी दिवड, गट्टेवाडी, ढाकणी तलाव, वडजल भागात नेणार आहे. पुढच्या वर्षी जांभुळणीला जाणार आहे,’ असेही गोरे यावेळी म्हणाले.शासनाला दुष्काळावर खर्च करण्यापेक्षा पाणीयोजना चालविण्यासाठी खर्च करण्यासाठी गळ घालणार आहे. जिहेकटापूरसाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही योजनांचे पाणी यायला लागल्यावर माण तालुक्यातही साखर कारखाने उभे राहतील. कार्यक्रमात एम. के. भोसले, दिगंबर राजगे, सयाजी लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.