शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडीचे पाणी शेवटपर्यंत पोहोचवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 23:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : ‘उरमोडीचे पाणी रात्रंदिवस प्रयत्न करून मोठ्या परिश्रमाने माण तालुक्यात आणलयं. ज्यांना या मातीचे काही देणेघेणे नाही, अशा औलादी कितीही केकाटल्या तरी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत उरमोडीचे पाणी पोहोचविण्याचा माझा संकल्प मी पूर्ण करणारच,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सरकार कुणाचेही असले तरी जिहेकटापूर उपसासिंचन ...

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : ‘उरमोडीचे पाणी रात्रंदिवस प्रयत्न करून मोठ्या परिश्रमाने माण तालुक्यात आणलयं. ज्यांना या मातीचे काही देणेघेणे नाही, अशा औलादी कितीही केकाटल्या तरी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत उरमोडीचे पाणी पोहोचविण्याचा माझा संकल्प मी पूर्ण करणारच,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सरकार कुणाचेही असले तरी जिहेकटापूर उपसासिंचन योजना पूर्ण करण्याचे मीशन आता हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.धामणी येथे पहिल्यांदाच आलेल्या उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी शिक्षण सभापती भास्करकाका गुंडगे, काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष एम. के. भोसले, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, दादासाहेब काळे, हरिभाऊ जगदाळे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, बाळासाहेब माने, गुलाबराव खाडे, सरपंच सिंधूताई खाडे, दिगंबर राजगे, बाळासाहेब पिसे, अजित खाडे, सय्यद मुलाणी आणि परिसरातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘आजपर्यंत माण तालुक्यातील अनेक पिढ्यांनी पाण्याची वाट पाहिली. गेल्या कित्येक वर्षांत जनतेने सक्षम लोकप्रतिनिधी न निवडल्याने आपल्या हक्काच्या पाण्यापासून आपण वंचित राहिलो. अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी फक्त लाचारी करून स्वत:चा स्वार्थ साधला. माणमधे पाणी आणण्यासाठी लागणारे प्रयत्न केले नाहीत. मी राजकारणात येताना माण तालुक्यात पाणी आणण्याचे स्वप्न पाहिले. पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बेभान होऊन रात्रंदिवस परिश्रम केले. दिलेल्या शब्दाप्रमाणे मी मतदारसंघात अनेक वेळा उरमोडीचे पाणी आणले.’विरोधकांनी प्रत्येक वेळी केकाटायचे काम केले. आत्ताही १६ दिवस माणमधे पाणी सुरू आहे. मात्र, एकाचेही या पाण्याकडे बघण्याचे धाडस झाले नाही. त्यांच्याकडे तशी नैतिकताच नाही. जनतेच्या आशीवार्दाने मी आपल्या हक्काचे पाणी यापुढेही कायम आणणार आहे. आलेल्या पाण्याला कोणता पक्ष किंवा पार्टी नाही. हे पाणी आपल्या सर्वांचे भले करणार आहे. उगाच या पाण्याला आणि इथल्या मातीला बदनाम करण्याचे उद्योग विरोधकांनी प्रयत्न करू नयेत. पाणी मीच आणलेय, आता बारसे घालायला कुणीही आले तरी फरक पडणार नाही. पाणी आणण्यासाठी युती सरकारशी संघर्ष करून त्यांना अनेक निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. आता उरमोडीचे पाणी दिवड, गट्टेवाडी, ढाकणी तलाव, वडजल भागात नेणार आहे. पुढच्या वर्षी जांभुळणीला जाणार आहे,’ असेही गोरे यावेळी म्हणाले.शासनाला दुष्काळावर खर्च करण्यापेक्षा पाणीयोजना चालविण्यासाठी खर्च करण्यासाठी गळ घालणार आहे. जिहेकटापूरसाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही योजनांचे पाणी यायला लागल्यावर माण तालुक्यातही साखर कारखाने उभे राहतील. कार्यक्रमात एम. के. भोसले, दिगंबर राजगे, सयाजी लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.