शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

उरमोडीचे पाणी शेवटपर्यंत पोहोचवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 23:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : ‘उरमोडीचे पाणी रात्रंदिवस प्रयत्न करून मोठ्या परिश्रमाने माण तालुक्यात आणलयं. ज्यांना या मातीचे काही देणेघेणे नाही, अशा औलादी कितीही केकाटल्या तरी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत उरमोडीचे पाणी पोहोचविण्याचा माझा संकल्प मी पूर्ण करणारच,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सरकार कुणाचेही असले तरी जिहेकटापूर उपसासिंचन ...

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : ‘उरमोडीचे पाणी रात्रंदिवस प्रयत्न करून मोठ्या परिश्रमाने माण तालुक्यात आणलयं. ज्यांना या मातीचे काही देणेघेणे नाही, अशा औलादी कितीही केकाटल्या तरी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत उरमोडीचे पाणी पोहोचविण्याचा माझा संकल्प मी पूर्ण करणारच,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सरकार कुणाचेही असले तरी जिहेकटापूर उपसासिंचन योजना पूर्ण करण्याचे मीशन आता हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.धामणी येथे पहिल्यांदाच आलेल्या उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी शिक्षण सभापती भास्करकाका गुंडगे, काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष एम. के. भोसले, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, दादासाहेब काळे, हरिभाऊ जगदाळे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, बाळासाहेब माने, गुलाबराव खाडे, सरपंच सिंधूताई खाडे, दिगंबर राजगे, बाळासाहेब पिसे, अजित खाडे, सय्यद मुलाणी आणि परिसरातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘आजपर्यंत माण तालुक्यातील अनेक पिढ्यांनी पाण्याची वाट पाहिली. गेल्या कित्येक वर्षांत जनतेने सक्षम लोकप्रतिनिधी न निवडल्याने आपल्या हक्काच्या पाण्यापासून आपण वंचित राहिलो. अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी फक्त लाचारी करून स्वत:चा स्वार्थ साधला. माणमधे पाणी आणण्यासाठी लागणारे प्रयत्न केले नाहीत. मी राजकारणात येताना माण तालुक्यात पाणी आणण्याचे स्वप्न पाहिले. पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बेभान होऊन रात्रंदिवस परिश्रम केले. दिलेल्या शब्दाप्रमाणे मी मतदारसंघात अनेक वेळा उरमोडीचे पाणी आणले.’विरोधकांनी प्रत्येक वेळी केकाटायचे काम केले. आत्ताही १६ दिवस माणमधे पाणी सुरू आहे. मात्र, एकाचेही या पाण्याकडे बघण्याचे धाडस झाले नाही. त्यांच्याकडे तशी नैतिकताच नाही. जनतेच्या आशीवार्दाने मी आपल्या हक्काचे पाणी यापुढेही कायम आणणार आहे. आलेल्या पाण्याला कोणता पक्ष किंवा पार्टी नाही. हे पाणी आपल्या सर्वांचे भले करणार आहे. उगाच या पाण्याला आणि इथल्या मातीला बदनाम करण्याचे उद्योग विरोधकांनी प्रयत्न करू नयेत. पाणी मीच आणलेय, आता बारसे घालायला कुणीही आले तरी फरक पडणार नाही. पाणी आणण्यासाठी युती सरकारशी संघर्ष करून त्यांना अनेक निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. आता उरमोडीचे पाणी दिवड, गट्टेवाडी, ढाकणी तलाव, वडजल भागात नेणार आहे. पुढच्या वर्षी जांभुळणीला जाणार आहे,’ असेही गोरे यावेळी म्हणाले.शासनाला दुष्काळावर खर्च करण्यापेक्षा पाणीयोजना चालविण्यासाठी खर्च करण्यासाठी गळ घालणार आहे. जिहेकटापूरसाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही योजनांचे पाणी यायला लागल्यावर माण तालुक्यातही साखर कारखाने उभे राहतील. कार्यक्रमात एम. के. भोसले, दिगंबर राजगे, सयाजी लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.