शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

Satara: वाई, जावळी तालुक्याला अवकाळीने झोडपले

By नितीन काळेल | Updated: April 22, 2024 19:01 IST

सर्वत्र पाणीच पाणी

सातारा : जिल्ह्यात पारा वाढत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. असे असतानाच सोमवारी दुपारनंतर वाई आणि जावळी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात उन्हाळी झळा तीव्र झाल्या आहेत. सातारा शहरासह बहुतांशी भागातील कमाल तापमान हे ४० अंशादरम्यान राहत आहे. यामुळे दिवसा कडक उन्हाशी सामना करावा लागत आहे. तर रात्रीच्या सुमारास उकाड्याने बैचेन होण्याची वेळ आलेली आहे. तसेच कडाक्याच्या उन्हाने शेती, बाजारपेठेवरही मोठा परिणाम झालेला आहे. या उन्हापासून सुटका होण्यासाठी नागरिक दुपारच्या सुमारास घरी किंवा झाडाच्या सावलीत बसत आहेत. घराबाहेर जाणेही टाळले जात आहे. अशातच मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे हवेत गारवा निर्माण होत असल्याने लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.सोमवारी तर दुपारी अडीचच्या सुमारास जावळी तालुक्यातील आनेवाडी परिसरात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच वाई तालुक्यातील विरमाडे, पाचवड या भागात पाऊस पडला. वाऱ्यासह हा पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. तर पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरुन धावणारी वाहने लाईट लाऊन जात होती. जवळपास १० मिनीटे पाऊस पडला. पण, यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. त्याचबरोबर वाई तालुक्यातील भुईंज परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच अन्य काही ठिकाणीही अवकाळी पाऊस झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस