शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

साताऱ्याला अवकाळी पावसानं झोडपले; पिकाला फायदा, फळबागांना फटका

By नितीन काळेल | Updated: November 25, 2023 20:59 IST

या पावसाचा फायदा रब्बी पिकाला होणार असलातरी फळबागांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांत चिंता आहे.

सातारा : जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर शनिवारपासून अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. सातारा शहराला तर रात्री साडे आठच्या सुमारास झोडपले. यामुळे रस्त्यावर सामसूम निर्माण झाली होती. तर या पावसाचा फायदा रब्बी पिकाला होणार असलातरी फळबागांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांत चिंता आहे.

नाेव्हेंबर महिना संपत आलातरी अजुनही थंडीला जोर नाही. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते. हवामान विभागानेही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविलेला. हा अंदाज जिल्ह्यात खरा होताना दिसून येत आहे. शनिवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली. तर सातारा शहर आणि परिसरात रात्री साडे आठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास १० मिनीटे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. त्यानंतर हळूहळू पाऊस कमी झाला. मात्र, या पावसामुळे शहरातील रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहिले. तसेच रहदारीही कमी झाली होती. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले.

दरम्यान, जिल्ह्यात मागील १५ दिवसांपूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. तर आता पुन्हा पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फायदा रब्बीतील ज्वारी, मका, गहू, हरभरा पिकाला होणार आहे. पण, फळबागांना फटका बसू शकतो. कारण, अनेक भागात द्राक्ष, डाळिंब फळबागा पक्व अवस्थेत आहेत. अशात गारपिट झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी