शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

साताऱ्याला अवकाळी पावसानं झोडपले; पिकाला फायदा, फळबागांना फटका

By नितीन काळेल | Updated: November 25, 2023 20:59 IST

या पावसाचा फायदा रब्बी पिकाला होणार असलातरी फळबागांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांत चिंता आहे.

सातारा : जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर शनिवारपासून अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. सातारा शहराला तर रात्री साडे आठच्या सुमारास झोडपले. यामुळे रस्त्यावर सामसूम निर्माण झाली होती. तर या पावसाचा फायदा रब्बी पिकाला होणार असलातरी फळबागांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांत चिंता आहे.

नाेव्हेंबर महिना संपत आलातरी अजुनही थंडीला जोर नाही. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते. हवामान विभागानेही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविलेला. हा अंदाज जिल्ह्यात खरा होताना दिसून येत आहे. शनिवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली. तर सातारा शहर आणि परिसरात रात्री साडे आठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास १० मिनीटे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. त्यानंतर हळूहळू पाऊस कमी झाला. मात्र, या पावसामुळे शहरातील रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहिले. तसेच रहदारीही कमी झाली होती. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले.

दरम्यान, जिल्ह्यात मागील १५ दिवसांपूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. तर आता पुन्हा पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फायदा रब्बीतील ज्वारी, मका, गहू, हरभरा पिकाला होणार आहे. पण, फळबागांना फटका बसू शकतो. कारण, अनेक भागात द्राक्ष, डाळिंब फळबागा पक्व अवस्थेत आहेत. अशात गारपिट झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी