शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

साताऱ्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांत चिंतेचे ढग, पिकांसह फळबागांना धोका 

By नितीन काळेल | Updated: January 9, 2024 12:19 IST

अजिंक्यतारा धुक्यात न्हाला..

सातारा : जिल्ह्यात अवकाळी ढग दाटले असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास सातारा शहरात पावसाने हजेरी लावली. तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणीही अवकाळी पाऊस पडला. यामुळे दाट धुके निर्माण झाले होते. या धुक्याचा व ढगाळ वातावरणाचा पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पारा घसरला आहे. किमान तापमान बहुतांशीवेळा १५ अंशाच्या खाली राहत आहे. परिणामी थंडीचा कडाका वाढल्याने ज्वारीसारख्या पिकावर चिकटा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. तसेच इतर पिकांच्या वाढीवरही परिणाम झालाय. असे असतानाच मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणही निर्माण होत होते. यामुळे अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज होता. हा अंदाज आता खरा ठरला असून सोमवारी सायंकाळपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे वातावरणातही चांगलाच बदल झाला आहे.सातारा शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरुपात पाऊस पडला असलातरी हवेत गारवा निर्माण झाला होता. तसेच या पावसामुळे माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्यांवर परिणाम झाला. तर सकाळपासून दुपारी १२ पर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. त्याचबरोबर जिल्ह्याच्या अनेक भागातही हलक्या स्वरुपात अवकाळी पाऊस झाल्याचे दिसून आले.जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असतानाच ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच दाट धुकेही पडत आहे. याचा फटका अधिक करुन द्राक्षे, डाळिंबसारख्या फळबागांना बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. कारण, दीड महिन्यांपूर्वी अवकाळी पाऊस होऊन बागांना मोठा फटका बसलेला. तशीच स्थिती आता निर्माण झालेली आहे. तर ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवरही धुके आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊ शकतो. यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अजिंक्यतारा धुक्यात न्हाला..सातारा शहराच्या बाजुलाच अजिंक्यतारा किल्ला आहे. मंगळवारी पहाटे शहर आणि परिसरात अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. यामुळे दाट धुकेही निर्माण झाले होते. पहाटेच्या सुमारास समोरील काही अंतरावरीलही दिसत नव्हते. तर अजिंक्यतारा किल्ल्यालाही धुक्याने वेढले होते. सकाळी आकरा वाजेपर्यंत किल्ल्यावर दाट धुके दिसून येत होते. त्यानंतर धुक्याची तीव्रता कमी होत गेली.

पुसेगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका पुसेगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाच्या हलक्या सरीने पुसेगाव व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामातून ज्वारी, गहू यासारखा वर्षभरासाठी लागणारा पसा कुडता सांभाळताना शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. तसेच वीट उत्पादन करणाऱ्या कामगारांना तसेच मालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपयांची उचल देऊन लातूर, नांदेड, बीड भागातून विटा थापण्यासाठी आलेले कामगारांची मोठी गोची झाली आहे. विटा पावसाने भिजल्याने मालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस