शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांत चिंतेचे ढग, पिकांसह फळबागांना धोका 

By नितीन काळेल | Updated: January 9, 2024 12:19 IST

अजिंक्यतारा धुक्यात न्हाला..

सातारा : जिल्ह्यात अवकाळी ढग दाटले असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास सातारा शहरात पावसाने हजेरी लावली. तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणीही अवकाळी पाऊस पडला. यामुळे दाट धुके निर्माण झाले होते. या धुक्याचा व ढगाळ वातावरणाचा पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पारा घसरला आहे. किमान तापमान बहुतांशीवेळा १५ अंशाच्या खाली राहत आहे. परिणामी थंडीचा कडाका वाढल्याने ज्वारीसारख्या पिकावर चिकटा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. तसेच इतर पिकांच्या वाढीवरही परिणाम झालाय. असे असतानाच मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणही निर्माण होत होते. यामुळे अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज होता. हा अंदाज आता खरा ठरला असून सोमवारी सायंकाळपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे वातावरणातही चांगलाच बदल झाला आहे.सातारा शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरुपात पाऊस पडला असलातरी हवेत गारवा निर्माण झाला होता. तसेच या पावसामुळे माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्यांवर परिणाम झाला. तर सकाळपासून दुपारी १२ पर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. त्याचबरोबर जिल्ह्याच्या अनेक भागातही हलक्या स्वरुपात अवकाळी पाऊस झाल्याचे दिसून आले.जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असतानाच ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच दाट धुकेही पडत आहे. याचा फटका अधिक करुन द्राक्षे, डाळिंबसारख्या फळबागांना बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. कारण, दीड महिन्यांपूर्वी अवकाळी पाऊस होऊन बागांना मोठा फटका बसलेला. तशीच स्थिती आता निर्माण झालेली आहे. तर ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवरही धुके आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊ शकतो. यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अजिंक्यतारा धुक्यात न्हाला..सातारा शहराच्या बाजुलाच अजिंक्यतारा किल्ला आहे. मंगळवारी पहाटे शहर आणि परिसरात अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. यामुळे दाट धुकेही निर्माण झाले होते. पहाटेच्या सुमारास समोरील काही अंतरावरीलही दिसत नव्हते. तर अजिंक्यतारा किल्ल्यालाही धुक्याने वेढले होते. सकाळी आकरा वाजेपर्यंत किल्ल्यावर दाट धुके दिसून येत होते. त्यानंतर धुक्याची तीव्रता कमी होत गेली.

पुसेगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका पुसेगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाच्या हलक्या सरीने पुसेगाव व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामातून ज्वारी, गहू यासारखा वर्षभरासाठी लागणारा पसा कुडता सांभाळताना शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. तसेच वीट उत्पादन करणाऱ्या कामगारांना तसेच मालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपयांची उचल देऊन लातूर, नांदेड, बीड भागातून विटा थापण्यासाठी आलेले कामगारांची मोठी गोची झाली आहे. विटा पावसाने भिजल्याने मालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस