शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सातारा जिल्ह्यात अवकाळी ढग; सातारा, माणमध्ये पाऊस, फळबागधारक शेतकऱ्यांत चिंता 

By नितीन काळेल | Updated: November 8, 2023 12:10 IST

साताऱ्यात जोरदार हजेरी..

सातारा : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस कमी झाला असलातरी सध्या अवकाळीचे ढग दाटून आले आहेत. साताऱ्याबरोबरच माण तालुक्यातही आज,बुधवारी पहाटेपासून पाऊस पडला. याचा फायदा ज्वारीला झाला असलातरी पीक काढणीवर परिणाम झालेला आहे. तर अवकाळी पावसामुळे फळबागधारक शेतकऱ्यांत चिंता निर्माण झालेली आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन पीक हंगाम घेण्यात येतात. हे दोन्हीही हंगाम मोठ्या प्रमाणात घेतले जातात. खरीपाचे क्षेत्र ३ लाख हेक्टरपर्यंत राहते. तर रब्बीचे यंदा २ लाख हेक्टरवर आहे. या दोन्हीही हंगामासाठी मान्सूनचा पाऊस महत्वाचा ठरतो. पण, यंदा मान्सूनने दगा दिला. सर्वच तालुक्यात कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला तर आता रबीची पेरणी सुरू आहे. अनेक भागात ज्वारीची पेरणी झालेली आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. तसेच दुसरीकडे चिंताही लागून राहिलेली आहे.सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते. असे असतानाच आज, सकाळच्या सुमारास माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरात अवकाळी पाऊस झाला. जवळपास एक तासभर पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फायदा उगवण झालेल्या ज्वारीला होणार आहे. त्यामुळे भांगलण होऊनच पुढील पाणी देण्याची गरज भासणार आहे. तर काही भागात अजुनही सोयाबीन, बाजरी पीक काढणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. यावर या पावसाचा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर रबी हंगामातील पेरणीवर परिणाम होणार आहे. काही दिवस पेरणी खोळंबणार आहे.दरम्यान, या अवकाळी पावसाचा उगवून आलेल्या पिकाला फायदा होणार आहे. पण, फळबागधारक शेतकऱ्यांत चिंता आहे. कारण, द्राक्ष, डाळिंब बागांवर पावसाचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांना रासायनिक आैषध फवारणी करावी लागणार आहे. तसेच फळधारणेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

साताऱ्यात जोरदार हजेरी..सातारा शहरात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झालेले. त्यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. तर सकाळी ११ च्या सुमारास भूरभूर पाऊस पडत होता. मात्र, साडे आकराच्या सुमारास पावसाची जोरदार सर पडली. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांना निवारा शोधावा लागला. तर रस्त्याच्या बाजुला बसणाऱ्या विक्रेत्यांची धावपळ उडाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस