शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मुंबई, पुण्यात होतं; मग साताऱ्यात का नाही?, महामार्गावरील उड्डाणपुलांची कचराकुंडी

By सचिन काकडे | Updated: July 12, 2023 12:37 IST

मुंबई, पुण्याच्या धर्तीवर साताऱ्यातील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गाच्या निर्मितीमुुळे साताऱ्याच्या विकासाची गाडी गतिमान झाली. परंतु महामार्गाच्या खालून गेलेल्या उड्डाणपुलांचा आजतागायत कधीही विकास झाला नाही. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपुलाचा कचरा झाला आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरातील उड्डाणपूल कात टाकत असतील तर सातारा शहरात हे का होऊ शकत नाही? असा सवाल सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

या ठिकाणी उड्डाणपूलशेंद्रे, खिंडवाडी, शिवराज पेट्रोल पंप, अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट, वाढे फाटा, लिंब खिंड

सध्या अशी आहे परिस्थिती

  • महामार्गाच्या दुतर्फा वसलेल्या गावांना जोडण्यासाठी लिंब खिंड ते शेंद्रे या मार्गावर एकूण सात उड्डाणपूल आहेत. एकेकाळी या उड्डाणपुलाखालील जागा प्रशस्त व मोकळी होती.
  • प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या जागेवर हळूहळू परप्रांतीय व्यावसायिक, टपरी चालक व छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी बस्तान बसविले. शिवाय अतिक्रमणही फोफावत चालले आहे.
  • अलीकडच्या काही वर्षांत उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेची अक्षरश: कचराकुंडी झाली असून, याचे कोणालाही सोयरसूतक नसल्याचे दिसते.

काय करता येईल..जिल्हा व पालिका प्रशासनाने प्रयत्न केल्यास महामार्गावरील सर्वच उड्डाणपूल कात टाकू शकतात. जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले, कास पठार, फुले आदींची चित्रे उड्डाणपुलाच्या भिंतीवर रेखाटता येऊ शकतात. वृद्धांसाठी ओपन जीम, उद्यान तसेच वाहनतळही विकसित करता येऊ शकते.

असे पालटले रूप..मुंबई महापालिकेकडून माटुंगा येथील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. उड्डाणपुुलांच्या पिलर्सवर पक्षी, निसर्ग, धबधबे व विविधरंगी फुलांची आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. सुशोभीकरणामुळे उड्डाणपूल प्रेक्षणीय स्थळ झाले आहे. पुण्यातील चांदणी चौकातील भुयारी मार्गातही असाच प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण, जिल्हा व पालिका प्रशासनाने मुंबई, पुण्याच्या धर्तीवर साताऱ्यातील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल.

सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करायलाच हवा. उड्डाणपुलांचे सुशोभीकरण झाले तर निश्चितच शहराच्या वैभवात भर पडेल. ही जागा अतिक्रमणांनी गिळंंकृत करण्यापूर्वी प्रशासनाने सुशोभीकरणाचे काम हाती घ्यायला हवे. - श्रीरंग काटेकर, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग