शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पुण्यात होतं; मग साताऱ्यात का नाही?, महामार्गावरील उड्डाणपुलांची कचराकुंडी

By सचिन काकडे | Updated: July 12, 2023 12:37 IST

मुंबई, पुण्याच्या धर्तीवर साताऱ्यातील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गाच्या निर्मितीमुुळे साताऱ्याच्या विकासाची गाडी गतिमान झाली. परंतु महामार्गाच्या खालून गेलेल्या उड्डाणपुलांचा आजतागायत कधीही विकास झाला नाही. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपुलाचा कचरा झाला आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरातील उड्डाणपूल कात टाकत असतील तर सातारा शहरात हे का होऊ शकत नाही? असा सवाल सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

या ठिकाणी उड्डाणपूलशेंद्रे, खिंडवाडी, शिवराज पेट्रोल पंप, अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट, वाढे फाटा, लिंब खिंड

सध्या अशी आहे परिस्थिती

  • महामार्गाच्या दुतर्फा वसलेल्या गावांना जोडण्यासाठी लिंब खिंड ते शेंद्रे या मार्गावर एकूण सात उड्डाणपूल आहेत. एकेकाळी या उड्डाणपुलाखालील जागा प्रशस्त व मोकळी होती.
  • प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या जागेवर हळूहळू परप्रांतीय व्यावसायिक, टपरी चालक व छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी बस्तान बसविले. शिवाय अतिक्रमणही फोफावत चालले आहे.
  • अलीकडच्या काही वर्षांत उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेची अक्षरश: कचराकुंडी झाली असून, याचे कोणालाही सोयरसूतक नसल्याचे दिसते.

काय करता येईल..जिल्हा व पालिका प्रशासनाने प्रयत्न केल्यास महामार्गावरील सर्वच उड्डाणपूल कात टाकू शकतात. जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले, कास पठार, फुले आदींची चित्रे उड्डाणपुलाच्या भिंतीवर रेखाटता येऊ शकतात. वृद्धांसाठी ओपन जीम, उद्यान तसेच वाहनतळही विकसित करता येऊ शकते.

असे पालटले रूप..मुंबई महापालिकेकडून माटुंगा येथील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. उड्डाणपुुलांच्या पिलर्सवर पक्षी, निसर्ग, धबधबे व विविधरंगी फुलांची आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. सुशोभीकरणामुळे उड्डाणपूल प्रेक्षणीय स्थळ झाले आहे. पुण्यातील चांदणी चौकातील भुयारी मार्गातही असाच प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण, जिल्हा व पालिका प्रशासनाने मुंबई, पुण्याच्या धर्तीवर साताऱ्यातील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल.

सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करायलाच हवा. उड्डाणपुलांचे सुशोभीकरण झाले तर निश्चितच शहराच्या वैभवात भर पडेल. ही जागा अतिक्रमणांनी गिळंंकृत करण्यापूर्वी प्रशासनाने सुशोभीकरणाचे काम हाती घ्यायला हवे. - श्रीरंग काटेकर, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग