शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कराडात ऊस दर संघर्ष समितिची पायी दिंडी, शेतकरी संघटना एकवटल्या 

By प्रमोद सुकरे | Updated: November 13, 2022 12:09 IST

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकाराचा पाया रोवला. शेतकऱ्यांचे जीवनात आर्थिक उन्नती यावी शेतकरी सुखी व्हावा समाधानी व्हावा यासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखान्याची निर्मिती केली.

कराड : सातारा जिल्ह्यामधील कारखान्यांनी उसाची पहिली उचल ३५०० रुपये द्यावी यासाठी कोपर्डी हवेली येथे पहिली ऊस परिषद पार पडली. यावेळी ऊस परिषदेमध्ये आंदोलनाचे टप्पे शेतकऱ्यांनी ठरवले होते. त्यानुसार सोमवारी दि.१४ रोजी कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन बनवडी फाटा, कृष्णा कॅनॉल, मंगळवार पेठ कराड ते यशवंतराव चव्हाण  समाधीस्थळ प्रीतीसंगम अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पायी दिंडी काढण्याचे ठरले होते.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकाराचा पाया रोवला. शेतकऱ्यांचे जीवनात आर्थिक उन्नती यावी शेतकरी सुखी व्हावा समाधानी व्हावा यासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखान्याची निर्मिती केली. परंतु आत्ताचे साखर सम्राट हे साखर कारखान्याचे मालक असल्यासारखे वागत आहेत. शेतकऱ्यांना विचारात घेऊन त्यांच्या उसाला योग्य भाव द्यावा तसेच शेजारील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन आपला पहिला हप्ता ३०००च्या पुढे जाहीर करत आहेत. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला सर्व शेतकरी यावेळी नमन करून  त्यांचे नाव घेऊन राजकारण, समाजकारण करणाऱ्या तुमच्या कर्मभूमीतील साखर कारखानदारांना सुबुद्धी द्यावी, असं साकडं ऊस दर संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने घालण्यात येणार आहे

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावेमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्यातील आहेत. ते स्वतः शेतकरी असून त्यांना शेतकऱ्यांबद्दल अस्ता आहे .हे वारंवार दिसूनही आलेले आहे. आमची त्यांना विनंती आहे आपण जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांच्या पहिल्या उचलीचा तिढा लवकरात लवकर सोडवावा .ऊस दर प्रश्न लवकरात लवकर बैठकीचे नियोजन करण्यात यावं असे आव्हान ऊसदर संघर्षाची वतीने सचिन नलवड़े यांनी केले आहे.

जाहिररित्या बोलावे...शेजारील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कारखाने एक रकमी ३२००च्या आसपास दर देत आहेत. त्यांची रिकवरी ही आपल्या कारखान्या एवढीच आहे मग आपले कारखाने पहिला हप्ता ३००० च्या पुढे का देऊ शकत नाहीत? याचं कारण त्यांनी जाहीर रित्या सांगावे.  उपपदार्थाचा हिशोब आपण का दिला नाही हेही जाहीर रित्या सांगावे असे आव्हान ऊस दर संघर्षित समितीच्या वतीने विश्वास जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने