शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पडिक जमीन आली लागवडीखाली

By admin | Updated: May 25, 2014 00:33 IST

एकात्मिक पाणलोट विकास : परळी खोर्‍यात जमीन सपाटीकरण

सातारा : एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत सातारा तालुका कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जमीन सपाटीकरण व बांध बंदिस्तीमुळे परळी खोर्‍यातील डोंगराळ तसेच खडकाळ भागातील ३५० एकर पडिक जमीन लागवडीखाली आली आहे. परिणामी या दुर्गम भागातील शेतकर्‍यांच्या आर्थिक परिवर्तनाचा मार्ग सुकर झाला आहे. आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांच्या प्रयत्नामुळे आणि कृषी विभागाच्या धोरणामुळे ही जमीन ओलिताखाली आली आहे. सातारा तालुक्यातील परळी विभागात एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत ५५, ५६, ५७ व ५८ या ४ क्लस्टरचा समावेश झाला आहे. आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी शासन पातळीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे पाणलोट विकास कार्यक्रमासाठी सातारा तालुक्याला पाच वर्षांसाठी २६ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या वर्षासाठी चार कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पंचायत समिती सदस्य कविता चव्हाण, पंचायत समिती सदस्य सोमनाथ पवार यांनी कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकर्‍यांशी समन्वय साधून कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी योग्यरीत्या नियोजन केले. परळी विभागातील क्लस्टर क्रमांक ५६ मध्ये नित्रळ, निगुडमाळ-ताकवली, केळवली-सांडवली, कातवडी बुद्रुक, खडगाव, पळसावडे, कुस खुर्द, कुस बुद्रुक, कासारस्थळ, यादववाडी, बनघर, पांगारे आणि परळी अशी १३ पाणलोट समित्यांची स्थापना करण्यात आली. सातारा तालुक्यातील प्रत्येक विभागात पाणलोट समित्यांची स्थापना करण्यात येऊन ठिकठिकाणी पाणलोटाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी माथा ते पायथा अशी कामाची आखणी करण्यात आली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ओघळ नियंत्रणमध्ये लुजबोल्डर, अर्दन स्ट्रक्चर तर दुसर्‍या टप्प्यामध्ये समतल चर व तिसर्‍या टप्प्यात माती नालाबंध, सपाटीकरण या कामांचे नियोजन करण्यात आले. सपाट जमीन व बांध बंदिस्ती झाल्यामुळे डोंगर उतारावरून वाहून जाणारे तसेच पडणार्‍या पावसाचे पाणी जमिनीतच मुरण्यास मदत होणार आहे. यापूर्वी जमीन उतारावर फक्त नाचणीचे पीक घेण्यात येत होते आणि याठिकाणी जमिनीचे सपाटीकरण झाल्याने भात पीक मोठ्या प्रमाणात घेता येणार आहे. पीक उत्पादनात हमखास वाढ होणार असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक पातळी उंचविण्यास मदत होणार आहे. पाणलोट विकासाची योजना प्रभावीपणे मार्गी लागल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शासनाच्या धोरणानुसार कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविला आहे. (प्रतिनिधी)