शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पडिक जमीन आली लागवडीखाली

By admin | Updated: May 25, 2014 00:33 IST

एकात्मिक पाणलोट विकास : परळी खोर्‍यात जमीन सपाटीकरण

सातारा : एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत सातारा तालुका कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जमीन सपाटीकरण व बांध बंदिस्तीमुळे परळी खोर्‍यातील डोंगराळ तसेच खडकाळ भागातील ३५० एकर पडिक जमीन लागवडीखाली आली आहे. परिणामी या दुर्गम भागातील शेतकर्‍यांच्या आर्थिक परिवर्तनाचा मार्ग सुकर झाला आहे. आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांच्या प्रयत्नामुळे आणि कृषी विभागाच्या धोरणामुळे ही जमीन ओलिताखाली आली आहे. सातारा तालुक्यातील परळी विभागात एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत ५५, ५६, ५७ व ५८ या ४ क्लस्टरचा समावेश झाला आहे. आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी शासन पातळीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे पाणलोट विकास कार्यक्रमासाठी सातारा तालुक्याला पाच वर्षांसाठी २६ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या वर्षासाठी चार कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पंचायत समिती सदस्य कविता चव्हाण, पंचायत समिती सदस्य सोमनाथ पवार यांनी कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकर्‍यांशी समन्वय साधून कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी योग्यरीत्या नियोजन केले. परळी विभागातील क्लस्टर क्रमांक ५६ मध्ये नित्रळ, निगुडमाळ-ताकवली, केळवली-सांडवली, कातवडी बुद्रुक, खडगाव, पळसावडे, कुस खुर्द, कुस बुद्रुक, कासारस्थळ, यादववाडी, बनघर, पांगारे आणि परळी अशी १३ पाणलोट समित्यांची स्थापना करण्यात आली. सातारा तालुक्यातील प्रत्येक विभागात पाणलोट समित्यांची स्थापना करण्यात येऊन ठिकठिकाणी पाणलोटाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी माथा ते पायथा अशी कामाची आखणी करण्यात आली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ओघळ नियंत्रणमध्ये लुजबोल्डर, अर्दन स्ट्रक्चर तर दुसर्‍या टप्प्यामध्ये समतल चर व तिसर्‍या टप्प्यात माती नालाबंध, सपाटीकरण या कामांचे नियोजन करण्यात आले. सपाट जमीन व बांध बंदिस्ती झाल्यामुळे डोंगर उतारावरून वाहून जाणारे तसेच पडणार्‍या पावसाचे पाणी जमिनीतच मुरण्यास मदत होणार आहे. यापूर्वी जमीन उतारावर फक्त नाचणीचे पीक घेण्यात येत होते आणि याठिकाणी जमिनीचे सपाटीकरण झाल्याने भात पीक मोठ्या प्रमाणात घेता येणार आहे. पीक उत्पादनात हमखास वाढ होणार असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक पातळी उंचविण्यास मदत होणार आहे. पाणलोट विकासाची योजना प्रभावीपणे मार्गी लागल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शासनाच्या धोरणानुसार कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविला आहे. (प्रतिनिधी)