शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

गावागावांत वाहणार विकासाची गंगा, ग्रामपंचायतींना मिळाला भरघोस निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 12:27 IST

१५व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील १४९२ ग्रामपंचायतींना २०२१-२२ या वर्षासाठी तब्बल ६७ कोटी ७५ लाखांचा निधी मिळालाय. यामधून गावागावांत नैसर्गिक स्रोत बळकटीकरण, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त गावची कामे होणार आहेत.

नितीन काळेल

सातारा : गावांचे अनेक प्रश्न, तसेच लोकांच्याही अडचणी असतात, हे सोडविण्यासाठी विकासकामे होतात. त्यासाठी शासनाकडूनही निधी मिळतो. आताही १५व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील १४९२ ग्रामपंचायतींना २०२१-२२ या वर्षासाठी तब्बल ६७ कोटी ७५ लाखांचा निधी मिळालाय. यामधून गावागावांत नैसर्गिक स्रोत बळकटीकरण, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त गावची कामे होणार आहेत.

ग्रामपंचायतींना कर रूपाने पैसे कमी मिळतात. त्यामुळे विकासकामे करताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. परिणामी गावात सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होत नाहीत; पण अलीकडील काही वर्षांत ग्रामपंचायतींना केंद्र शासनाकडून १५ व्या वित्त आयोगातून लाखो रुपयांचा निधी मिळत आहे. यातून गावांत विकासकामे मार्गी लागत आहेत. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींनाही प्रत्येकी १० टक्के निधी मिळतो. हे पैसेही सदस्यांमार्फत विकासकामांसाठी खर्च होतात. त्यामुळे गावांत विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहेत.

असा मिळणार निधी

६७,७५,५१९,८७ - ग्रामपंचायतींना मिळणार

८,३८,२५,००० - जिल्हा परिषदेला मिळणार

८,३८,२५,००० - पंचायत समितींना मिळणार

निधीतून विविध कामे करता येणार...

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दोन हप्त्यांत ६७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. यामधून विविध कामे करता येणार आहेत. पाणीपुरवठा योजना उद्भवात वाढ करणे, पाणलोट क्षेत्रात काम. शाळा, अंगणवाडीत पाणीपुरवठा उपलब्ध करणे, सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर. पाणीपुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय बांधणे, सांडपाणी नाल्याचे बांधकाम करणे, आदी कामे करण्यात येणार आहेत.

ग्रामपंचायतींनी शासन निर्देशानुसार ६० टक्के बंधित निधीतून स्वच्छतेसंदर्भात कामांचे नियोजन करताना घनकचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापनावर भर द्यावा. तसेच गावांना ‘कचरा डंपिंग’ची गरज पडणार नाही असे नियोजन करावे. सार्वजनिक इमारतींचे रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे १०० टक्के करावीत. ग्रामपंचायतींनी नैसर्गिक स्रोतांच्या संवर्धनावर भर द्यावा. त्याचबरोबर पर्यावरणपूरक विकासाच्यादृष्टीने पावले उचलावीत. प्लास्टिक कचरा व्यवस्थापित गावाचे उद्दिष्ट समोर ठेवावे. - अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत

तालुकानिहाय ग्रामपंचायती

माण ९५

खटाव १३३

फलटण १३१

सातारा १९१

कऱ्हाड २००

पाटण २३४

वाई ९९

जावळी १२५

महाबळेश्वर ७९

खंडाळा ६३

कोरेगाव १४२

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायत