शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अनधिकृत थांबे दोन दिवसच

By admin | Updated: December 5, 2014 23:20 IST

राष्ट्रीय महामार्ग : प्रवासी पुन्हा रस्त्यावरच ; प्राधिकरणचा वेळकाढूपणा

शरद ननावरे - खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाट, बोगदा परिसर ते केसुर्डी फाटा या टप्प्यात होणाऱ्या वारंवार अपघातामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यानंतर रस्ता रुंदीकरण करण्यापूर्वी आवश्यक सुविधा पुरविण्याबात स्थानिकांनी अनेकदा मागणी केली. मात्र, एखादी घटना घडल्यानंतर हायवे प्राधिकरण तात्पुरते जागे होते व काही काळाने विसरूनही जाते. गत आठवड्यात खंडाळा येथे झालेल्या भीषण अपघातानंतर महामार्गावरील अनाधिकृत बस थांबे बंद करून सर्व प्रवासी बसेस खंडाळा बसस्थानकाकडे वळविण्यात आल्या होत्या. मात्र, हे चित्र फक्त दोनच दिवस पाहायला मिळाले. बसेसची सोय होत नसल्याने प्रवाशांना पुन्हा महामार्गावरच थांबावे लागत आहे. महामार्ग प्राधिकरणाचा वेळकाढूपणा व एस. टी. महामंडळाचा हलगर्जीपणा यामुळे प्रवासी मात्र जीव मुठीत धरूनच थांबलेले आजही पाहायला मिळतात. त्यामुळे प्रशासनाचे डोळे उघडणार तरी केव्हा ? असाच प्रश्न स्थानिक जनतेतून विचारला जातोय. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणारी अशास्त्रीय वळणे, संरक्षक कठड्यांचा अभाव, क्वचितच दिसणारे सूचना फलक आणि अनेक सुविधांचा अभाव यामुळे या ठिकाणी महामार्ग ‘मृत्यूचा महामार्ग’ बनला आहे. त्यातच खंडाळा येथील उड्डाणपुलाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताने निष्पापांचे बळी गेले. त्यानंतर येथील बसथांबा बंद करून प्रवाशांना बसस्थानकात जाण्यास प्रवृत्त केले गेले. महामार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या खंडाळा बसस्थानकात वळविण्यात आल्या; पण हा कामदेखलेपणा केवळ चार दिवसच पहायला मिळाला. त्यानंतर मात्र येरे माझ्या मागच्या अशीच परिस्थिती आहे. स्थानकाकडे बस न थांबल्याने प्रवाशांना पुन्हा महामार्गावरच उभे राहण्याशिवाय गत्यंतर नाही. फक्त पहिल्या थांब्याच्या जागेऐवजी शंभर फूट पढे थांबा केला गेलाय म्हणजे इथले मरणे तिथे एवढाच काय तो बदल म्हणायला हवे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्राधिकरणाचा हा खेळ थांबणार तरी कधी हा यक्ष प्रश्न आहे.वास्तविक महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या आराखड्ड्यात गावानजीक कोणत्या सुविधा द्याव्यात, याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र, यापैकी सेवा रस्ते, बसथांबे, स्ट्रीट लाईट, भुयारी मार्ग यांची कुठलीही सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. याबाबत हायवे अधिकाऱ्यांना जाब विचारला असता करतो म्हणण्यापलीकडे आजतागायत काही केले नाही. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे.खरं तरं या महामार्गावरून राज्यातील सर्वच भागातून तसेच गोवा, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, छत्तीसगड आदी राज्यातीलही वाहतूक होत असते. त्यामुळे महामार्गावरील असुविधांचा फटका सर्वांनाच बसतोय. केंद्र शासनाने याकडे लक्ष देऊन राज्याला सूचना कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त केली जातेय. मात्र सध्यातरी प्राधिकरण आणि ठेकेदारांच्या सावळ्या गोंधळामुळे आणि महामार्गावरील असुविधांमुळे लोकांचा नाहक जीव जात असतो. त्यामुळे या ठिकाणी निर्माण करावयाच्या सेवा-सुविधा या सर्वांसाठीच उपयोगी व संरक्षक ठरणार आहेत; परंतु हायवे रुंदीकरणासाठी स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बदल करायचा म्हटलं की केंद्रशासनाची परवानगी नसल्याचे कारण प्राधिकरण अधिकारी पुढे करून टोलवाटोलवी करीत असतात. मात्र हायवेच्या सेवा रस्त्यांच्या सुविधा प्रथम निर्माण करा त्यानंतरच सहा पदरीकरणाचे काम सुरू करा, अशी भूमिका तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी घेतली आहे. काय आहे महामार्गाच्या आराखड्यातसेवारस्ते रुंदी ७ मीटरगावापासून किमान ३ कि. मी. चे सेवा रस्तेसेवारस्त्यांच्या बाजूने फूटपाथ ५ फूटाचे सेवा रस्त्यांवर दिशादर्शक फलक व स्ट्रीटलाईट ट्रक बे व बस बे- शौचालय, ाुतारी व पाण्याच्या सुविधेसहखंडाळा उड्डाण पुलाची रुंदी व उंची वाढविणेभुयारी मार्ग योग्य जागी व स्वच्छतेसह वापरास योग्यमहामार्गाची देखभालखंबाटकी बोगदा ते केसुर्डी फाटा या रस्त्यावरच्या सुविधांबाबत व करावयाच्या बदलाबाबत महामार्ग प्रशासनाला अनेकदा मागणीचे निवेदन दिले, बैठका झाल्या, मात्र, अद्यापही कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. वास्तविक सहापदरीकरणाच्या करारामध्येच काही त्रुटी आहेत त्यात बदल करणे आवश्यक आहे. - अनिरुध्द गाढवे, सदस्य पंचायत समिती, खंडाळा