शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत थांबे दोन दिवसच

By admin | Updated: December 5, 2014 23:20 IST

राष्ट्रीय महामार्ग : प्रवासी पुन्हा रस्त्यावरच ; प्राधिकरणचा वेळकाढूपणा

शरद ननावरे - खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाट, बोगदा परिसर ते केसुर्डी फाटा या टप्प्यात होणाऱ्या वारंवार अपघातामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यानंतर रस्ता रुंदीकरण करण्यापूर्वी आवश्यक सुविधा पुरविण्याबात स्थानिकांनी अनेकदा मागणी केली. मात्र, एखादी घटना घडल्यानंतर हायवे प्राधिकरण तात्पुरते जागे होते व काही काळाने विसरूनही जाते. गत आठवड्यात खंडाळा येथे झालेल्या भीषण अपघातानंतर महामार्गावरील अनाधिकृत बस थांबे बंद करून सर्व प्रवासी बसेस खंडाळा बसस्थानकाकडे वळविण्यात आल्या होत्या. मात्र, हे चित्र फक्त दोनच दिवस पाहायला मिळाले. बसेसची सोय होत नसल्याने प्रवाशांना पुन्हा महामार्गावरच थांबावे लागत आहे. महामार्ग प्राधिकरणाचा वेळकाढूपणा व एस. टी. महामंडळाचा हलगर्जीपणा यामुळे प्रवासी मात्र जीव मुठीत धरूनच थांबलेले आजही पाहायला मिळतात. त्यामुळे प्रशासनाचे डोळे उघडणार तरी केव्हा ? असाच प्रश्न स्थानिक जनतेतून विचारला जातोय. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणारी अशास्त्रीय वळणे, संरक्षक कठड्यांचा अभाव, क्वचितच दिसणारे सूचना फलक आणि अनेक सुविधांचा अभाव यामुळे या ठिकाणी महामार्ग ‘मृत्यूचा महामार्ग’ बनला आहे. त्यातच खंडाळा येथील उड्डाणपुलाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताने निष्पापांचे बळी गेले. त्यानंतर येथील बसथांबा बंद करून प्रवाशांना बसस्थानकात जाण्यास प्रवृत्त केले गेले. महामार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या खंडाळा बसस्थानकात वळविण्यात आल्या; पण हा कामदेखलेपणा केवळ चार दिवसच पहायला मिळाला. त्यानंतर मात्र येरे माझ्या मागच्या अशीच परिस्थिती आहे. स्थानकाकडे बस न थांबल्याने प्रवाशांना पुन्हा महामार्गावरच उभे राहण्याशिवाय गत्यंतर नाही. फक्त पहिल्या थांब्याच्या जागेऐवजी शंभर फूट पढे थांबा केला गेलाय म्हणजे इथले मरणे तिथे एवढाच काय तो बदल म्हणायला हवे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्राधिकरणाचा हा खेळ थांबणार तरी कधी हा यक्ष प्रश्न आहे.वास्तविक महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या आराखड्ड्यात गावानजीक कोणत्या सुविधा द्याव्यात, याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र, यापैकी सेवा रस्ते, बसथांबे, स्ट्रीट लाईट, भुयारी मार्ग यांची कुठलीही सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. याबाबत हायवे अधिकाऱ्यांना जाब विचारला असता करतो म्हणण्यापलीकडे आजतागायत काही केले नाही. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे.खरं तरं या महामार्गावरून राज्यातील सर्वच भागातून तसेच गोवा, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, छत्तीसगड आदी राज्यातीलही वाहतूक होत असते. त्यामुळे महामार्गावरील असुविधांचा फटका सर्वांनाच बसतोय. केंद्र शासनाने याकडे लक्ष देऊन राज्याला सूचना कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त केली जातेय. मात्र सध्यातरी प्राधिकरण आणि ठेकेदारांच्या सावळ्या गोंधळामुळे आणि महामार्गावरील असुविधांमुळे लोकांचा नाहक जीव जात असतो. त्यामुळे या ठिकाणी निर्माण करावयाच्या सेवा-सुविधा या सर्वांसाठीच उपयोगी व संरक्षक ठरणार आहेत; परंतु हायवे रुंदीकरणासाठी स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बदल करायचा म्हटलं की केंद्रशासनाची परवानगी नसल्याचे कारण प्राधिकरण अधिकारी पुढे करून टोलवाटोलवी करीत असतात. मात्र हायवेच्या सेवा रस्त्यांच्या सुविधा प्रथम निर्माण करा त्यानंतरच सहा पदरीकरणाचे काम सुरू करा, अशी भूमिका तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी घेतली आहे. काय आहे महामार्गाच्या आराखड्यातसेवारस्ते रुंदी ७ मीटरगावापासून किमान ३ कि. मी. चे सेवा रस्तेसेवारस्त्यांच्या बाजूने फूटपाथ ५ फूटाचे सेवा रस्त्यांवर दिशादर्शक फलक व स्ट्रीटलाईट ट्रक बे व बस बे- शौचालय, ाुतारी व पाण्याच्या सुविधेसहखंडाळा उड्डाण पुलाची रुंदी व उंची वाढविणेभुयारी मार्ग योग्य जागी व स्वच्छतेसह वापरास योग्यमहामार्गाची देखभालखंबाटकी बोगदा ते केसुर्डी फाटा या रस्त्यावरच्या सुविधांबाबत व करावयाच्या बदलाबाबत महामार्ग प्रशासनाला अनेकदा मागणीचे निवेदन दिले, बैठका झाल्या, मात्र, अद्यापही कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. वास्तविक सहापदरीकरणाच्या करारामध्येच काही त्रुटी आहेत त्यात बदल करणे आवश्यक आहे. - अनिरुध्द गाढवे, सदस्य पंचायत समिती, खंडाळा